शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
6
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
7
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
8
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
9
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
10
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
11
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
12
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
13
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
14
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
15
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
16
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
17
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
18
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
19
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
20
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी

चणा ‘गरम’!

By admin | Updated: April 10, 2017 02:18 IST

गेल्या वर्षी १२५ ते १३० रुपये किलोपर्यंत पोहोचलेल्या चणा डाळीच्या किमती यावर्षी अर्ध्यावर आल्या खऱ्या,

१५ दिवसांत किलोमागे ३० रुपयांची वाढ : तूर डाळही महागलीनागपूर : गेल्या वर्षी १२५ ते १३० रुपये किलोपर्यंत पोहोचलेल्या चणा डाळीच्या किमती यावर्षी अर्ध्यावर आल्या खऱ्या, पण गेल्या १५ दिवसांत किलोमागे तब्बल ३० रुपयांची वाढ झाली आहे. सध्या चणा डाळीचा भाव प्रतिकिलो ७६ ते ८२ रुपये इतका आहे. याशिवाय तूर डाळीतही चार ते पाच रुपयांची वाढ झाल्याची माहिती इतवारी ठोक बाजारातील व्यापाऱ्यांनी दिली. यावर्षी चण्याचे पीक अपेक्षेपेक्षा कमी झाले आहे. ग्राहकांकडून अचानक मागणी वाढल्यामुळे दरवाढ झाली आहे. तसे पाहता गतवर्षीच्या १२५ ते १३० रुपयांच्या तुलनेत यावर्षी भाव कमी असल्याची माहिती धान्य बाजाराचे समीक्षक रमेश उमाटे यांनी सांगितले. बाजारात धान्य आणि कडधान्याची खरेदी वाढली आहे. महाराष्ट्रात उन्हाळ्यात धान्य साठवणुकीची प्रथा आहे. ग्राहकांकडून मागणी वाढल्यामुळे तांदूळ आणि गव्हाच्या किमतीत थोडीफार वाढ झाली आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मालाला भाव मिळवून देण्याच्या उद्देशाने गहू आणि तूर डाळीवर १० टक्के आयात शुल्क लावले. त्याचा प्रारंभी परिणाम दिसून आला. पण त्याचा प्रभाव काही दिवसानंतर ओसरला. इतवारी ठोक बाजारात महिन्यापासून तूर डाळीचे क्विंटलचे भाव ५५०० ते ७००० रुपयांवर स्थिर होते. मागणी वाढल्यामुळे त्यात क्विंटलमागे ५०० रुपयांची वाढ झाली. तसेच महिन्यापूर्वी ५२०० ते ६००० रुपये किमतीवर पोहोचलेली चणा डाळा ७६०० ते ८२०० रुपयांवर पोहोचली आहे. पुढील काही दिवसांत तूर डाळ स्थिर राहील, पण चणा डाळीच्या किमती वाढण्याची शक्यता उमाटे यांनी व्यक्त केली. याशिवाय अन्य डाळीच्या किमती थोड्याफार प्रमाणात वाढल्या आहेत. गेल्यावर्षी १६० रुपये किलोपर्यंत पोहोचलेल्या उडद डाळीचे भाव सध्या दर्जानुसार ९२ ते १०५ रुपये किलो आहे. गेल्या काही दिवसांत या डाळीत क्विंटलमागे ५०० रुपयांची तेजी आली. इतवारी ठोक बाजारात मूंग मोगर ६४०० ते ७२०० रुपये क्विंटल, मूग डाळ ६००० ते ७००० रुपये तर काही दिवसांपूर्वी ७५०० रुपये क्विंटलवर गेलेल्या मसूर डाळीचे दर ६००० ते ६५०० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. गहू व तांदळाची विक्री वाढलीसध्या बाजारात गहू व तांदळाची विक्री वाढली आहे. मागणीनंतर दोन्ही धान्याच्या किमतीतही थोडीफार वाढ झाली आहे. यंदा गव्हाचे चांगले उत्पादन आहे. इतवारी ठोक बाजारात गहू लोकवन २००० ते २३०० रुपये क्विंटल, तुकडा २२०० ते २४००, एमपी सरबती २५०० ते ३५०० रुपये भाव आहेत. होळीमध्ये १३५ रुपये किलोपर्यंत पोहोचलेले काबुली चण्याचे भाव आता ११५ रुपयांपर्यंत खाली आले आहेत. यंदा श्रीराम व चिन्नोर तांदळाला जास्त मागणी आहे. श्रीराम (अरवा) ४२०० ते ४६०० रुपये क्विंटल, श्रीराम (स्टीम) ४५०० ते ४७५०, चिन्नोर ४२०० ते ४६००, बीपीटी ३००० ते ३३००, सुवर्णा २२०० ते २५००, श्रीराम खंडा २१०० ते ३००० आणि चिन्नोर खंडा २१०० ते ३२०० रुपये भाव आहेत. यावर्षी मुबलक उत्पादनांमुळे भाव फारसे वाढणार नाहीत, अशी शक्यता रमेश उमाटे यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)