शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
5
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
6
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
7
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
8
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
9
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
10
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
11
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
12
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
13
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
14
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
15
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
16
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
17
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
18
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
19
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
20
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...

गाळे वाटपासाठी बदलले नियम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 01:57 IST

कमल शर्मा । लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीत धक्कादायक अनियमितता उजेडात आली आहे. राज्य सरकारने सहकारी संस्थेचे जिल्हा विशेष लेखा परीक्षक ए.डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या चौकशी समितीच्या अहवालात अनियमिततेची पुष्टी झाली आहे. गाळे वाटपासाठी नियमात बदल करण्यावर सवाल उपस्थित करण्यात आले आहेत. समितीतील निवडक ...

ठळक मुद्देकृषी उत्पन्न बाजार समितीचा कारनामा : निवडक लोकांना लाभ, राज्याच्या चौकशी अहवालात ताशेरे

कमल शर्मा । लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीत धक्कादायक अनियमितता उजेडात आली आहे. राज्य सरकारने सहकारी संस्थेचे जिल्हा विशेष लेखा परीक्षक ए.डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या चौकशी समितीच्या अहवालात अनियमिततेची पुष्टी झाली आहे. गाळे वाटपासाठी नियमात बदल करण्यावर सवाल उपस्थित करण्यात आले आहेत. समितीतील निवडक लोकांना लाभ पोहोचविण्यासाठी हा खेळखंडोबा करण्यात आला आहे.लोकमतकडे उपलब्ध चौकशी अहवालात नमूद करण्यात आले आहे की, पंडित जवाहरलाल नेहरू मार्केट यार्ड परिसरातील ४४ गाळे वाटपावर ताशेरे ओढण्यात आले आहेत. यामध्ये फळ बाजारात २०, मिरची बाजारात १४ आणि आलू-कांदे बाजारातील १० दुकानांचा समावेश आहे. वाटपासाठी नियम आणि अटी लोकांच्या फायद्यासाठी बदलल्या आहेत. यासाठी १५ डिसेंबर २०१६ ला झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीची मदत घेण्यात आली आहे.अहवालानुसार, या बैठकीत गाळे वाटपासाठी नियमांमध्ये संशोधन करण्यात आले. दुकानांच्या लिलाव प्रक्रियेत सहभागी करून घेण्यासाठी ३२ अडतियांना नवीन परवाने देण्यात आले आहेत. यामध्ये शेख मुख्तार गफूर, अशरफी ट्रेडिंग कंपनी, धनराज मैनानी, राकेशकुमार कलवानी, अविनाश ओमप्रकाश फ्रूट कंपनी, राजेश छाबरानी, कन्हैयालाल छाबरानी, सुनील छाबरानी, गिरीश छाबरानी, अरुण राऊत आदींचा समावेश आहे.या प्रकारेच देखरेख रक्कम ०.५० टक्के केल्यामुळे कृषी उत्पन्न समितीला २६,०१, १७० रुपयांचा तोटा झाला आहे. समितीने गाळे वाटपात महाराष्ट्र राज्य विपणन मंडळाच्या महाव्यवस्थापकाांनी निर्धारित केलेल्या नियमांचे सर्रासपणे उल्लंघन केल्याचे अहवालात नमूद केले आहे.पाच वर्षांचा कालावधी तीन महिन्यांवर आणलानियमानुसार गाळे घेणाºया व्यापाºयाला ७५ टक्के रक्कम देण्याकरिता पाच वर्षांपर्यत हप्ते द्यावे लागतात. पण बाजार समितीच्या संचालक मंडळाने हा कालवधी तीन महिन्यांपर्यंत कमी केला. या कारणामुळे अनेकजण लिलाव प्रक्रियेत सहभागी होऊ शकले नाहीत. याच प्रकारे गाळे न घेण्याच्या अटीवर व्यवसायासाठी परवाना घेण्याची अट ठेवली होती, हे अहवालात नमूद केले आहे.का बनली चौकशी समिती?भाजपा व्यापारी मोर्चाचे अध्यक्ष संजय वाधवानी यांनी १३ मार्च २०१७ ला बाजारातील अनियमिततेची तक्रार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. फडणवीस यांच्या निर्देशानंतर सहकार विभागाने २७ मार्चला ए.डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली. या समितीत उपनिबंधक एन. एस. कंचेरी, सहायक निबंधक अशोक गिरी, टी. एन. चव्हाण आणि सहकार विभागाचे अधिकारी नरेश खोब्रागडे यांचा समावेश आहे.१४ ला मांडणार बाजूचौकशी अहवालावर उपनिबंधक कार्यालयाकडून दहा दिवसांत उत्तर देण्याचा नोटीस मिळाला आहे. ४ तारखेला उत्तर द्यायचे होते. पण अहवाल विस्तृत असल्यामुळे समितीने उत्तर देण्यासाठी वेळ मागितला आहे. आता १४ ला उत्तर देणार आहे. त्या दिवशी चौकशी अहवालावर बोलणार आहे.- अहमद शेख, सभापती, नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती