शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
2
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
3
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
4
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
5
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
6
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
7
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
8
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
9
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
10
Ganesh Chaturthi 2025:वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
11
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; सासरच्यांनी पकडल्यावर मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून...,
12
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
13
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
14
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
15
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
16
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
17
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
18
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
19
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
20
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा

केंद्राने ओबीसींसाठी ५० टक्के आरक्षणाची मर्यादा रद्द करावी ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : केंद्र सरकारला खरच ओबीसींना पूर्ण राजकीय आरक्षण द्यायचे असेल तर केंद्राने सर्वोच्च न्यायलयाने घालून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : केंद्र सरकारला खरच ओबीसींना पूर्ण राजकीय आरक्षण द्यायचे असेल तर केंद्राने सर्वोच्च न्यायलयाने घालून दिलेली आरक्षणाची ५० टक्के मर्यादा रद्द करावी, त्यासाठी घटनेमध्ये तरतूद किंवा सुधारणा करून संपूर्ण देशातील ओबीसींना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत केली.

तायवाडे म्हणाले, राज्य सरकार ओबीसींना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. परंतु त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी ओबीसींना २७ टक्के आरक्षण मिळू शकत नाही. राज्य सरकारने अध्यादेश काढला. तो न्यायालयात टिकला तरी ५० टक्के आरक्षणाची मर्यादा असल्याने ओबीसींना पूर्ण २७ टक्के आरक्षण मिळणार नाही. कारण एससी, एसटी या दोन प्रवर्गास लोकसंख्येच्या आधारावर आरक्षण दिल्यानंतर उरलेले आरक्षण ओबीसींना मिळेल. ते २७ टक्केपेक्षा निश्चितच कमी राहील. हा संपूर्ण ओबीसी समाजासाठी धोका आहे. ओबीसींना पूर्ण २७ टक्के आरक्षण केवळ केंद्र सरकारच देऊ शकते. त्यासाठी त्यांनी ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवण्यासाठी घटनादुरुस्ती करावी, तसेच होऊ घातलेल्या जनगणनेमध्ये ओबीसी संवर्गाची जातनिहाय जनगणना करावी आणि भारतीय संविधानाच्या कलम २४३ डी (६) आणि संविधानाच्या कलम २४३ टी (६) मध्ये सुधारणा करून ओबीसी संवर्गात ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, महानगर पालिका, नगर परिषदा, नगर पंचायत्यांमध्ये ओबीसी संवर्गाला २७ टक्के राजकीय आरक्षण राहील, अशी तरतूद करावी, अशी मागणी त्यांनी केली. यासाठी केंद्राला एक महिन्याचा कालावधी देऊ. यानंतरची लढाई आता ओबीसींना पूर्ण २७ टक्के आरक्षण मिळवून देण्यासाठीच राहील, त्यासाठी संघर्ष करीत राहू, असे त्यांनी स्पष्ट केले. पत्रपरिषदेला महासंघाचे केंद्रीय सचिव शरद वानखेडे, राजकुमार घुले, त्रिशरण सहारे, संजय पन्नासे, गुणेश्वर आरीकर, सुरेंद्र भोरे, रोशन कुंभलकर उपस्थित होते.

- राज्यपालांकडे राजीनामा सादर

एकीकडे २७ टक्के आरक्षणाची मागणी करायची आणि दुसरीकडे मागासवर्ग आयोगात राहून कितीही काम केले तरी ते पूर्ण मिळणार नाही, हे माहिती असूनही त्याला मान्यता द्यावी, ही बाब नैतिकदृष्ट्या आपल्याला पटली नाही. त्यामुळे मी मागासवर्ग आयोगाच्या सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. शुक्रवारी राज्यपालांकडे अधिकृतपणे राजीनामा पत्र पाठवल्याचेही डॉ. बबनराव तायवाडे यांनी सांगितले.