शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

चाैघांचा कन्हान नदीत बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:06 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क खापरखेडा (नागपूर) : वाकी (ता. सावनेर) परिसरात पार्टी करायला आलेल्या नागपूर शहरातील आठ जणांपैकी चाैघे पाेहण्यासाठी ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

खापरखेडा (नागपूर) : वाकी (ता. सावनेर) परिसरात पार्टी करायला आलेल्या नागपूर शहरातील आठ जणांपैकी चाैघे पाेहण्यासाठी कन्हान नदीच्या पात्रात उतरले. पाेहताना पाण्याचा अंदाज चुकला आणि चाैघेही डाेहात गेल्याने बुडाले. यातील एकाचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात पाेलिसांना यश आले. ही घटना खापा (ता. सावनेर) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील वाकी शिवारातील कन्हान नदीच्या पात्रात मंगळवारी (दि. २२) दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली.

बुडालेल्या युवकांमध्ये ताेफिक आशिफ खान (१६, रा. शांतिनगर, नागपूर), प्रवीण गलाेरकर (१७, रा. जयभीम चाैक, यादवनगर, नागपूर), अतेश शेख नासिर शेख (१७, व्हीएचबी काॅलनी, नागपूर) व आरीफ अकबर पटेल (१६, रा. जयभीम चाैक, यादवनगर, नागपूर) या चाैघांचा समावेश असून, अतेशचा मृतदेह शाेधण्यात पाेलिसांना यश आले आहे.

या चाैघांसह तेजू प्रदीप पाेटपसे (२०, रा. पाचपावली, नागपूर), शायान रियाज काजी (१८, व्हीएचबी काॅलनी, नागपूर), पलाश जितेश जाेशी (२०, रा. तीननल चाैक, नागपूर) व विशाल भाईलाल चव्हाण (२५, रा. इंदिरामाता नगर, नागपूर) मंगळवारी दुपारी वाकी (ता. सावनेर) परिसरात पार्टी करायला हाेते. सर्व जण लगतच्या कन्हान नदीच्या काठावर फिरायला गेले. त्यातच ताेफिक, प्रवीण, अतेश व आरिफ पाेहण्यासाठी नदीच्या पात्रात उतरले, तर तेजू, शायान, पलाश व विशाल काठावर बसून हाेते.

काही वेळात चाैघेही पात्रात डाेहाच्या दिशेने गेले आणि खाेल पाण्यात गटांगळ्या खाऊ लागले. पाण्याबाहेर पडणे शक्य न झाल्याने चाैघेही बुडाले. माहिती मिळताच खापा पाेलिसांसह एसडीआरएफचे जवान घटनास्थळी दखल झाले. त्यांनी सायंकाळी ४.०५ वाजण्याच्या सुमारास अतेशचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. सायंकाळपर्यंत शाेधकार्य सुरू हाेते.

....

मुंबईहून आलेल्या मित्रांसाठी पार्टी

या आठ जणांपैकी एक मुंबईला राहताे. ताे नागपूरला आल्याने सर्वांनी वाकी परिसरातील द्वारका रिसाॅर्ट येथे पार्टीचा बेत आखला. या ठिकाणी पाेहाेचल्यावर त्यांना द्वारका रिसाॅर्ट बंद असल्याचे तसेच तिथे पार्टी करणे शक्य नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे सर्व जण जवळच असलेल्या कन्हान नदीच्या तीरावर फिरायला गेले आणि संकट ओढवून घेतले.

...

सूचना फलकाकडे दुर्लक्ष

हे सर्व जण ज्या ठिकाणी पाेहायला गेले, त्या ठिकाणी महसूल विभागाने फलक लावला आहे. या ठिकाणी नदीत असलेला डाेह धाेकादायक असून, कुणीही पाण्यात उतरू नये, असे आवाहनही या फलकाद्वारे तहसीलदारांनी केले आहे. मात्र, सर्वांनी याकडे दुर्लक्ष केले. या डाेहात मागील सहा ते सात वर्षात ५५ पेक्षा अधिक जणांचा बुडून मृत्यू झाला आहे.