शहरं
Join us  
Trending Stories
1
इसकी टोपी उसके सर और उसकी...; कोकाटे आणि दत्तात्रय भरणे यांच्यातील मंत्रि‍पदाची आदलाबदली!
2
प्रांजल खेवलकरच्या लॅपटॉपमध्ये अनेक महिलांचे पार्टी अन् त्यानंतरचे आक्षेपार्ह व्हिडिओ!
3
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!
4
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
5
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
6
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
7
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
8
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
9
सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी उत्तम संधी, लवकरच ओआयसीएलमध्ये मोठी भरती!
10
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
11
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
12
सात वर्षांत ४२ वेळा तिने दिला नकार, अखेर ४३व्यावेळी त्यानं केलं असं काही, नकारच देऊ शकली नाही ती
13
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
14
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
15
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
16
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
17
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
18
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
19
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
20
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्

सीबीएसई बोर्डाप्रमाणे राज्य मंडळाने दहावीची परीक्षा रद्द करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:07 IST

नागपूर : मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांनी दहावी सीबीएसई बोर्डाच्या निर्णयाप्रमाणे राज्य मंडळाची दहावी बोर्डाची परीक्षा कोणताही दुजाभाव न करता ...

नागपूर : मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांनी दहावी सीबीएसई बोर्डाच्या निर्णयाप्रमाणे राज्य मंडळाची दहावी बोर्डाची परीक्षा कोणताही दुजाभाव न करता रद्द करावी, अशी मागणी शिक्षक, संस्थाचालक व पालकांच्या संघटनांकडून होत आहे.

सीबीएसई बोर्डाने दहावीच्या परीक्षा रद्द करण्याबाबत निर्णय घेतला. मात्र, राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सोशल मीडियावर जून महिन्यात परीक्षा होईल, असे घोषित केले. त्यामुळे हा निर्णय विद्यार्थ्यांची दिशाभूल करण्याचा व त्यांचे शैक्षणिक वर्ष धोक्यात आणणारा असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे.

दहावीनंतर अकरावीत प्रवेश घेणे, नीट, जेईई, क्लासेस लावणे, परीक्षा, इतर सर्व नियोजन सदर घोषणेने बिघडल्याने पालक नाराज आहेत. कारण जून महिन्यात परीक्षा होईल की नाही, हे सुद्धा कोरोना लाटेमुळे सांगता येत नाही. त्यामुळे पुढील शैक्षणिक नियोजन करणे शक्य नाही.

- सध्याची परिस्थिती राज्यात फारच चिंताजनक आहे व प्रत्येक पालक चिंतेत आहे. लाखो परिवार कोरोना संक्रमनाने ग्रस्त आहेत, कित्येक परिवारातील जीव गेलेले आहेत, विद्यार्थी अनाथ झालेले आहेत, अशा परिस्थितीत खरंच विद्यार्थी परीक्षा देतील काय, तसेच केंद्र मंडळ परीक्षा घेणार नाही व राज्य मंडळ परीक्षा घेणार, हा एकाच वर्गातील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय आहे.

प्रा. सचिन काळबांडे, अध्यक्ष, आरटीई फाउंडेशन

- दहावी व बारावी परीक्षेवर कोरोना संक्रमण खाजगी शाळा व शिक्षक यांच्या आर्थिक अडचणीमुळे ते शाळेत येण्यास तयार नाहीत. परीक्षेच्या नियोजनात अडचण येणार आहे.

राम वंजारी, संस्थाचालक

- शिक्षणमंत्र्यांनी तातडीने याचा विचार करून सीबीएसई बोर्डाने घेतलेल्या निर्णयाप्रमाणे परीक्षा रद्द करून दहाव्या वर्गालाही इतर वर्गाप्रमाणे प्रमोट करावे.

अर्चना ढबाले, संचालक

- शिक्षणमंत्री म्हणतात जूनमध्ये परीक्षा होईल; पण राज्याची परिस्थिती लक्षात घेता शक्य आहे का, विद्यार्थ्यांच्या िजिवाशी खेळ करण्यापेक्षा सरसकट परीक्षा रद्द करावी. उगाच पालक व विद्यार्थ्यांची डोकेदुखी वाढविण्यात काही अर्थ नाही.

विनोद बांगडे, पालक

- यावर्षी अनेक शाळांमध्ये सत्रच झाले नाही. ग्रामीण भागात विद्यार्थ्यांनी पुस्तकेच उघडले नाही. शहरातील विद्यार्थ्यांनी ऑनलाइन शिक्षण घेतले, पण सर्वच विद्यार्थ्यांच्या पचनी पडले नाही. सरकारने परीक्षा घेऊन ग्रामीण, शहरीमध्ये दुजाभाव करण्यापेक्षा सर्वसमावेशक निर्णय घ्यावा.

राजेंद्र अतकर, शिक्षक