शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
3
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
4
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
5
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
6
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
7
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
8
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
9
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
10
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
11
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
12
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
13
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
14
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
15
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
16
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

पश्चिम बंगालमधील हिंसाचार नियंत्रणासाठी केंद्राने पावले उचलावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकांनंतर तेथे सुरू असलेल्या राजकीय हिंसाचारावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नाराजी व्यक्त ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकांनंतर तेथे सुरू असलेल्या राजकीय हिंसाचारावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नाराजी व्यक्त केली आहे. पश्चिम बंगालमधील हिंसा पूर्वनियोजित आहे. तेथे लोक कायदा हातात घेत असताना तेथील शासन मूकदर्शक बनले आहे. केंद्र सरकाराने बंगालमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलावी व राज्य शासनालादेखील त्या दिशेने कारवाई करण्यास बाध्य करावे, असे संघातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी बंगालमधील स्थितीसंदर्भात निवेदन जारी केले आहे. लोकशाहीत निवडणुकांची मौलिक भूमिका असते. निवडणूक कालावधीत आरोप-प्रत्यारोप होतातच. मात्र सर्व पक्ष, उमेदवार, त्यांचे समर्थक व मतदार आपल्या देशातीलच नागरिक आहेत. पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर अनियंत्रित पद्धतीने सुरू असलेला हिंसाचार निंदनीय आहे. यामुळे कूचबिहार ते सुंदरबनपर्यंत जनतेमध्ये दहशतीचे वातावरण आहे. ही हिंसा भारतीय परंपरा तसेच भारतीय संविधान व लोकशाहीच्या मूळ भावनेच्या विरोधातील आहे. शासन व प्रशासन मूकदर्शक असल्याची बाब सर्वात जास्त दुःखद आहे. दंगे करणाऱ्यांमध्ये शासनकर्त्यांची कुठलीही भीती नाही व शासनाकडूनदेखील नियंत्रणासाठी प्रभावी पुढाकार घेण्यात आलेला नाही हे दुर्दैवी चित्र आहे, अशी भावना होसबळे यांनी व्यक्त केली.

समाजात कायदा-सुव्यवस्था अबाधित राखून शांतता स्थापित करणे हे कुठल्याही शासनाचे पहिले कर्तव्य असते. निवडणुकीत पक्षाचा विजय होतो, परंतु निवडून आलेले सरकार संपूर्ण समाजाप्रति जबाबदार असते. त्यामुळे बंगालमधील नवनिर्वाचित सरकारने त्वरित कायद्याचे राज्य प्रस्थापित करून दोषींना अटक केली पाहिजे, अशी मागणी संघातर्फे करण्यात आली आहे. या हिंसेविरोधात समाजातील विद्वान व बुद्धिजीवींसह विविध स्तरांतील लोकांनी एकत्रित येऊन सद्भावना व शांततेचे वातावरण निर्माण करण्यासाठी पुढाकार घ्यावा. तसेच पीडित कुटुंबांना आधार द्यावा, असे आवाहन होसबळे यांनी केले आहे.