शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

आम्ही दिलेला शब्द पाळतो म्हणून राज्यात सत्ताबदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2022 22:09 IST

Nagpur News आम्ही दिलेला शब्द पाळतो. त्यामुळे राज्यात सत्ताबदल घडविण्यात आला व सर्वसामान्य जनतेच्या मनातील सरकार स्थापन करण्यात आले, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आधीच्या सरकारवर वार केला.

ठळक मुद्देमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आधीच्या सरकारवर वार

नागपूर : आम्ही दिलेला शब्द पाळतो. त्यामुळे राज्यात सत्ताबदल घडविण्यात आला व सर्वसामान्य जनतेच्या मनातील सरकार स्थापन करण्यात आले, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आधीच्या सरकारवर वार केला.

मराठा समाजाच्या वतीने सोमवारी रेशीमबागेतील कविवर्य सुरेश भट सभागृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अंजनगाव सुर्जी येथील श्रीनाथ पीठाधीश्वर स्वामी जितेंद्रनाथ महाराज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर आमदार प्रवीण दटके, मराठा समाजाचे नेते राजे मुधोजी भोसले, राजे संग्रामसिंह भोसले, शिरीष राजेशिर्के, नरेंद्र मोहिते, दिलीप धंद्रे, दीपक देशमुख, आदी उपस्थित होते.

राज्यात सत्ताबदल घडविण्यासाठी ५० आमदार, १३ खासदार व अनेक शिवसेना पदाधिकाऱ्यांनी साथ दिली. मला राजकीय पार्श्वभूमी नाही. असे असताना केवळ सर्वांनी दाखविलेल्या विश्वासाच्या बळावर मुख्यमंत्री झालो. मराठा समाजाचा विकास करण्यासाठी व त्यांना न्याय देण्यासाठी सतत प्रयत्न करेन, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

स्वामी जितेंद्रनाथ महाराज यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे दोघेही छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार आहेत, असे मत व्यक्त केले. शिवाजी महाराज श्रीराम व श्री कृष्ण यांच्या रीती-नितीने चालत होते. हे दोघेही त्याच रीती-नितीचे पालन करताहेत, असे मत त्यांनी व्यक्त केले. नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनाही कार्यक्रमात निमंत्रित करण्यात आले होते. परंतु, ते काही कारणांमुळे उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांनी आयोजकांना पत्र पाठवून कार्यक्रमाकरिता शुभेच्छा दिल्या.

मराठा समाजाच्या विकासाकडे सरकारचे लक्ष - फडणवीस

मराठा समाजाच्या विकासाकडे राज्य सरकारचे लक्ष आहे. त्यांच्या १२ मागण्या पूर्ण करण्यासाठी मी स्वत: मुख्यमंत्र्यांकडे वकिली करेन. सरकारने मराठा समाजाच्या विकासाकरिता विविध योजना सुरू केल्या आहेत. समाजातील दोन लाख तरुणांना उद्योजक करण्यासाठी सरकार प्रयत्नरत आहे. समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठीही सरकार गंभीर आहे, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदे