शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

केंद्रीय प्रवेश प्रणाली कागदावरच

By admin | Updated: June 1, 2017 02:19 IST

बारावीचे निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना आता प्रवेशाचे वेध लागले आहेत. मात्र यंदापासून केंद्रीय पद्धतीनेच

शासनाकडून अद्यापही निर्देश नाही : महाविद्यालयांतील प्रवेशप्रक्रिया संभ्रमातच लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : बारावीचे निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना आता प्रवेशाचे वेध लागले आहेत. मात्र यंदापासून केंद्रीय पद्धतीनेच प्रवेश देण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले होते. मात्र अंमलबजावणीसंदर्भात शासनाने कुठलेही पाऊल उचलले नसून ही प्रवेशप्रणाली अद्यापही कागदावरच आहे. अशा स्थितीत प्रवेशप्रक्रिया नेमकी कशा पद्धतीने करावी याबाबत महाविद्यालयांमध्ये संभ्रमच आहे. पुढील शैक्षणिक सत्रापासून विद्यापीठातील सर्व पदवी अभ्यासक्रमांसाठी केंद्रीय प्रवेश प्रणाली राबविणार असल्याची राज्य शासनाने घोषणा केली होती. नागपूर विद्यापीठानेदेखील याची तयारी केली होती. सुमारे दोन महिन्यांअगोदर राज्य शासनाच्या उच्च शिक्षण विभागाने विद्यापीठाला एक पत्र पाठविले. राज्यातील सर्व अकृषक विद्यापीठात केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येईल. त्यामुळे विद्यापीठाने स्वतंत्र प्रक्रिया राबवू नये, असे त्यात नमूद होते. तीन महिन्याअगोदर पुण्यात बैठकदेखील झाली. मात्र त्यानंतर कुठलीही पावले राज्य शासनाकडून उचलण्यात आली नाही. नागपूर विद्यापीठात सुमारे ६५० महाविद्यालये आहेत. यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांची महाविद्यालये सोडली तर कला, वाणिज्य व विज्ञान विद्याशाखेत महाविद्यालयांच्या स्तरावर प्रवेश होतात. सर्वच विद्यार्थ्यांचा कल नामांकित महाविद्यालयांत प्रवेश घेण्याकडे असतो. यामुळे अनेकदा एकच विद्यार्थी प्रवेशासाठी चार ते पाच महाविद्यालयांमध्ये वेगवेगळे अर्ज करतो. योजना बारगळणार ? केंद्रीभूत प्रवेश प्रणाली राबविण्यासाठी विविध निविदा प्रक्रिया व ‘डाटा’ गोळा करणे ही कामे करावी लागणार आहे. यासंदर्भात अद्यापपर्यंत कुठलेही पाऊल उचलण्यात आले नाही. इतक्या कमी वेळात ही माहिती गोळा करणे कठीण काम आहे. अशा स्थितीत राज्याने पुढाकार घेतला नाही तर केंद्रीय प्रवेशाची योजना बारगळण्याचीच चिन्हे आहेत. राज्य शासनाकडून उत्तरच नाही विद्यापीठांनी ही प्रक्रिया राबवू नये, शासनच यात पुढाकार घेईल, असे आम्हाला सांगण्यात आले होते. याबाबत शासनासोबत विद्यापीठातील अधिकाऱ्यांची बैठकदेखील झाली. मात्र त्यानंतर काहीच निर्देश आलेले नाहीत. आम्ही पत्रव्यवहारदेखील करून विचारणा केली. मात्र त्याचेदेखील उत्तर अद्याप आलेले नाही. बारावीचा निकाल लागला असल्यामुळे आता महाविद्यालयांच्या पातळीवरच प्रवेशप्रक्रिया राबविणे सोयीस्कर ठरणार आहे, असे मत नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी व्यक्त केले.