शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
7
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
8
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
9
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
10
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
11
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
13
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
14
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
15
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
16
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
17
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
18
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
19
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
20
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO

‘माफसू’त स्थापन होणार ‘सेंटर फॉर वन हेल्थ’ : बलराम भार्गव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 00:11 IST

वर्तमान स्थितीत संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव ही मोठी समस्या झाली आहे. या आजारांचा प्रसार टाळणे व मानव पशुंच्या आरोग्यासोबतच वातावरणाचा समतोल राखणे अत्यावश्यक झाले आहे. यासाठी ‘वन हेल्थ’ची संकल्पना समोर आली आहे. ‘माफसू’ येथे ‘आयसीएमआर’तर्फे (इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्च) ‘सेंटर फॉर वन हेल्थ’ या केंद्राची स्थापना करण्यात येईल, अशी घोषणा ‘आयसीएमआर’चे महासंचालक व केंद्रीय आरोग्य संसोधन विभागाचे सचिव प्रा.बलराम भार्गव यांनी केली. ‘माफसू’च्या (महाराष्ट्र अ‍ॅनिमल अ‍ॅन्ड फिशरीज् सायन्सेस युनिव्हर्सिटी) नवव्या दीक्षांत समारंभादरम्यान ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

ठळक मुद्दे‘माफसू’च्या दीक्षांत समारंभात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वर्तमान स्थितीत संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव ही मोठी समस्या झाली आहे. या आजारांचा प्रसार टाळणे व मानव पशुंच्या आरोग्यासोबतच वातावरणाचा समतोल राखणे अत्यावश्यक झाले आहे. यासाठी ‘वन हेल्थ’ची संकल्पना समोर आली आहे. ‘माफसू’ येथे ‘आयसीएमआर’तर्फे (इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्च) ‘सेंटर फॉर वन हेल्थ’ या केंद्राची स्थापना करण्यात येईल, अशी घोषणा ‘आयसीएमआर’चे महासंचालक व केंद्रीय आरोग्य संसोधन विभागाचे सचिव प्रा.बलराम भार्गव यांनी केली. ‘माफसू’च्या (महाराष्ट्र अ‍ॅनिमल अ‍ॅन्ड फिशरीज् सायन्सेस युनिव्हर्सिटी) नवव्या दीक्षांत समारंभादरम्यान ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.सिव्हील लाईन्स येथील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला ‘माफसू’चे कुलगुरू प्रा.आशिष पातूरकर, कुलसचिव हेमंतकुमार पवार प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी २०१६-१७ व २०१७-१८ या शैक्षणिक वर्षातील ९९१ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. यात पदवीच्या ६६०, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या २६६ तर ५५ आचार्य पदवीधारकांचा समावेश होता. ४९ गुणवंत विद्यार्थ्यांचा सुवर्ण व रौप्य पदकांनी सन्मान करण्यात आला.दरवर्षी सरासरी नवनवीन आजाराचा प्रादुर्भाव व पुन:प्रसार होत असतो. ‘सेंटर फॉर वन हेल्थ’मुळे संसर्गजन्य आजार व त्यामुळे वातवारणात होणारे बदल याचेही निरीक्षण करता येणार आहे. ‘आयसीएमआर’तर्फे पुण्याच्या राष्ट्रीय विषाणु विज्ञान संस्थेच्या देखरेखीत ‘माफसू’च्या चार हेक्टर परिसरात देशातील हे केंद्र सुरू होईल, असे प्रा.भार्गव यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग शेतकऱ्यांच्या विकासासाठी करावा, असे आवाहनदेखील त्यांनी केले. प्रा. आशिष पातूरकर यांनी प्रास्ताविक केले व ‘माफसू’तील संशोधनावर प्रकाश टाकला. हेमंत पवार यांनी आभार मानले.वातावरणातील ७५ टक्के आजार पशुजन्यदरवर्षी नवनवीन आजारांचा प्रादुर्भाव होतो. यापैकी ७५ टक्के आजार हे पशुजन्य असतात. १९४० पासून आतापर्यंत ३४० हून अधिक रोगांचा प्रसार झाला आहे. यातील ६० टक्के रोग हे ‘झुनोटिक’ तर ७० टक्के वन्यजीवांमुळे प्रसारित झाले. मानवास बाधित करणाऱ्या १४ ते १५ घातक जीवाणूंपैकी ६१ टक्के हे पशुजन्य आहेत, असेदेखील प्रा.भार्गव यांनी यावेळी सांगितले.मधुरा विश्वासराव, खुशबू आडे यांना सर्वाधिक सात सुवर्णदीक्षांत समारंभादरम्यान २०१६-१७ व २०१७-१८ या वर्षांतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. मुंबईच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयाची विद्यार्थिनी मधुरा विश्वासराव हीचा २०१६-१७ या वर्षात अव्वल आल्याबद्दल सर्वाधिक सात सुवर्ण व दोन रौप्य पदकांनी सन्मान करण्यात आला तर २०१७-१८ या वर्षातील यशासाठी नागपूर येथील ‘माफसू’ची विद्यार्थिनी खुशबू आडेचा सात सुवर्ण व दोन रौप्य पदकांनी गौरव करण्यात आला. एकूण पदवीधारकांपैकी ७९९ ‘व्हेटरनरी’, ११६ ‘डेअरी टेक्नॉलॉजी’, तर ७६ विद्यार्थी ‘फिशरीज सायन्स’चे होते.

टॅग्स :Maharashtra animal and fishery sciences universityमहाराष्ट्र पशू व मत्स्यविज्ञान विद्यापीठnagpurनागपूर