शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

दहशतवाद्यांना निर्दोष सोडण्याला आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2020 11:17 IST

Court Nagpur News तीन दहशतवाद्यांना निर्दोष सोडण्याच्या निर्णयाविरुद्ध राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अपील दाखल केले आहे. त्या अपीलवर ११ जानेवारीपासून अंतिम सुनावणी होणार आहे.

ठळक मुद्देहायकोर्टात जानेवारीत अंतिम सुनावणी

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : तीन दहशतवाद्यांना निर्दोष सोडण्याच्या निर्णयाविरुद्ध राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अपील दाखल केले आहे. त्या अपीलवर ११ जानेवारीपासून अंतिम सुनावणी होणार आहे. यासंदर्भात न्यायालयाने बुधवारी आदेश दिला.

अब्दुल मलिक अब्दुल रझ्झाक, सलीम मलिक ऊर्फ हफीज मुजिब-उर-रहमान मेहबूब शेख (दोन्ही रा. पुसद, जि. यवतमाळ) व शोएब खान ऊर्फ अहमद रेहमान खान (रा. बाळापूर आखाडा. जि. हिंगोली) अशी दहशतवाद्यांची नावे आहेत. २५ सप्टेंबर २०१५ रोजी बकरी ईदनिमित्त पुसद येथे पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. दरम्यान, अब्दुल मलिकने रामपुरी चाकूने हल्ला करून काही पोलिसांना गंभीर जखमी केले. देशात गोहत्याबंदी कायदा लागू करण्यात आल्यामुळे तुम्हाला ठार मारेन, असे तो जोरजोरात ओरडत होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पुढील चौकशी केली असता, अन्य दोन दहशतवादी त्यांच्या संपर्कातील तरुणांना जिहादकरिता प्रवृत्त करीत असल्याची माहिती पुढे आली. तसेच त्यांच्याकडे आक्षेपार्ह साहित्य आढळून आले. त्यानंतर २१ मे २०१९ रोजी अकोला येथील विशेष सत्र न्यायालयाने ठोस पुरावे नसल्याच्या कारणावरून या तिन्ही दहशतवाद्यांना निर्दोष सोडण्याचा निर्णय दिला. त्यावर राज्य सरकारचा आक्षेप आहे. हा निर्णय चुकीचा असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. परिणामी, सरकारने हा निर्णय रद्द होऊन दहशतवाद्यांना शिक्षा व्हावी, याकरिता उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सरकारतर्फे ॲड. तहसीन मिर्झा यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :Courtन्यायालयHigh Courtउच्च न्यायालय