शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

रसायनयुक्त पाणी नदीत

By admin | Updated: November 18, 2016 03:09 IST

स्थानिक औद्योगिक वसाहतीत असलेल्या इंडोरामा कंपनीतील रसायनयुक्त पाणी परिसरातील वेणा आणि कृष्णा नदीत सोडण्यात आल्याने

नागरिकांचे आरोग्य धोक्यात : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रारबुटीबोरी : स्थानिक औद्योगिक वसाहतीत असलेल्या इंडोरामा कंपनीतील रसायनयुक्त पाणी परिसरातील वेणा आणि कृष्णा नदीत सोडण्यात आल्याने बुटीबोरी व टाकळघाट येथील नागरिक तसेच नदीच्या पात्रातील जलचर प्राण्यांच्या जीवितास धोका उद्भवण्याची शक्यता बळावली आहे. यासंदर्भात स्थानिक नागरिकांनी कंपनी व्यवस्थापनाविरोधात महाराष्ट्र प्रदूषण मंडळाकडे तक्रार केली आहे. बुटीबोरी व टाकळघाट या दोन्ही गावांना वेणा आणि कृष्णा नदीच्या पात्रातून पाणीपुरवठा केला जातो. या दोन्ही नदीच्या पात्रात इंडोरामा कंपनीतील रसायनयुक्त पाणी सोडण्यात आल्याने, या दोन्ही गावांमधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी, या गावांमधील नागरिकांनी संबंधित ग्रामपंचायत कार्यालयात तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे रीतसर तक्रार केली. या तक्रारीची दखल घेत प्रदूषण मंडळाच्या सदस्यांनी या प्रकाराची प्रत्यक्ष पाहणी केली.दरम्यान, प्रदूषण मंडळाचे अधिकारी लोहळकर यांनी या पाण्याची प्रत्यक्ष पाहणी केली आणि पाण्याचे नमुने घेतले. सदर नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे लोहळकर यांनी सांगितले. सदर रसायनयुक्त पाणी नदीच्या पात्रांत सोडणे बंद करावे, अशी सूचना प्रदूषण मंडळाच्या सदस्यांनी कंपनी व्यवस्थापनाला केली होती. परंतु दुसऱ्या दिवशीही विशेष म्हणजे, रसायनयुक्त पाणी पात्रात सोडणे सुरू असल्याचे प्रत्यक्ष पाहणीत आढळून आले. त्यामुळे नागरिकांनी या प्रकाराबाबत एमआयडीसी बुटीबोरी पोलीस ठाण्यात तक्रार केली. या तक्रारीची दखल घेत पोलीस निरीक्षक वैरागडे यांनी एमआयडीसीचे उपअभियंता राय व व्यास यांना बोलावून त्यांच्याशी या विषयावर चर्चा केली. या अधिकाऱ्यांनी ज्या ठिकाणी रसायनयुक्त पाणी सोडले जाते, त्या ठिकाणाची पाहणी करून पंचनामा केला आणि इंडोरामा कंपनी व्यवस्थापनावर कार्यवाही करण्याचे आदेश दिले. असाच प्रकार यापूर्वीही घडला होता. त्यावेळी प्रदूषण मंडळाने या कंपनीवर दंड ठोठावला होता. (प्रतिनिधी)