शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
4
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
5
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
6
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
7
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
8
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
9
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
10
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
11
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
12
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
13
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
14
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
15
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
16
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
17
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
18
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
19
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
20
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
Daily Top 2Weekly Top 5

मिट्टी को नमन, विरों को वंदन’ करून ‘शहीद दिन’ साजरा; विभागीय आयुक्तांनी दिली ‘पंचप्रण शपथ’

By आनंद डेकाटे | Updated: August 9, 2023 17:15 IST

देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांप्रती सन्मान म्हणून हातात ज्योत घेवून ही शपथ घेण्यात आली

नागपूर : हुतात्मादिनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या  सांगतेच्या औचित्याने आज ‘मेरी माटी मेरा देश’ या अभियानाची सुरुवात झाली आहे. भूमातेला वंदन तसेच स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या शहिदांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज हुतात्मादिनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना ‘पंचप्रण शपथ’ दिली.

‘भारतास वर्ष २०४७ पर्यंत आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनविण्याचे स्वप्न साकार करतांनाच गुलामगिरीची मानसिकता मुळापासून नष्ट करून देशाच्या समृद्ध वारशाचा गौरव करू, तसेच नागरिक म्हणून सर्व कर्तव्याचे पालन करू….’अशी  शपथ बिदरी यांनी उपस्थित  अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिली. यावेळी देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांप्रती सन्मान म्हणून हातात ज्योत घेवून ही शपथ घेण्यात आली. महसूल उपायुक्त दिपाली मोतियेळे, रोहयो उपायुक्त राजलक्ष्मी शहा, उपायुक्त  प्रदीप कुळकर्णी, धनंज सुटे, रमेश आडे, डॉ.कमलकिशोर फुटाणे, विवेक इलमे, , घनश्याम भूगावकर, चंद्रभान पराते, इंदिरा चौधरी आदी अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त वर्षभर आयोजित विविध उपक्रमांच्या समारोपीय उपक्रमांतर्गत नागपूर विभागातील सर्व ग्रामपंचायती व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ‘मेरी माटी मेरा देश’ या अभियानाला आजपासून सुरुवात झाली आहे. या उपक्रमांतर्गत शिलाफलक, वसुधावंदन अंतर्गत  ७५ देशी वृक्षांची लागवड करून अमृतसरोवर वाटिकांच्या परिसरात ध्वजारोहण, स्वातंत्र्य सैनिक व वीरांना वंदन आदी उपक्रमाचीही सुरुवात झाली आहे. यात विभागातील सर्व नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने सहभागी होण्याचे आवाहन बिदरी यांनी यावेळी केले. 

नागपूर विभागातील ३ हजार ६५६ ग्रामपंचायतींमध्ये ‘अमृत वाटिका’ तयार करण्यात येणार आहेत. या वाटिकांमध्ये सुमारे २ लाख ७४ हजार २०० देशी  वृक्षांची लागवड करण्यात येईल. त्यासोबत स्वातंत्र्य सैनिक व देशासाठी बलिदान  देणाऱ्या  वीरांना आदरांजली वाहण्यासाठी ग्रामपंचायतींमध्ये शिलाफलक उभारण्यात येणार आहेत. अमृत सरोवर येथील माती गोळा करून सन्मानपूर्वक तालुका स्तरावर एकत्र करण्यात येईल व ही माती असलेला ‘अमृत कलश’ राजधानी दिल्ली येथे होणाऱ्या मुख्य कार्यक्रमासाठी नागपूर विभागातील तालुक्यांतून निवड करण्यात आलेल्या एकूण ६३ युवकांमार्फत पाठविण्यात येईल. ‘मेरी माटी मेरा देश’ हा उपक्रम दिनांक ९ ते ३० ऑगस्ट दरम्यान साजरा होत आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका