शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

केंद्राने बियाणे कायदा कडक करावा : सुनील केदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:08 IST

नागपूर : हंगामाच्या तोंडावर राज्यात मोठ्या प्रमाणावर बोगस बीटी बियाणे येते. ते रोखण्यासाठी राज्य सरकारची यंत्रणा कार्यरत असली तरीही ...

नागपूर : हंगामाच्या तोंडावर राज्यात मोठ्या प्रमाणावर बोगस बीटी बियाणे येते. ते रोखण्यासाठी राज्य सरकारची यंत्रणा कार्यरत असली तरीही कायद्यांमध्ये अनेक त्रुटी आहेत. त्यामुळे हा कायदा कठोर व्हावा, अशी मागणी पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री सुनील केदार यांनी पत्रकार परिषदेतून केली.

सुनील केदार म्हणाले, केंद्र सरकारने खतांच्या किमती मागे घ्याव्यात, ही राज्य सरकारची भूमिका आहे. बियाणांसंदर्भातील कायदा हा केंद्राचा आहे. नागपूर जिल्ह्यात मागील वर्षी बोगस बियाण्यांच्या १६ प्रकरणांची नोंद झाली आणि गुन्हे दाखल झाले; परंतु कायद्यांमध्ये अनेक त्रुटी आहेत. गुन्ह्याचा तपशील आल्यावर शास्त्रज्ञ त्यावर अभ्यास करतात, त्यांचा अहवाल येत नाही तोपर्यंत कारवाई होत नसल्याने बोगस बियाणे विकणाऱ्या कंपन्यांवर तातडीने कारवाई करता येत नाही.

मागील वर्षी राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली होती. त्याची मदत झाली. यावेळी खतांची दरवाढ २५ टक्के झाली. यावर केंद्र सरकारने फेरविचार करावा, अशी आमची मागणी आहे. केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारतमधील एकही योजना अद्याप सुरू झाली नाही. दुधाचे भाव स्थिर राहण्यासाठी आम्ही केंद्राकडे पैसे मागितले. मात्र, सहा महिन्यांपासून छदामही दिला नाही, अशी टीका त्यांनी केली.