शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
2
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
3
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
4
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
5
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
6
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
7
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
8
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
9
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
10
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
11
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
12
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
13
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
14
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
15
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
16
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
17
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
18
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
19
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
20
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छ सर्वेक्षणच्या गुणांकन पध्दतीत बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:08 IST

नागपूर : यावर्षी स्वच्छ सर्वेक्षणच्या गुणांकन पध्दतीमध्ये बदल करण्यात आला आहे. आता चारऐवजी तीन निकषांच्या आधारावर गुणांकन केले जाणार ...

नागपूर : यावर्षी स्वच्छ सर्वेक्षणच्या गुणांकन पध्दतीमध्ये बदल करण्यात आला आहे. आता चारऐवजी तीन निकषांच्या आधारावर गुणांकन केले जाणार आहे. प्रत्येक निकषाकरिता वेगवेगळे गुण निश्चित करण्यात आले आहेत.

२०२० मध्ये नागरिकांची प्रतिक्रिया, थेट निरीक्षण, सेवास्तरीय प्रगती व प्रमाणीकरण याकरिता प्रत्येकी १५०० गुण दिले जात होते. यावर्षी नागरिकांचा आवाज या निकषामध्ये प्रतिक्रिया, प्रतिबध्दता, अनुभव, स्वच्छता अ‍ॅप व नावीण्यता यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यावर ३० टक्के म्हणजे, १८०० गुण ठेवण्यात आले आहेत. सेवास्तरीय प्रगतीमध्ये कचऱ्याची विभागणी, प्रक्रिया व विल्हेवाट आणि शाश्वत स्वच्छता या बाबींचा समावेश आहे. त्यावर ४० टक्के म्हणजे, २४०० गुण ठेवण्यात आले आहेत. प्रमाणीकरण या तिसऱ्या निकषावर ३० टक्के म्हणजे, १८०० गुण आहेत.

गेल्यावर्षी नागपूरने ६००० पैकी ४२८३ गुण मिळवून ४० वे स्थान पटकावले होते. नागपूरने कचरामुक्त शहराच्या निकषात गुण गमावले होते; पण घराघरांतून कचरा गोळा करण्याच्या कार्यक्रमाने ती उणीव भरून काढली होती. प्रमाणीकरण निकषामध्ये नागपूरला यावर्षीही फटका बसवण्याची शक्यता आहे. या निकषात नागपूरला किमान ५ रेटिंग मिळवण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे.

ग्रीन व्हिजिल फाउंडेशनचे संस्थापक कौस्तव चॅटर्जी यांच्या मतानुसार, नागपूर महानगरपालिकेने उत्कृष्ट प्रयत्न केल्यानंतरही कचरा विभाजनात केवळ २०-२५ टक्के गुण मिळाले. आपण घराघरांतून कचरा गोळा करण्याच्या कार्यक्रमामुळे चांगली प्रगती करू शकतो; पण कचऱ्यावरील प्रक्रिया व विल्हेवाट आपल्याला पुन्हा मागे ओढेल. कचरा प्रक्रियेत चांगले गुण मिळवण्यासाठी आपल्याला कचऱ्यापासून वीजनिर्मिती केल्यास फायदा होऊ शकतो.

मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार यांनी यासंदर्भात बोलताना कचरा प्रक्रियेकरिता तीन नवीन प्रकल्प उभारले जाणार असल्याची व त्याचे टेंडर १५ दिवसांत जारी केले जाईल, अशी माहिती दिली. गेल्यावर्षीच्या उणिवा यावर्षी भरून काढून जास्तीत जास्त गुण मिळवण्याचा प्रयत्न आहे. नागपूर विकसनशील शहर आहे; पण कचरा विल्हेवाटीसाठी प्रभावी यंत्रणा उभी केल्याशिवाय आपण स्वत:ला पंचतारांकित शहर म्हणू शकणार नाही, असे मतही त्यांनी व्यक्त केले.