शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छ सर्वेक्षणच्या गुणांकन पध्दतीत बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:08 IST

नागपूर : यावर्षी स्वच्छ सर्वेक्षणच्या गुणांकन पध्दतीमध्ये बदल करण्यात आला आहे. आता चारऐवजी तीन निकषांच्या आधारावर गुणांकन केले जाणार ...

नागपूर : यावर्षी स्वच्छ सर्वेक्षणच्या गुणांकन पध्दतीमध्ये बदल करण्यात आला आहे. आता चारऐवजी तीन निकषांच्या आधारावर गुणांकन केले जाणार आहे. प्रत्येक निकषाकरिता वेगवेगळे गुण निश्चित करण्यात आले आहेत.

२०२० मध्ये नागरिकांची प्रतिक्रिया, थेट निरीक्षण, सेवास्तरीय प्रगती व प्रमाणीकरण याकरिता प्रत्येकी १५०० गुण दिले जात होते. यावर्षी नागरिकांचा आवाज या निकषामध्ये प्रतिक्रिया, प्रतिबध्दता, अनुभव, स्वच्छता अ‍ॅप व नावीण्यता यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यावर ३० टक्के म्हणजे, १८०० गुण ठेवण्यात आले आहेत. सेवास्तरीय प्रगतीमध्ये कचऱ्याची विभागणी, प्रक्रिया व विल्हेवाट आणि शाश्वत स्वच्छता या बाबींचा समावेश आहे. त्यावर ४० टक्के म्हणजे, २४०० गुण ठेवण्यात आले आहेत. प्रमाणीकरण या तिसऱ्या निकषावर ३० टक्के म्हणजे, १८०० गुण आहेत.

गेल्यावर्षी नागपूरने ६००० पैकी ४२८३ गुण मिळवून ४० वे स्थान पटकावले होते. नागपूरने कचरामुक्त शहराच्या निकषात गुण गमावले होते; पण घराघरांतून कचरा गोळा करण्याच्या कार्यक्रमाने ती उणीव भरून काढली होती. प्रमाणीकरण निकषामध्ये नागपूरला यावर्षीही फटका बसवण्याची शक्यता आहे. या निकषात नागपूरला किमान ५ रेटिंग मिळवण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे.

ग्रीन व्हिजिल फाउंडेशनचे संस्थापक कौस्तव चॅटर्जी यांच्या मतानुसार, नागपूर महानगरपालिकेने उत्कृष्ट प्रयत्न केल्यानंतरही कचरा विभाजनात केवळ २०-२५ टक्के गुण मिळाले. आपण घराघरांतून कचरा गोळा करण्याच्या कार्यक्रमामुळे चांगली प्रगती करू शकतो; पण कचऱ्यावरील प्रक्रिया व विल्हेवाट आपल्याला पुन्हा मागे ओढेल. कचरा प्रक्रियेत चांगले गुण मिळवण्यासाठी आपल्याला कचऱ्यापासून वीजनिर्मिती केल्यास फायदा होऊ शकतो.

मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार यांनी यासंदर्भात बोलताना कचरा प्रक्रियेकरिता तीन नवीन प्रकल्प उभारले जाणार असल्याची व त्याचे टेंडर १५ दिवसांत जारी केले जाईल, अशी माहिती दिली. गेल्यावर्षीच्या उणिवा यावर्षी भरून काढून जास्तीत जास्त गुण मिळवण्याचा प्रयत्न आहे. नागपूर विकसनशील शहर आहे; पण कचरा विल्हेवाटीसाठी प्रभावी यंत्रणा उभी केल्याशिवाय आपण स्वत:ला पंचतारांकित शहर म्हणू शकणार नाही, असे मतही त्यांनी व्यक्त केले.