शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
3
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
4
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
5
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
6
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
7
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
8
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
9
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
10
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
11
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
12
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
13
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
14
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
15
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
16
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
17
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
18
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
19
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
20
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?

एक सोहळा कर्तृत्वाचा अन् गौरवाचा

By admin | Updated: August 4, 2014 00:57 IST

समाजात डोके ठेवावे असे पायच शिल्लक राहिलेले नाहीत. त्यामुळे एखाद्या गुणी व्यक्तीचा समाजाने पुढाकार घेऊन गुणवत्तेच्या भरवशावर सत्कार केल्यास तो समाज प्रगतिशील असतो,

नव्वदीपूर्तीनिमित्त तु. वि. गेडाम यांचा सत्कारनागपूर : समाजात डोके ठेवावे असे पायच शिल्लक राहिलेले नाहीत. त्यामुळे एखाद्या गुणी व्यक्तीचा समाजाने पुढाकार घेऊन गुणवत्तेच्या भरवशावर सत्कार केल्यास तो समाज प्रगतिशील असतो, असे प्रतिपादन मान्यवर वक्त्यांनी आज येथे केले.सुप्रसिद्ध संशोधक, विचारवंत डॉ. तु. वि. गेडाम यांच्या नव्वदीपूर्तीनिमित्त वसंतराव देशपांडे सभागृहात समारंभाचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी डॉ. गोपीराजबाबा शास्त्री होते. व्यासपीठावर रनाईचे उपाध्यकुलाचार्य बिडकरबाबा, सुभद्रा शास्त्री कपाटे, माहुरकरबाबा शास्त्री, डॉ. सोनेपेठकर, कृष्णा आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वेदप्रकाश मिश्रा, कुलगुरू डॉ. राजू मानकर, केशरताई मेश्राम, अ‍ॅड. के. आर. शेंडे, दिवाकरबाबा गुर्जर, प्रा. राष्ट्रपाल मेश्राम उपस्थित होते. केशरताई मेश्राम म्हणाल्या, नव्या पिढीने तु. वि. गेडाम यांचा आदर्श घेतल्यास या सत्काराचे फलित होणार आहे. अ‍ॅड. के. आर. शेंडे यांनी साहित्याच्या माध्यमातून चक्रधरस्वामींचे विचार ग्रामीण भागात पोहोचविल्याचे सांगितले. कुलगुरू डॉ. राजू मानकर म्हणाले, समाजासाठी केलेल्या विधायक कामामुळे ९० वर्षाच्या वयातही त्यांना ऊर्जा मिळत असून त्यातूनच ते सकारात्मक दृष्टीने कार्य करतात. कृष्णा आयुुर्विज्ञान अभिमत विद्यापीठ कऱ्हाडचे कुलगुरू डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी संतांनी एका गुणवंत व्यक्तीच्या सत्कारासाठी पुढाकार घ्यावा यातून संत परंपरेत नवा आदर्श निर्माण झाल्याचे सांगितले. आचार्य सोनेपेठकर यांनी समाजाची घडण, मनुष्याचे कल्याण हे सूत्र घेऊन गेडामांनी कार्य केल्याची माहिती दिली. माहूरकरबाबा यांनी समाजकार्य करताना धर्म कार्याचा गेडाम यांना विसर पडला नसल्याचे सांगितले. आचार्य आत्याबाई यांनी उर्वरित आयुष्यात गेडाम यांच्याकडून समाजसेवा आणि धर्मसेवा घडावी, असे मत व्यक्त केले. मकरधोकडाचे न्यायंबासबाबा शास्त्री यांनी माणसाचे जीवन पाण्याप्रमाणे असून त्याला योग्य दिशा न मिळाल्यास ते वाया जात असल्याचे सांगितले. नागराजबाबा शास्त्री यांनी गेडाम यांनी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीवर प्रकाश टाकला. समारंभात डॉ. तु. वि. गेडाम, प्रभाताई गेडाम यांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि ९० हजाराची पिशवी देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरवग्रंथ आणि स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. प्रास्ताविक प्रा. राष्ट्रपाल मेश्राम यांनी केले. (प्रतिनिधी)