शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

केंद्राने ओबीसींसाठी ५० टक्के आरक्षणाची मर्यादा रद्द करावी ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : केंद्र सरकारला खरच ओबीसींना पूर्ण राजकीय आरक्षण द्यायचे असेल तर केंद्राने सर्वोच्च न्यायलयाने घालून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : केंद्र सरकारला खरच ओबीसींना पूर्ण राजकीय आरक्षण द्यायचे असेल तर केंद्राने सर्वोच्च न्यायलयाने घालून दिलेली आरक्षणाची ५० टक्के मर्यादा रद्द करावी, त्यासाठी घटनेमध्ये तरतूद किंवा सुधारणा करून संपूर्ण देशातील ओबीसींना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत केली.

तायवाडे म्हणाले, राज्य सरकार ओबीसींना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. परंतु त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी ओबीसींना २७ टक्के आरक्षण मिळू शकत नाही. राज्य सरकारने अध्यादेश काढला. तो न्यायालयात टिकला तरी ५० टक्के आरक्षणाची मर्यादा असल्याने ओबीसींना पूर्ण २७ टक्के आरक्षण मिळणार नाही. कारण एससी, एसटी या दोन प्रवर्गास लोकसंख्येच्या आधारावर आरक्षण दिल्यानंतर उरलेले आरक्षण ओबीसींना मिळेल. ते २७ टक्केपेक्षा निश्चितच कमी राहील. हा संपूर्ण ओबीसी समाजासाठी धोका आहे. ओबीसींना पूर्ण २७ टक्के आरक्षण केवळ केंद्र सरकारच देऊ शकते. त्यासाठी त्यांनी ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवण्यासाठी घटनादुरुस्ती करावी, तसेच होऊ घातलेल्या जनगणनेमध्ये ओबीसी संवर्गाची जातनिहाय जनगणना करावी आणि भारतीय संविधानाच्या कलम २४३ डी (६) आणि संविधानाच्या कलम २४३ टी (६) मध्ये सुधारणा करून ओबीसी संवर्गात ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, महानगर पालिका, नगर परिषदा, नगर पंचायत्यांमध्ये ओबीसी संवर्गाला २७ टक्के राजकीय आरक्षण राहील, अशी तरतूद करावी, अशी मागणी त्यांनी केली. यासाठी केंद्राला एक महिन्याचा कालावधी देऊ. यानंतरची लढाई आता ओबीसींना पूर्ण २७ टक्के आरक्षण मिळवून देण्यासाठीच राहील, त्यासाठी संघर्ष करीत राहू, असे त्यांनी स्पष्ट केले. पत्रपरिषदेला महासंघाचे केंद्रीय सचिव शरद वानखेडे, राजकुमार घुले, त्रिशरण सहारे, संजय पन्नासे, गुणेश्वर आरीकर, सुरेंद्र भोरे, रोशन कुंभलकर उपस्थित होते.

- राज्यपालांकडे राजीनामा सादर

एकीकडे २७ टक्के आरक्षणाची मागणी करायची आणि दुसरीकडे मागासवर्ग आयोगात राहून कितीही काम केले तरी ते पूर्ण मिळणार नाही, हे माहिती असूनही त्याला मान्यता द्यावी, ही बाब नैतिकदृष्ट्या आपल्याला पटली नाही. त्यामुळे मी मागासवर्ग आयोगाच्या सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. शुक्रवारी राज्यपालांकडे अधिकृतपणे राजीनामा पत्र पाठवल्याचेही डॉ. बबनराव तायवाडे यांनी सांगितले.