शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

तासिका तत्त्वावरील गुरुजी चालवितात चहाटपरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्यात लवकरच प्राध्यापक भरती करण्यात येईल, असे उच्च व शिक्षणमंत्र्यांनी आश्वासन दिल्यावर तासिका तत्त्वावरील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राज्यात लवकरच प्राध्यापक भरती करण्यात येईल, असे उच्च व शिक्षणमंत्र्यांनी आश्वासन दिल्यावर तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांमध्ये उत्साह संचारला होता. मात्र, राज्यात हजारो पदे रिक्त असतानाही राज्य शासनाकडून प्राध्यापक भरतीसाठी काहीच पावले न उचलण्यात आल्यामुळे ही प्राध्यापक मंडळी निराश झाली आहेत. महागाई वाढत असताना तुटपुंज्या मानधनावर त्यांना समाधान मानावे लागत आहे. ऑनलाइन वर्गांत अनेकांना संधीच न मिळाल्यामुळे अक्षरश: एका प्राध्यापकाने तर चहाची टपरी चालविण्यास सुरुवात केली आहे. शिक्षणाप्रति शासन गंभीर असेल, तर तातडीने प्राध्यापक भरतीला सुरुवात करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

मागील अनेक वर्षांपासून विद्यापीठांमध्ये प्राध्यापक भरती झालेली नाही. अनेक अनुदानित महाविद्यालयांत पदे रिक्त आहेत. अनेक वर्षांपासून बहुतांश ठिकाणी तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांच्या भरवशावर वर्ग सुरू होते. आज ना उद्या पदभरती होईल व संधी मिळेल, या अपेक्षेने हे प्राध्यापक वर्षानुवर्षे काम करत आहेत. मात्र, शासनाच्या अनास्थेचा त्यांना फटका बसला आहे. नाईलाजाने घरखर्च भागविण्यासाठी काही जणांनी इतर छोटे व्यवसाय टाकले, तर एका प्राध्यापकाला चहाची टपरी टाकावी लागली.

कोरोनामुळे अडचणीत वाढ

विद्यापीठात तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांना अनेक महिने मानधनच मिळत नाही. महाविद्यालयांतही अशीच स्थिती आहे. कोरोनामुळे तर ऑनलाइन वर्ग सुरू झाले व अनेकांना बोलविण्याचे महाविद्यालयांनी टाळले. त्यामुळे मिळणारे मानधनही बंद झाले, अशी स्थिती आहे.

उच्चशिक्षणाचा फायदा काय?

तासिका तत्त्वावर कार्य करणारे अनेक प्राध्यापक नेट-सेटपैकी एक परीक्षा उत्तीर्ण आहेत. काही जणांना तर पीएच.डीही मिळाली आहे, परंतु त्यांना भरतीअभावी तासिका तत्त्वावरच काम करावे लागत आहे. जर वर्षाला काही हजारांचीच कमाई होणार असेल, तर अशा उच्चशिक्षणाचा फायदा तरी काय, असा सवाल ते उद्विग्नतेतून उपस्थित करत आहेत. अगदी रस्त्याच्या कडेला खाद्यपदार्थ विकणाऱ्यांची मिळकत जास्त असते. नैराश्यातून अनेक प्राध्यापकांनी तर त्यांचे क्षेत्रच बदलले आहे.

निष्क्रिय सरकारला जाग कधी येणार?

तासिका तत्त्वाची प्रथा ही उच्चशिक्षणाला लागलेली कीड आहे. आज आम्ही नेट-सेट, पीएच.डी यांसारख्या मोठ्या पदव्या प्राप्त करूनही तुटपुंज्या मानधनावर आम्ही काम करतो आहे. तेही दोन-दोन वर्षे मिळत नाही. तासिका तत्त्व प्रणालीमध्ये कुठल्याही कामगार कायद्याचे पालन केले जात नाही. म्हणूनच आमच्यापैकी बरेच पात्रताधारक आपला चरितार्थ चालण्यासाठी आज मजुरीवर जात आहेत, कोणी रोजगार हमीवर काम करत आहे, तर कुणी आपली चहाची टपरी टाकली आहे, परंतु अजूनही निष्क्रिय सरकारला जाग आलेली नाही.

- डॉ.विवेक कोरडे, तासिका तत्त्वावरील प्राध्यापक.

नेहमीच दाखविली केराची टोपली

सीएचबी तत्त्वावरील नोकरीत मिळणाऱ्या मानधनात प्राध्यापकांना स्वत:चा खर्चही भागविता येत नाही. अनेक जण उच्चशिक्षित असल्याने लहानमोठी कामे करायलाही समोर येत नाहीत. कोरोना महामारीची ढाल वापरून राज्य सरकारने प्रत्येक वेळी प्राध्यापक भरतीला केराची टोपलीच दाखविली. २०२०च्या सर्वेक्षणानुसार, राज्यात विविध महाविद्यालयांमध्ये ७० टक्के पदे रिक्त असताना, ४० टक्के भरतीचे आश्वासन का देण्यात आले.

-डॉ.प्रमोद लेंडे खैरगावकर, अध्यक्ष, महाराष्ट्र अंशकालीन प्राध्यापक संघटना.