शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र सरकारने उच्च न्यायालयात जमा केले २५ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 00:33 IST

मुंबई उच्च न्यायालायाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशानुसार केंद्र सरकारने न्यायालयात २५ कोटी रुपये जमा केले आहे. जमा करण्यात येणारी रक्कम ही महामार्गाच्या दुरूस्तीसाठी अमरावती सार्वजनिक बांधकाम विभागाला सोपविण्यात येईल.

ठळक मुद्देमहामार्गाची दुरुस्ती व देखभालीचा नियोजनबद्ध कार्यक्रम दिला नाही

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालायाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशानुसार केंद्र सरकारने न्यायालयात २५ कोटी रुपये जमा केले आहे. गेल्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाने हे आदेश अमरावती ते मलकापूर व वर्धा ते सिंदखेड राजा या महामार्गाच्या दुरूस्ती व देखभालीसाठी नियोजनबद्ध कार्यक्रम ५ नोव्हेंबरपर्यंत सादर करण्यासाठी दिले होते. न्यायालयाने स्पष्ट केले होतो की, जमा करण्यात येणारी रक्कम ही महामार्गाच्या दुरूस्तीसाठी अमरावती सार्वजनिक बांधकाम विभागाला सोपविण्यात येईल.बुधवारी या प्रकरणी न्यायमूर्ती रवि देशपांडे व न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. दरम्यान केंद्र सरकारने माहिती दिली की, केंद्र सरकारच्या अधिकारक्षेत्रात येणाऱ्या राज्यातील १० किलोमीटर लांबीचे राज्य महामार्ग राज्य सरकारला हस्तांतरित करण्यात आले आहे. सोबतच वर्धा ते सिंदखेड राजा व बडनेरा ते धुळे मार्ग राज्य सरकारला हस्तांतरित केला आहे. यासंदर्भात अ‍ॅड. अरुण पाटील यांनी जनहित याचिका दाखल केली होती. गेल्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाने केंद्र सरकारला इशारा दिला होता की, २५ कोटी रुपये जमा न केल्यास संबंधित विभागाच्या सचिवाला प्रत्यक्ष न्यायालयापुढे उपस्थित रहावे लागेल. प्रकरणाची सुनावणी दोन आठवड्यासाठी स्थगित करण्यात आली आहे. काय आहे प्रकरणयाचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे की, दोन्ही महामार्ग अतिशय खराब झाले आहे. अपघात वाढले आहे. वाहन चालकांना भरपूर त्रास होत आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करणे गरजेचे आहे. न्यायालयाने अमरावती ते मलकापूर महामार्गाच्या कामाची माहिती घेण्यासाठी समितीचे गठन केले होते. या समितीने न्यायालयात अहवाल सादर केला होता. या अहवालानुसार या रस्त्यावर बरेच काम अपूर्ण आहे. त्याला तात्काळ पूर्ण करणे गरजेचे आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयCentral Governmentकेंद्र सरकार