शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

भूमाफियांची कुंडली तपासणार

By admin | Updated: May 17, 2017 01:52 IST

कुख्यात भूमाफिया दिलीप ग्वालबन्सी आणि त्याच्या टोळीतील गुंडांभोवती भक्कम कारवाईचा फास

एसआयटीची व्याप्ती ग्वालबन्सी प्रकरणापुरती मर्यादित नाही नरेश डोंगरे । लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कुख्यात भूमाफिया दिलीप ग्वालबन्सी आणि त्याच्या टोळीतील गुंडांभोवती भक्कम कारवाईचा फास आवळण्याच्या निमित्ताने निर्माण करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाची (एसआयटी) व्याप्ती केवळ ग्वालबन्सी प्रकरणापुरतीच मर्यादित नाही. ग्वालबन्सी, त्याचे गुन्हेगार नातेवाईक, ग्वालबन्सी टोळीतील गुंड आणि त्यांच्याप्रमाणेच सर्वसामान्य नागरिकांच्या जमिनी हडपणाऱ्या भूमाफियांचीही कुंडली एसआयटी तयार करीत आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी मंगळवारी लोकमतशी बोलताना दिली. शेकडो गोरगरीब नागरिक आणि सर्वसामान्य नोकरदारांसोबतच चक्क पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचीही जमीन हडपणाऱ्या भूमाफिया दिलीप ग्वालबन्सी, जगदीश ग्वालबन्सी, हरीश ग्वालबन्सी आणि त्याच्या नातेवाईकांसह गुंडांवरही पोलिसांनी कारवाईचा सपाटा लावला आहे. तब्बल तीन दशकांहून अधिक कालावधीपासून गिट्टीखदान, काटोल मार्ग, झिंगाबाई टाकळी, हजारी पहाड, सुरेंद्रगड, कोराडी, गोधनी आणि आजूबाजूच्या परिसरात ग्वालबन्सी टोळीने पैसा आणि दंडुकेशाहीच्या जोरावर अक्षरश: हैदोस घातला आहे. त्यांच्या गुंडगिरीसोबतच राजकीय संरक्षणाची जोड असल्याने पोलिसही त्यांच्यावर कारवाई करीत नव्हते. मात्र, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी आतापर्यंत भल्या भल्या पोलीस अधिकाऱ्यांनी जे केले नाही, ते करण्याचे धाडस दाखविले. केवळ गुन्हेच दाखल केले नाही तर ग्वालबन्सीला गजाआड करून त्याच्या साम्राज्यावर बुलडोझरही चालविला आहे. अनेक पीडितांना त्यांची जमीन परत करण्याचीही धडाकेबाज कारवाई पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वातील शहर पोलीस दलाने केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक नागपूर पोलिसांवर स्तुतिसुमने उधळत आहेत. दुसरीकडे केवळ ग्वालबन्सीच नव्हे तर त्याच्यासारखे अनेक भूमाफिया आणि त्याची पिलावळ उपराजधानीत वळवळत असल्यामुळे या पिलावळीलाही ठेचले जावे, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिक करीत आहे. इच्छा असूनही अनेक पीडित नागरिक विविध भागातील भूमाफियांविरुद्ध तक्रार करण्यासाठी पुढे येण्याची हिंमत दाखवत नाही. अशी या भूमाफियांची विविध भागात दहशत आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांशी लोकमतने विशेष बातचीत केली. ती पुढीलप्रमाणे आहे. एसआयटीची निर्मिती केवळ ग्वालबन्सी प्रकरणापुरतीच आहे का? पोलीस आयुक्त : नाही. अशाप्रकारचे जेवढे गुन्हे शहरात झाले आहेत किंवा जे जे पीडित तक्रार करीत आहेत त्या सर्वच प्रकरणाची चौकशी करून पोलीस कडक कारवाई करणार आहेत. सर्वसामान्य नागरिक भूमाफियांच्या दहशतीमुळे तक्रार करण्यास घाबरतात. पोलीस आयुक्त : अजिबात घाबरण्याचे कारण नाही. पीडित नागरिकांनी बिनधास्तपणे एसआयटीकडे तक्रारी कराव्या. प्रत्येक तक्रारीची दखल घेतली जाईल का? पोलीस आयुक्त : हो, प्रत्येक तक्रारीची दखल घेतली जाईल. मात्र, तक्रार करणाऱ्यांनी बनवाबनवी करू नये. पुराव्यानिशी तक्रार करावी. उगाच कुणाला त्रास देण्याच्या हेतूने कुणाची खोटी तक्रार केल्याचे स्पष्ट झाल्यास खोटी तक्रार करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. अनेकदा तक्रार करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांकडे पीडितांना तासन्तास बसावे लागते. त्यामुळे संबंधित तक्रारकर्त्यांनी थेट कुणाला भेटावे, त्यासाठी कुणी अधिकारी उपलब्ध होईल का? पोलीस आयुक्त : होय. नक्कीच उपलब्ध होतील. गुन्हेशाखेचे पोलीस आयुक्त संभाजी कदम किंवा सहायक पोलीस आयुक्त सोमनाथ वाघचौरे यांची थेट भेट घेऊन पीडित व्यक्ती तक्रार करू शकतात. या संबंधाने गुन्हेशाखेच्या (०७१२ : २५६६६०४ किंवा २५६५५७०) संपर्क नंबरवर पीडित व्यक्ती फोन करू शकतात. भूमाफियांची दहशत कमी करण्यासाठी मोक्कासारखी कडक कारवाई करणार का ? पोलीस आयुक्त : भूमाफिया, गुंडांच्या टोळ्या यांची दहशत कमी करण्यासाठी पोलीस शक्य होईल तेवढी कडक आणि कायदेशीर कारवाई करणार आहेत. त्यासाठी नागपुरातील भूमाफिया आणि गुन्हेगारांची कुंडली तयार करण्यात आली आहे.