शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

चंद्रपूर जिल्ह्याचा निकाल ८८.१२ टक्के

By admin | Updated: May 30, 2017 18:15 IST

म. रा. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता १२वीचा निकाल मंगळवारी घोषित केला असून त्यात चंद्रपूर जिल्ह्याचा निकाल ८८.१२ टक्के लागला आहे.

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : म. रा. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता १२वीचा निकाल मंगळवारी घोषित केला असून त्यात चंद्रपूर जिल्ह्याचा निकाल ८८.१२ टक्के लागला आहे. निकालामध्ये मुली वरचढ ठरल्या आहेत. ९१.०४ टक्के मुली व ८५.७३ टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत. यावर्षी जिल्ह्यातून २९ हजार ७९० विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज केला. त्यापैकी २९ हजार ७६७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्यावर २६ हजार २८९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यामध्ये नोंदणी करणारे १५ हजार ३०५ विद्यार्थी आणि १४ हजार ४८५ विद्यार्थिनींनी होत्या. त्यापैकी १५ हजार २८७ मुले व १४ हजार ४८० मुलींनी परीक्षा दिली. निकालामध्ये १३ हजार १०६ विद्यार्थी व १३ हजार १८३ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलांपेक्षा कमी मुलींनी परीक्षा दिली तरी उत्तीर्ण मुलींची संख्या अधिक आहे. सर्वात कमी निकाल कला शाखेचा लागला आहे. सर्वाधिक विज्ञान शाखेचा ९६.८८ टक्के, वाणिज्य शाखा ८८.०१ टक्के, व्होकेशनल शाखा ८६.६४ टक्के आणि कला शाखेचा ८२.६६ टक्के निकाल लागला आहे. कला शाखेत १५ हजार २६३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्यावर १२ हजार ६१७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विज्ञान शाखेत १० हजार ५०९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून त्यापैकी १० हजार १८१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. वाणिज्य शाखेत २ हजार ३०१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून २ हजार २५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर व्होकेशनल शाखेत १ हजार ६९४ विद्यार्थ्यांपैकी १ हजार ४६६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.