शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
3
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
4
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
5
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
6
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
7
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
8
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
10
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
11
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
12
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
13
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
14
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
15
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
16
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
17
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
18
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
19
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
20
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)

चणा ‘गरम’!

By admin | Updated: April 10, 2017 02:18 IST

गेल्या वर्षी १२५ ते १३० रुपये किलोपर्यंत पोहोचलेल्या चणा डाळीच्या किमती यावर्षी अर्ध्यावर आल्या खऱ्या,

१५ दिवसांत किलोमागे ३० रुपयांची वाढ : तूर डाळही महागलीनागपूर : गेल्या वर्षी १२५ ते १३० रुपये किलोपर्यंत पोहोचलेल्या चणा डाळीच्या किमती यावर्षी अर्ध्यावर आल्या खऱ्या, पण गेल्या १५ दिवसांत किलोमागे तब्बल ३० रुपयांची वाढ झाली आहे. सध्या चणा डाळीचा भाव प्रतिकिलो ७६ ते ८२ रुपये इतका आहे. याशिवाय तूर डाळीतही चार ते पाच रुपयांची वाढ झाल्याची माहिती इतवारी ठोक बाजारातील व्यापाऱ्यांनी दिली. यावर्षी चण्याचे पीक अपेक्षेपेक्षा कमी झाले आहे. ग्राहकांकडून अचानक मागणी वाढल्यामुळे दरवाढ झाली आहे. तसे पाहता गतवर्षीच्या १२५ ते १३० रुपयांच्या तुलनेत यावर्षी भाव कमी असल्याची माहिती धान्य बाजाराचे समीक्षक रमेश उमाटे यांनी सांगितले. बाजारात धान्य आणि कडधान्याची खरेदी वाढली आहे. महाराष्ट्रात उन्हाळ्यात धान्य साठवणुकीची प्रथा आहे. ग्राहकांकडून मागणी वाढल्यामुळे तांदूळ आणि गव्हाच्या किमतीत थोडीफार वाढ झाली आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मालाला भाव मिळवून देण्याच्या उद्देशाने गहू आणि तूर डाळीवर १० टक्के आयात शुल्क लावले. त्याचा प्रारंभी परिणाम दिसून आला. पण त्याचा प्रभाव काही दिवसानंतर ओसरला. इतवारी ठोक बाजारात महिन्यापासून तूर डाळीचे क्विंटलचे भाव ५५०० ते ७००० रुपयांवर स्थिर होते. मागणी वाढल्यामुळे त्यात क्विंटलमागे ५०० रुपयांची वाढ झाली. तसेच महिन्यापूर्वी ५२०० ते ६००० रुपये किमतीवर पोहोचलेली चणा डाळा ७६०० ते ८२०० रुपयांवर पोहोचली आहे. पुढील काही दिवसांत तूर डाळ स्थिर राहील, पण चणा डाळीच्या किमती वाढण्याची शक्यता उमाटे यांनी व्यक्त केली. याशिवाय अन्य डाळीच्या किमती थोड्याफार प्रमाणात वाढल्या आहेत. गेल्यावर्षी १६० रुपये किलोपर्यंत पोहोचलेल्या उडद डाळीचे भाव सध्या दर्जानुसार ९२ ते १०५ रुपये किलो आहे. गेल्या काही दिवसांत या डाळीत क्विंटलमागे ५०० रुपयांची तेजी आली. इतवारी ठोक बाजारात मूंग मोगर ६४०० ते ७२०० रुपये क्विंटल, मूग डाळ ६००० ते ७००० रुपये तर काही दिवसांपूर्वी ७५०० रुपये क्विंटलवर गेलेल्या मसूर डाळीचे दर ६००० ते ६५०० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. गहू व तांदळाची विक्री वाढलीसध्या बाजारात गहू व तांदळाची विक्री वाढली आहे. मागणीनंतर दोन्ही धान्याच्या किमतीतही थोडीफार वाढ झाली आहे. यंदा गव्हाचे चांगले उत्पादन आहे. इतवारी ठोक बाजारात गहू लोकवन २००० ते २३०० रुपये क्विंटल, तुकडा २२०० ते २४००, एमपी सरबती २५०० ते ३५०० रुपये भाव आहेत. होळीमध्ये १३५ रुपये किलोपर्यंत पोहोचलेले काबुली चण्याचे भाव आता ११५ रुपयांपर्यंत खाली आले आहेत. यंदा श्रीराम व चिन्नोर तांदळाला जास्त मागणी आहे. श्रीराम (अरवा) ४२०० ते ४६०० रुपये क्विंटल, श्रीराम (स्टीम) ४५०० ते ४७५०, चिन्नोर ४२०० ते ४६००, बीपीटी ३००० ते ३३००, सुवर्णा २२०० ते २५००, श्रीराम खंडा २१०० ते ३००० आणि चिन्नोर खंडा २१०० ते ३२०० रुपये भाव आहेत. यावर्षी मुबलक उत्पादनांमुळे भाव फारसे वाढणार नाहीत, अशी शक्यता रमेश उमाटे यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)