शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

कावळ्यांच्या चोचीत बदल!

By admin | Updated: September 23, 2014 01:08 IST

पितृपक्षात पूर्वजांची पूजाअर्चा करून, त्यांना लावण्यात येणारा नैवेद्य कावळ्याला देण्याची परंपरा आहे. परंतु आज तो कावळाच दुर्मिळ होत चालला आहे. पक्षितज्ज्ञांच्या मते, कावळ्यांना पूर्वीप्रमाणे

संख्या घटली : पक्षिप्रेमी चिंतित योगेंद्र शंभरकर - नागपूर पितृपक्षात पूर्वजांची पूजाअर्चा करून, त्यांना लावण्यात येणारा नैवेद्य कावळ्याला देण्याची परंपरा आहे. परंतु आज तो कावळाच दुर्मिळ होत चालला आहे. पक्षितज्ज्ञांच्या मते, कावळ्यांना पूर्वीप्रमाणे मनुष्य सहवास व पर्याप्त खाद्य मिळत नसल्याने त्यांच्या चोचीच्या आकारात बदल होऊ लागला आहे. यासंबंधी केवळ नागपुरातच नव्हे तर अनेक शहरात करण्यात आलेल्या अध्ययनातून ही बाब पुढे आली आहे. ज्येष्ठ पक्षिप्रेमी व माजी मानद वन्यजीव रक्षक गोपाल ठोसर यांच्या मते, कोवळा व चिमण्यांचा कित्येक वर्षांपासून मनुष्यासोबत सहवास राहिला आहे. त्यांना मनुष्यासोबत राहण्याची सवय झाली आहे. त्यामुळे ते मनुष्याच्या सहवासात राहण्याचा प्रयत्न करतात. परंतु मनुष्याने त्यांची साथ सोडली आहे. पूर्वी कुटुंबातील सर्व सदस्य घरातील व्हरांड्यात जेवणाला बसायचे. त्याचवेळी घरासमोरच्या झाडावरील घरट्यात राहणारा कावळा किंवा चिमणी अचानक तेथे पोहोचून भाकरीचा तुकडा घेऊन जात होते. यातून त्यांची भूक भागत होती. परंतु आज व्हरांड्यातील ते सामूहिक भोजन बंद झाले असून, कवेलूच्या घराऐवजी स्लॅबच्या मोठमोठ्या इमारती उभा झाल्या आहेत. शिवाय त्यासाठी मोठमोठी झाडे तोडली जात आहेत. यामुळे पक्ष्यांना राहण्यासाठी घरटे आणि पोट भरण्यासाठी खाद्य मिळणे कठीण झाले आहे. सध्या शहरात हिरवळ असलेल्या परिसरातच पक्षी दिसून येतात. यात खामला, गड्डीगोदाम, मेडिकल कॉलेज व सुरेंद्रनगर परिसरात ते प्रामुख्याने आढळतात. (प्रतिनिधी)