शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
2
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
3
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
4
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
5
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
6
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
7
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
8
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
9
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
10
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
11
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
12
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
13
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
14
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
15
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
16
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
17
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
18
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
19
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
20
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती

दहशतवाद्यांना निर्दोष सोडण्याला आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2020 11:17 IST

Court Nagpur News तीन दहशतवाद्यांना निर्दोष सोडण्याच्या निर्णयाविरुद्ध राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अपील दाखल केले आहे. त्या अपीलवर ११ जानेवारीपासून अंतिम सुनावणी होणार आहे.

ठळक मुद्देहायकोर्टात जानेवारीत अंतिम सुनावणी

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : तीन दहशतवाद्यांना निर्दोष सोडण्याच्या निर्णयाविरुद्ध राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अपील दाखल केले आहे. त्या अपीलवर ११ जानेवारीपासून अंतिम सुनावणी होणार आहे. यासंदर्भात न्यायालयाने बुधवारी आदेश दिला.

अब्दुल मलिक अब्दुल रझ्झाक, सलीम मलिक ऊर्फ हफीज मुजिब-उर-रहमान मेहबूब शेख (दोन्ही रा. पुसद, जि. यवतमाळ) व शोएब खान ऊर्फ अहमद रेहमान खान (रा. बाळापूर आखाडा. जि. हिंगोली) अशी दहशतवाद्यांची नावे आहेत. २५ सप्टेंबर २०१५ रोजी बकरी ईदनिमित्त पुसद येथे पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. दरम्यान, अब्दुल मलिकने रामपुरी चाकूने हल्ला करून काही पोलिसांना गंभीर जखमी केले. देशात गोहत्याबंदी कायदा लागू करण्यात आल्यामुळे तुम्हाला ठार मारेन, असे तो जोरजोरात ओरडत होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पुढील चौकशी केली असता, अन्य दोन दहशतवादी त्यांच्या संपर्कातील तरुणांना जिहादकरिता प्रवृत्त करीत असल्याची माहिती पुढे आली. तसेच त्यांच्याकडे आक्षेपार्ह साहित्य आढळून आले. त्यानंतर २१ मे २०१९ रोजी अकोला येथील विशेष सत्र न्यायालयाने ठोस पुरावे नसल्याच्या कारणावरून या तिन्ही दहशतवाद्यांना निर्दोष सोडण्याचा निर्णय दिला. त्यावर राज्य सरकारचा आक्षेप आहे. हा निर्णय चुकीचा असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. परिणामी, सरकारने हा निर्णय रद्द होऊन दहशतवाद्यांना शिक्षा व्हावी, याकरिता उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सरकारतर्फे ॲड. तहसीन मिर्झा यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :Courtन्यायालयHigh Courtउच्च न्यायालय