शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय प्रवेश प्रणाली कागदावरच

By admin | Updated: June 1, 2017 02:19 IST

बारावीचे निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना आता प्रवेशाचे वेध लागले आहेत. मात्र यंदापासून केंद्रीय पद्धतीनेच

शासनाकडून अद्यापही निर्देश नाही : महाविद्यालयांतील प्रवेशप्रक्रिया संभ्रमातच लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : बारावीचे निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना आता प्रवेशाचे वेध लागले आहेत. मात्र यंदापासून केंद्रीय पद्धतीनेच प्रवेश देण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले होते. मात्र अंमलबजावणीसंदर्भात शासनाने कुठलेही पाऊल उचलले नसून ही प्रवेशप्रणाली अद्यापही कागदावरच आहे. अशा स्थितीत प्रवेशप्रक्रिया नेमकी कशा पद्धतीने करावी याबाबत महाविद्यालयांमध्ये संभ्रमच आहे. पुढील शैक्षणिक सत्रापासून विद्यापीठातील सर्व पदवी अभ्यासक्रमांसाठी केंद्रीय प्रवेश प्रणाली राबविणार असल्याची राज्य शासनाने घोषणा केली होती. नागपूर विद्यापीठानेदेखील याची तयारी केली होती. सुमारे दोन महिन्यांअगोदर राज्य शासनाच्या उच्च शिक्षण विभागाने विद्यापीठाला एक पत्र पाठविले. राज्यातील सर्व अकृषक विद्यापीठात केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येईल. त्यामुळे विद्यापीठाने स्वतंत्र प्रक्रिया राबवू नये, असे त्यात नमूद होते. तीन महिन्याअगोदर पुण्यात बैठकदेखील झाली. मात्र त्यानंतर कुठलीही पावले राज्य शासनाकडून उचलण्यात आली नाही. नागपूर विद्यापीठात सुमारे ६५० महाविद्यालये आहेत. यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांची महाविद्यालये सोडली तर कला, वाणिज्य व विज्ञान विद्याशाखेत महाविद्यालयांच्या स्तरावर प्रवेश होतात. सर्वच विद्यार्थ्यांचा कल नामांकित महाविद्यालयांत प्रवेश घेण्याकडे असतो. यामुळे अनेकदा एकच विद्यार्थी प्रवेशासाठी चार ते पाच महाविद्यालयांमध्ये वेगवेगळे अर्ज करतो. योजना बारगळणार ? केंद्रीभूत प्रवेश प्रणाली राबविण्यासाठी विविध निविदा प्रक्रिया व ‘डाटा’ गोळा करणे ही कामे करावी लागणार आहे. यासंदर्भात अद्यापपर्यंत कुठलेही पाऊल उचलण्यात आले नाही. इतक्या कमी वेळात ही माहिती गोळा करणे कठीण काम आहे. अशा स्थितीत राज्याने पुढाकार घेतला नाही तर केंद्रीय प्रवेशाची योजना बारगळण्याचीच चिन्हे आहेत. राज्य शासनाकडून उत्तरच नाही विद्यापीठांनी ही प्रक्रिया राबवू नये, शासनच यात पुढाकार घेईल, असे आम्हाला सांगण्यात आले होते. याबाबत शासनासोबत विद्यापीठातील अधिकाऱ्यांची बैठकदेखील झाली. मात्र त्यानंतर काहीच निर्देश आलेले नाहीत. आम्ही पत्रव्यवहारदेखील करून विचारणा केली. मात्र त्याचेदेखील उत्तर अद्याप आलेले नाही. बारावीचा निकाल लागला असल्यामुळे आता महाविद्यालयांच्या पातळीवरच प्रवेशप्रक्रिया राबविणे सोयीस्कर ठरणार आहे, असे मत नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी व्यक्त केले.