शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

केंद्राने ओबीसींसाठी ५० टक्के आरक्षणाची मर्यादा रद्द करावी ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : केंद्र सरकारला खरच ओबीसींना पूर्ण राजकीय आरक्षण द्यायचे असेल तर केंद्राने सर्वोच्च न्यायलयाने घालून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : केंद्र सरकारला खरच ओबीसींना पूर्ण राजकीय आरक्षण द्यायचे असेल तर केंद्राने सर्वोच्च न्यायलयाने घालून दिलेली आरक्षणाची ५० टक्के मर्यादा रद्द करावी, त्यासाठी घटनेमध्ये तरतूद किंवा सुधारणा करून संपूर्ण देशातील ओबीसींना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत केली.

तायवाडे म्हणाले, राज्य सरकार ओबीसींना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. परंतु त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी ओबीसींना २७ टक्के आरक्षण मिळू शकत नाही. राज्य सरकारने अध्यादेश काढला. तो न्यायालयात टिकला तरी ५० टक्के आरक्षणाची मर्यादा असल्याने ओबीसींना पूर्ण २७ टक्के आरक्षण मिळणार नाही. कारण एससी, एसटी या दोन प्रवर्गास लोकसंख्येच्या आधारावर आरक्षण दिल्यानंतर उरलेले आरक्षण ओबीसींना मिळेल. ते २७ टक्केपेक्षा निश्चितच कमी राहील. हा संपूर्ण ओबीसी समाजासाठी धोका आहे. ओबीसींना पूर्ण २७ टक्के आरक्षण केवळ केंद्र सरकारच देऊ शकते. त्यासाठी त्यांनी ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवण्यासाठी घटनादुरुस्ती करावी, तसेच होऊ घातलेल्या जनगणनेमध्ये ओबीसी संवर्गाची जातनिहाय जनगणना करावी आणि भारतीय संविधानाच्या कलम २४३ डी (६) आणि संविधानाच्या कलम २४३ टी (६) मध्ये सुधारणा करून ओबीसी संवर्गात ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, महानगर पालिका, नगर परिषदा, नगर पंचायत्यांमध्ये ओबीसी संवर्गाला २७ टक्के राजकीय आरक्षण राहील, अशी तरतूद करावी, अशी मागणी त्यांनी केली. यासाठी केंद्राला एक महिन्याचा कालावधी देऊ. यानंतरची लढाई आता ओबीसींना पूर्ण २७ टक्के आरक्षण मिळवून देण्यासाठीच राहील, त्यासाठी संघर्ष करीत राहू, असे त्यांनी स्पष्ट केले. पत्रपरिषदेला महासंघाचे केंद्रीय सचिव शरद वानखेडे, राजकुमार घुले, त्रिशरण सहारे, संजय पन्नासे, गुणेश्वर आरीकर, सुरेंद्र भोरे, रोशन कुंभलकर उपस्थित होते.

- राज्यपालांकडे राजीनामा सादर

एकीकडे २७ टक्के आरक्षणाची मागणी करायची आणि दुसरीकडे मागासवर्ग आयोगात राहून कितीही काम केले तरी ते पूर्ण मिळणार नाही, हे माहिती असूनही त्याला मान्यता द्यावी, ही बाब नैतिकदृष्ट्या आपल्याला पटली नाही. त्यामुळे मी मागासवर्ग आयोगाच्या सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. शुक्रवारी राज्यपालांकडे अधिकृतपणे राजीनामा पत्र पाठवल्याचेही डॉ. बबनराव तायवाडे यांनी सांगितले.