शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

सीबीएसई बारावीत मुलींचीच बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : सीबीएसईतर्फे विशेष सूत्रानुसार जाहीर करण्यात आलेल्या बारावीच्या निकालात नागपूर जिल्ह्यात मुलींनीच बाजी मारली असल्याचे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : सीबीएसईतर्फे विशेष सूत्रानुसार जाहीर करण्यात आलेल्या बारावीच्या निकालात नागपूर जिल्ह्यात मुलींनीच बाजी मारली असल्याचे चित्र आहे. सीबीएसईतर्फे परीक्षा घेण्यात आली नसली तरी ३०:३०:४० च्या सूत्रानुसार मिळालेल्या गुणांत विद्यार्थिनीच आघाडीवर आहेत. कोरोनाच्या संकटकाळात महत्त्वाच्या वर्षाला सामोर गेलेल्या विद्यार्थी व पालकांमध्ये निकाल लांबल्याने धाकधूक निर्माण झाली होती. शुक्रवारी जाहीर झालेल्या निकालात काही जणांनी अपेक्षित गुण मिळाल्याची भावना व्यक्त केली.

कोरोनामुळे यावर्षी पारंपरिक पद्धतीने परीक्षा होऊ शकली नाही. त्यामुळे सीबीएसईने ३०:३०:४० या सूत्राचा वापर केला होता. बारावीच्या वर्षात शालेय पातळीवर घेण्यात आलेल्या घटक चाचण्या, प्रात्यक्षिके, प्रथम सत्र परीक्षा यांच्या आधारे निकाल तयार करण्यात आला. या सूत्रात दहावी व अकरावीतील गुणांचादेखील विचार करण्यात आला.

विविध शाळांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार नागपूर जिल्ह्याचा निकाल ९९.३० ते ९९.४० टक्के इतका लागला. अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारावर जाहीर झालेल्या निकालात ९९ टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सात आहे. यातही मुलींची संख्या जास्त आहे. ९५ टक्के ते ९९ टक्के गुण प्राप्त करणाऱ्यांमध्येदेखील विद्यार्थिनींचाच वरचष्मा दिसून आला. जिल्ह्यातून सव्वाशेहून अधिक विद्यार्थ्यांना ९५ टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत.

मानव्यशास्त्र विभागात सर्वाधिक गुण

दरवर्षी निकालांत विज्ञान किंवा वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांना सर्वाधिक गुण असतात. परंतु, यावर्षी मानव्यशास्त्र शाखेच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे. मानव्यशास्त्र विभागात सर्वाधिक गुणांची टक्केवारी ९९.२० टक्के इतकी आहे. विज्ञान शाखेत ९८.६०, तर वाणिज्यमध्ये ९८.८ टक्के ही सर्वाधिक टक्केवारी आहे.

‘सेलिब्रेशन’मध्येदेखील विद्यार्थिनींचाच उत्साह

कोरोनाच्या निर्बंधांमुळे विद्यार्थ्यांचे बहुतांश वर्ग ऑनलाईनच झाले. निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी शाळांमध्ये येतील अशी शिक्षकांनादेखील अपेक्षा नव्हती. मात्र, काही विद्यार्थ्यांनी शाळांकडे धाव घेतली व निकालाचे ‘सेलिब्रेशन’ केले. यातदेखील विद्यार्थिनींचाच जास्त उत्साह दिसून आला.

निकालामुळे काहींचा अपेक्षाभंग

यंदा निकाल जाहीर करण्याचे सूत्रच बदलल्याने अनेकांच्या निकालावर परिणाम झाला आहे. वर्षभर खूप मेहनत करूनदेखील अनेकांना कमी गुण मिळाले आहे. अपेक्षेपेक्षा चार ते पाच टक्के कमी गुण मिळाले असून, सीबीएसईच्या सूत्रामुळे हा फटका बसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

अनेक शाळांचा निकाल ‘सेंट परसेंट’

यंदा विशेष सूत्रानुसार निकाल जाहीर झाला असला तरी जिल्ह्यातील अनेक नामांकित शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. परंतु, काही शाळांमधील विद्यार्थ्यांना अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याचे दिसून आले.