शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
2
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
3
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
4
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
5
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
8
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
9
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
10
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
11
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड
12
कोल्हापुरी चप्पलेतून कर्रकर्र आवाज का येतो, तुम्हाला माहितेय का? ९९ टक्के लोक फेल!
13
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
14
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
15
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
16
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
17
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळेल का, काय वाटतं? यापूर्वी कोणत्या राष्ट्राध्यक्षांना मिळाले नोबेल?
18
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
19
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
20
भांडूपमधील जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल

गाळे वाटपासाठी बदलले नियम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 01:57 IST

कमल शर्मा । लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीत धक्कादायक अनियमितता उजेडात आली आहे. राज्य सरकारने सहकारी संस्थेचे जिल्हा विशेष लेखा परीक्षक ए.डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या चौकशी समितीच्या अहवालात अनियमिततेची पुष्टी झाली आहे. गाळे वाटपासाठी नियमात बदल करण्यावर सवाल उपस्थित करण्यात आले आहेत. समितीतील निवडक ...

ठळक मुद्देकृषी उत्पन्न बाजार समितीचा कारनामा : निवडक लोकांना लाभ, राज्याच्या चौकशी अहवालात ताशेरे

कमल शर्मा । लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीत धक्कादायक अनियमितता उजेडात आली आहे. राज्य सरकारने सहकारी संस्थेचे जिल्हा विशेष लेखा परीक्षक ए.डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या चौकशी समितीच्या अहवालात अनियमिततेची पुष्टी झाली आहे. गाळे वाटपासाठी नियमात बदल करण्यावर सवाल उपस्थित करण्यात आले आहेत. समितीतील निवडक लोकांना लाभ पोहोचविण्यासाठी हा खेळखंडोबा करण्यात आला आहे.लोकमतकडे उपलब्ध चौकशी अहवालात नमूद करण्यात आले आहे की, पंडित जवाहरलाल नेहरू मार्केट यार्ड परिसरातील ४४ गाळे वाटपावर ताशेरे ओढण्यात आले आहेत. यामध्ये फळ बाजारात २०, मिरची बाजारात १४ आणि आलू-कांदे बाजारातील १० दुकानांचा समावेश आहे. वाटपासाठी नियम आणि अटी लोकांच्या फायद्यासाठी बदलल्या आहेत. यासाठी १५ डिसेंबर २०१६ ला झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीची मदत घेण्यात आली आहे.अहवालानुसार, या बैठकीत गाळे वाटपासाठी नियमांमध्ये संशोधन करण्यात आले. दुकानांच्या लिलाव प्रक्रियेत सहभागी करून घेण्यासाठी ३२ अडतियांना नवीन परवाने देण्यात आले आहेत. यामध्ये शेख मुख्तार गफूर, अशरफी ट्रेडिंग कंपनी, धनराज मैनानी, राकेशकुमार कलवानी, अविनाश ओमप्रकाश फ्रूट कंपनी, राजेश छाबरानी, कन्हैयालाल छाबरानी, सुनील छाबरानी, गिरीश छाबरानी, अरुण राऊत आदींचा समावेश आहे.या प्रकारेच देखरेख रक्कम ०.५० टक्के केल्यामुळे कृषी उत्पन्न समितीला २६,०१, १७० रुपयांचा तोटा झाला आहे. समितीने गाळे वाटपात महाराष्ट्र राज्य विपणन मंडळाच्या महाव्यवस्थापकाांनी निर्धारित केलेल्या नियमांचे सर्रासपणे उल्लंघन केल्याचे अहवालात नमूद केले आहे.पाच वर्षांचा कालावधी तीन महिन्यांवर आणलानियमानुसार गाळे घेणाºया व्यापाºयाला ७५ टक्के रक्कम देण्याकरिता पाच वर्षांपर्यत हप्ते द्यावे लागतात. पण बाजार समितीच्या संचालक मंडळाने हा कालवधी तीन महिन्यांपर्यंत कमी केला. या कारणामुळे अनेकजण लिलाव प्रक्रियेत सहभागी होऊ शकले नाहीत. याच प्रकारे गाळे न घेण्याच्या अटीवर व्यवसायासाठी परवाना घेण्याची अट ठेवली होती, हे अहवालात नमूद केले आहे.का बनली चौकशी समिती?भाजपा व्यापारी मोर्चाचे अध्यक्ष संजय वाधवानी यांनी १३ मार्च २०१७ ला बाजारातील अनियमिततेची तक्रार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. फडणवीस यांच्या निर्देशानंतर सहकार विभागाने २७ मार्चला ए.डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली. या समितीत उपनिबंधक एन. एस. कंचेरी, सहायक निबंधक अशोक गिरी, टी. एन. चव्हाण आणि सहकार विभागाचे अधिकारी नरेश खोब्रागडे यांचा समावेश आहे.१४ ला मांडणार बाजूचौकशी अहवालावर उपनिबंधक कार्यालयाकडून दहा दिवसांत उत्तर देण्याचा नोटीस मिळाला आहे. ४ तारखेला उत्तर द्यायचे होते. पण अहवाल विस्तृत असल्यामुळे समितीने उत्तर देण्यासाठी वेळ मागितला आहे. आता १४ ला उत्तर देणार आहे. त्या दिवशी चौकशी अहवालावर बोलणार आहे.- अहमद शेख, सभापती, नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती