शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

शहर स्वच्छतेचा ‘सीजीएस’मंत्र

By admin | Updated: January 3, 2015 02:40 IST

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून विभागातील नगरपालिका पातळीवरील शहरे स्वच्छ करण्याचा संकल्प आयुक्त कार्यालयाने केला असून...

नागपूर : केंद्र सरकारने जाहीर केलेल्या स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून विभागातील नगरपालिका पातळीवरील शहरे स्वच्छ करण्याचा संकल्प आयुक्त कार्यालयाने केला असून त्यासाठी नवीन वर्षात ‘सीजीएस’ (क्लीन ग्रीन सिटी/ स्वच्छ हिरवे शहर) ही संकल्पना राबविण्यावर भर दिला जाणार आहे.विभागीय उपायुक्त आप्पासाहेब धुळाज यांनी ही माहिती ‘लोकमत’शी बोलताना दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ आॅक्टोबरपासून स्वच्छ भारत अभियान देशपातळीवर राबविण्याचे आवाहन केले. त्याला राज्यातही विविध स्वंयसेवी संस्थांकडून चांगला प्रतिसाद मिळतो आहे. देशाचा पंतप्रधान हातात झाडून घेऊन स्वच्छतेबद्दल सांगतो याला एक वेगळेच महत्त्व आहे. त्यामुळेच त्यापासून प्रेरणा घेऊन नगरपंचायत आणि नगरपालिका पातळीवरील शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी आयुक्त कार्यालयाच्या माध्यमातून नवीन वर्षात काही उपक्रम हाती घेण्याचा विचार असून त्यात ‘सीजीएस’ या संकल्पनेचा समावेश आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. छोट्या नगर पंचायती आणि नगरपालिकांच्या ठिकाणी शाळा, महाविद्यालये, बाजारपेठा, दवाखाने आणि इतरही सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवणाऱ्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांकडून स्वच्छतेचे प्रमाणपत्र दिले जाईल व ते ठळकपणे संबंधित ठिकाणी लावले जातील. त्यापासून इतरांना प्रेरणा मिळावी हा यामागचा उद्देश असल्याचे धुळाज यांनी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे शहर स्वच्छ, हिरवे आणि सुरक्षित ठेवणाऱ्या नगरपालिका-नगरपंचायतींना प्रमाणपत्र देण्याचा विचारही प्रशासनाचा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.नागपूर विभागातील सहा जिल्ह्यातील विविध नगरपालिका-नगर पंचायत शहरातील सरासरी सहा हजारावर नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने स्वच्छता अभियानात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्याचाही फायदा या उपक्रमाला होण्याची शक्यता आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)