शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

पश्चिम बंगालमधील हिंसाचार नियंत्रणासाठी केंद्राने पावले उचलावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकांनंतर तेथे सुरू असलेल्या राजकीय हिंसाचारावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नाराजी व्यक्त ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकांनंतर तेथे सुरू असलेल्या राजकीय हिंसाचारावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नाराजी व्यक्त केली आहे. पश्चिम बंगालमधील हिंसा पूर्वनियोजित आहे. तेथे लोक कायदा हातात घेत असताना तेथील शासन मूकदर्शक बनले आहे. केंद्र सरकाराने बंगालमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलावी व राज्य शासनालादेखील त्या दिशेने कारवाई करण्यास बाध्य करावे, असे संघातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी बंगालमधील स्थितीसंदर्भात निवेदन जारी केले आहे. लोकशाहीत निवडणुकांची मौलिक भूमिका असते. निवडणूक कालावधीत आरोप-प्रत्यारोप होतातच. मात्र सर्व पक्ष, उमेदवार, त्यांचे समर्थक व मतदार आपल्या देशातीलच नागरिक आहेत. पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर अनियंत्रित पद्धतीने सुरू असलेला हिंसाचार निंदनीय आहे. यामुळे कूचबिहार ते सुंदरबनपर्यंत जनतेमध्ये दहशतीचे वातावरण आहे. ही हिंसा भारतीय परंपरा तसेच भारतीय संविधान व लोकशाहीच्या मूळ भावनेच्या विरोधातील आहे. शासन व प्रशासन मूकदर्शक असल्याची बाब सर्वात जास्त दुःखद आहे. दंगे करणाऱ्यांमध्ये शासनकर्त्यांची कुठलीही भीती नाही व शासनाकडूनदेखील नियंत्रणासाठी प्रभावी पुढाकार घेण्यात आलेला नाही हे दुर्दैवी चित्र आहे, अशी भावना होसबळे यांनी व्यक्त केली.

समाजात कायदा-सुव्यवस्था अबाधित राखून शांतता स्थापित करणे हे कुठल्याही शासनाचे पहिले कर्तव्य असते. निवडणुकीत पक्षाचा विजय होतो, परंतु निवडून आलेले सरकार संपूर्ण समाजाप्रति जबाबदार असते. त्यामुळे बंगालमधील नवनिर्वाचित सरकारने त्वरित कायद्याचे राज्य प्रस्थापित करून दोषींना अटक केली पाहिजे, अशी मागणी संघातर्फे करण्यात आली आहे. या हिंसेविरोधात समाजातील विद्वान व बुद्धिजीवींसह विविध स्तरांतील लोकांनी एकत्रित येऊन सद्भावना व शांततेचे वातावरण निर्माण करण्यासाठी पुढाकार घ्यावा. तसेच पीडित कुटुंबांना आधार द्यावा, असे आवाहन होसबळे यांनी केले आहे.