शहरं
Join us  
Trending Stories
1
७/११तील दोषींची निर्दोष मुक्तता, उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने...”
2
नवी मुंबईत भाजपा आमदारानं मनसेला डिवचलं; मराठी भाषेत लावलेली पाटी काढून गुजरातीत लावली
3
“शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार हनी ट्रॅपमुळे पळाले”; संजय राऊतांचा दावा, सरकारवर टीका
4
झोपेच्या गोळ्या, शॉक दिला... बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याचा काढला काटा, कुटुंबाने केली 'ही' मागणी
5
पहिल्या तिमाहीचे निकाल, बोनस आणि डिविडेंडची घोषणा; 'या' बँकेचा शेअर चमकला, तुमच्याकडे आहे?
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये लष्कराने लक्ष्य साध्य केले, जगाने भारताची ताकद पाहिली'; अधिवेशनाआधी पीएम मोदी म्हणाले...
7
IND vs ENG : टीम इंडियात नव्या चेहऱ्याची एन्ट्री; या पठ्ठ्यानं एका डावात अख्खा संघ केला होता गारद
8
Mumbai Bomb Blast 2006: शंका... १०० दिवस... बॉम्बचा प्रकार! उच्च न्यायालयाने 'हे' तीन तर्क लावत 7/11 मुंबई स्फोटाच्या दोषींना ठरवलं निर्दोष
9
रेअर अर्थ मॅग्नेट्सवर चीनची 'धक्कादायक' खेळी! जगभरातील कारखान्यांचा जीव भांड्यात, नेमकं काय केलं?
10
मोठी बातमी! मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोटातील १२ दोषींची निर्दोष मुक्तता, राज्य सरकारला दणका
11
Anthem Biosciences Ltd IPO: जबरदस्त लिस्टिंग! पहिल्याच दिवशी प्रत्येक शेअरवर ₹१५३ चा फायदा; ₹७४० पार पोहोचला भाव, गुंतवणूकदार मालामाल
12
इवलुशा राखीतून जन्म घेतील वृक्षवेली, आमचे यंदा पर्यावरणाशी रक्षाबंधन! तुमच्या शाळेत?
13
छावा संघटना मारहाण: राष्ट्रवादीचे युवा शाखेचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण फरार; ११ जणांवर गुन्हा दाखल
14
राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाण यांच्यासह ११ जणांवर गुन्हा दाखल; छावा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण प्रकरणी कारवाई
15
हा हल्ला पूर्वनियोजित, सुनील तटकरेंच्या सांगण्यावरून...; विजय घाडगे पाटलांचा मोठा दावा
16
भयानक PHOTO's! ११ जुलै २००६ चा मुंबई लोकल बॉम्बस्फोट; आरोपी निर्दोष सुटले पण... जखमा आजही कायम...
17
Vi युझर्ससाठी महत्त्वाची बातमी, स्वस्त रिचार्ज प्लान्समध्ये केले बदल; Airtel आणि Jio काय करणार?
18
IndiGo : विमान ४० मिनिटे हवेत फिरत राहिले, तिरुपतीहून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग
19
Stock Market Today: किरकोळ तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; Bank Nifty सुस्साट, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
जडीबुटी विकणाऱ्या दोन साधूंना मुले चोरणारे समजून मारहाण; थोडक्यात टळली पालघर घटनेची पुनरावृत्ती

सीबीएसई बारावीत मुलींचीच बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : सीबीएसईतर्फे विशेष सूत्रानुसार जाहीर करण्यात आलेल्या बारावीच्या निकालात नागपूर जिल्ह्यात मुलींनीच बाजी मारली असल्याचे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : सीबीएसईतर्फे विशेष सूत्रानुसार जाहीर करण्यात आलेल्या बारावीच्या निकालात नागपूर जिल्ह्यात मुलींनीच बाजी मारली असल्याचे चित्र आहे. सीबीएसईतर्फे परीक्षा घेण्यात आली नसली तरी ३०:३०:४० च्या सूत्रानुसार मिळालेल्या गुणांत विद्यार्थिनीच आघाडीवर आहेत. कोरोनाच्या संकटकाळात महत्त्वाच्या वर्षाला सामोर गेलेल्या विद्यार्थी व पालकांमध्ये निकाल लांबल्याने धाकधूक निर्माण झाली होती. शुक्रवारी जाहीर झालेल्या निकालात काही जणांनी अपेक्षित गुण मिळाल्याची भावना व्यक्त केली.

कोरोनामुळे यावर्षी पारंपरिक पद्धतीने परीक्षा होऊ शकली नाही. त्यामुळे सीबीएसईने ३०:३०:४० या सूत्राचा वापर केला होता. बारावीच्या वर्षात शालेय पातळीवर घेण्यात आलेल्या घटक चाचण्या, प्रात्यक्षिके, प्रथम सत्र परीक्षा यांच्या आधारे निकाल तयार करण्यात आला. या सूत्रात दहावी व अकरावीतील गुणांचादेखील विचार करण्यात आला.

विविध शाळांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार नागपूर जिल्ह्याचा निकाल ९९.३० ते ९९.४० टक्के इतका लागला. अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारावर जाहीर झालेल्या निकालात ९९ टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सात आहे. यातही मुलींची संख्या जास्त आहे. ९५ टक्के ते ९९ टक्के गुण प्राप्त करणाऱ्यांमध्येदेखील विद्यार्थिनींचाच वरचष्मा दिसून आला. जिल्ह्यातून सव्वाशेहून अधिक विद्यार्थ्यांना ९५ टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत.

मानव्यशास्त्र विभागात सर्वाधिक गुण

दरवर्षी निकालांत विज्ञान किंवा वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांना सर्वाधिक गुण असतात. परंतु, यावर्षी मानव्यशास्त्र शाखेच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे. मानव्यशास्त्र विभागात सर्वाधिक गुणांची टक्केवारी ९९.२० टक्के इतकी आहे. विज्ञान शाखेत ९८.६०, तर वाणिज्यमध्ये ९८.८ टक्के ही सर्वाधिक टक्केवारी आहे.

‘सेलिब्रेशन’मध्येदेखील विद्यार्थिनींचाच उत्साह

कोरोनाच्या निर्बंधांमुळे विद्यार्थ्यांचे बहुतांश वर्ग ऑनलाईनच झाले. निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी शाळांमध्ये येतील अशी शिक्षकांनादेखील अपेक्षा नव्हती. मात्र, काही विद्यार्थ्यांनी शाळांकडे धाव घेतली व निकालाचे ‘सेलिब्रेशन’ केले. यातदेखील विद्यार्थिनींचाच जास्त उत्साह दिसून आला.

निकालामुळे काहींचा अपेक्षाभंग

यंदा निकाल जाहीर करण्याचे सूत्रच बदलल्याने अनेकांच्या निकालावर परिणाम झाला आहे. वर्षभर खूप मेहनत करूनदेखील अनेकांना कमी गुण मिळाले आहे. अपेक्षेपेक्षा चार ते पाच टक्के कमी गुण मिळाले असून, सीबीएसईच्या सूत्रामुळे हा फटका बसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

अनेक शाळांचा निकाल ‘सेंट परसेंट’

यंदा विशेष सूत्रानुसार निकाल जाहीर झाला असला तरी जिल्ह्यातील अनेक नामांकित शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. परंतु, काही शाळांमधील विद्यार्थ्यांना अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याचे दिसून आले.