शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

मिट्टी को नमन, विरों को वंदन’ करून ‘शहीद दिन’ साजरा; विभागीय आयुक्तांनी दिली ‘पंचप्रण शपथ’

By आनंद डेकाटे | Updated: August 9, 2023 17:15 IST

देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांप्रती सन्मान म्हणून हातात ज्योत घेवून ही शपथ घेण्यात आली

नागपूर : हुतात्मादिनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या  सांगतेच्या औचित्याने आज ‘मेरी माटी मेरा देश’ या अभियानाची सुरुवात झाली आहे. भूमातेला वंदन तसेच स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या शहिदांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज हुतात्मादिनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना ‘पंचप्रण शपथ’ दिली.

‘भारतास वर्ष २०४७ पर्यंत आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनविण्याचे स्वप्न साकार करतांनाच गुलामगिरीची मानसिकता मुळापासून नष्ट करून देशाच्या समृद्ध वारशाचा गौरव करू, तसेच नागरिक म्हणून सर्व कर्तव्याचे पालन करू….’अशी  शपथ बिदरी यांनी उपस्थित  अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिली. यावेळी देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांप्रती सन्मान म्हणून हातात ज्योत घेवून ही शपथ घेण्यात आली. महसूल उपायुक्त दिपाली मोतियेळे, रोहयो उपायुक्त राजलक्ष्मी शहा, उपायुक्त  प्रदीप कुळकर्णी, धनंज सुटे, रमेश आडे, डॉ.कमलकिशोर फुटाणे, विवेक इलमे, , घनश्याम भूगावकर, चंद्रभान पराते, इंदिरा चौधरी आदी अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त वर्षभर आयोजित विविध उपक्रमांच्या समारोपीय उपक्रमांतर्गत नागपूर विभागातील सर्व ग्रामपंचायती व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ‘मेरी माटी मेरा देश’ या अभियानाला आजपासून सुरुवात झाली आहे. या उपक्रमांतर्गत शिलाफलक, वसुधावंदन अंतर्गत  ७५ देशी वृक्षांची लागवड करून अमृतसरोवर वाटिकांच्या परिसरात ध्वजारोहण, स्वातंत्र्य सैनिक व वीरांना वंदन आदी उपक्रमाचीही सुरुवात झाली आहे. यात विभागातील सर्व नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने सहभागी होण्याचे आवाहन बिदरी यांनी यावेळी केले. 

नागपूर विभागातील ३ हजार ६५६ ग्रामपंचायतींमध्ये ‘अमृत वाटिका’ तयार करण्यात येणार आहेत. या वाटिकांमध्ये सुमारे २ लाख ७४ हजार २०० देशी  वृक्षांची लागवड करण्यात येईल. त्यासोबत स्वातंत्र्य सैनिक व देशासाठी बलिदान  देणाऱ्या  वीरांना आदरांजली वाहण्यासाठी ग्रामपंचायतींमध्ये शिलाफलक उभारण्यात येणार आहेत. अमृत सरोवर येथील माती गोळा करून सन्मानपूर्वक तालुका स्तरावर एकत्र करण्यात येईल व ही माती असलेला ‘अमृत कलश’ राजधानी दिल्ली येथे होणाऱ्या मुख्य कार्यक्रमासाठी नागपूर विभागातील तालुक्यांतून निवड करण्यात आलेल्या एकूण ६३ युवकांमार्फत पाठविण्यात येईल. ‘मेरी माटी मेरा देश’ हा उपक्रम दिनांक ९ ते ३० ऑगस्ट दरम्यान साजरा होत आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका