शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

चाैघांचा कन्हान नदीत बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:06 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क खापरखेडा (नागपूर) : वाकी (ता. सावनेर) परिसरात पार्टी करायला आलेल्या नागपूर शहरातील आठ जणांपैकी चाैघे पाेहण्यासाठी ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

खापरखेडा (नागपूर) : वाकी (ता. सावनेर) परिसरात पार्टी करायला आलेल्या नागपूर शहरातील आठ जणांपैकी चाैघे पाेहण्यासाठी कन्हान नदीच्या पात्रात उतरले. पाेहताना पाण्याचा अंदाज चुकला आणि चाैघेही डाेहात गेल्याने बुडाले. यातील एकाचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात पाेलिसांना यश आले. ही घटना खापा (ता. सावनेर) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील वाकी शिवारातील कन्हान नदीच्या पात्रात मंगळवारी (दि. २२) दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली.

बुडालेल्या युवकांमध्ये ताेफिक आशिफ खान (१६, रा. शांतिनगर, नागपूर), प्रवीण गलाेरकर (१७, रा. जयभीम चाैक, यादवनगर, नागपूर), अतेश शेख नासिर शेख (१७, व्हीएचबी काॅलनी, नागपूर) व आरीफ अकबर पटेल (१६, रा. जयभीम चाैक, यादवनगर, नागपूर) या चाैघांचा समावेश असून, अतेशचा मृतदेह शाेधण्यात पाेलिसांना यश आले आहे.

या चाैघांसह तेजू प्रदीप पाेटपसे (२०, रा. पाचपावली, नागपूर), शायान रियाज काजी (१८, व्हीएचबी काॅलनी, नागपूर), पलाश जितेश जाेशी (२०, रा. तीननल चाैक, नागपूर) व विशाल भाईलाल चव्हाण (२५, रा. इंदिरामाता नगर, नागपूर) मंगळवारी दुपारी वाकी (ता. सावनेर) परिसरात पार्टी करायला हाेते. सर्व जण लगतच्या कन्हान नदीच्या काठावर फिरायला गेले. त्यातच ताेफिक, प्रवीण, अतेश व आरिफ पाेहण्यासाठी नदीच्या पात्रात उतरले, तर तेजू, शायान, पलाश व विशाल काठावर बसून हाेते.

काही वेळात चाैघेही पात्रात डाेहाच्या दिशेने गेले आणि खाेल पाण्यात गटांगळ्या खाऊ लागले. पाण्याबाहेर पडणे शक्य न झाल्याने चाैघेही बुडाले. माहिती मिळताच खापा पाेलिसांसह एसडीआरएफचे जवान घटनास्थळी दखल झाले. त्यांनी सायंकाळी ४.०५ वाजण्याच्या सुमारास अतेशचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. सायंकाळपर्यंत शाेधकार्य सुरू हाेते.

....

मुंबईहून आलेल्या मित्रांसाठी पार्टी

या आठ जणांपैकी एक मुंबईला राहताे. ताे नागपूरला आल्याने सर्वांनी वाकी परिसरातील द्वारका रिसाॅर्ट येथे पार्टीचा बेत आखला. या ठिकाणी पाेहाेचल्यावर त्यांना द्वारका रिसाॅर्ट बंद असल्याचे तसेच तिथे पार्टी करणे शक्य नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे सर्व जण जवळच असलेल्या कन्हान नदीच्या तीरावर फिरायला गेले आणि संकट ओढवून घेतले.

...

सूचना फलकाकडे दुर्लक्ष

हे सर्व जण ज्या ठिकाणी पाेहायला गेले, त्या ठिकाणी महसूल विभागाने फलक लावला आहे. या ठिकाणी नदीत असलेला डाेह धाेकादायक असून, कुणीही पाण्यात उतरू नये, असे आवाहनही या फलकाद्वारे तहसीलदारांनी केले आहे. मात्र, सर्वांनी याकडे दुर्लक्ष केले. या डाेहात मागील सहा ते सात वर्षात ५५ पेक्षा अधिक जणांचा बुडून मृत्यू झाला आहे.