शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

फुलकोबी ६० तर मेथी ८० रुपये किलो!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:12 IST

श्याम नाडेकर लोकमत न्यूज नेटवर्क नरखेड : मागणीपेक्षा पुरवठा कमी झाला की भाववाढ होते. सध्या भाजीबाजारात मागणीपेक्षा आवक कमी ...

श्याम नाडेकर

लोकमत न्यूज नेटवर्क

नरखेड : मागणीपेक्षा पुरवठा कमी झाला की भाववाढ होते. सध्या भाजीबाजारात मागणीपेक्षा आवक कमी असल्यामुळे पावसाळ्यापूर्वी २० रुपये किलो असलेली फुलकोबी आता ६० रुपये किलो तर, ४० रुपये किलो असलेली मेथी ८० रुपये किलो झाली आहे. पालेभाज्यांच्या दरात झालेल्या वाढीमुळे गृहिणींचे किचन बजेट बिघडले आहे. नरखेड तालुक्यात एक हजार हेक्टरमध्ये भाजीपाल्याचे उत्पादन घेतल्या जाते. मेथी, टमाटर, फुलकोबी, पत्ताकोबी, कोथिंबीर, कारले व काकडीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन शेतकरी घेतात. त्यामुळे ताजा व स्वस्त दरात भाजीपाला बाजारात मिळतो. परंतु गत दोन महिन्यात मागणीपेक्षा आवक कमी, पावसामुळे वाहतुकीवर झालेला परिणाम, वाहन खर्चात झालेली वाढ, वातावरणाचा पिकांवर होणारा परिणाम यामुळे काही भाजीपाल्याच्या दरात वाढ तर, विशेषतः पालेभाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. काहींच्या दरात घसरण झाल्याचे भाजीपाला व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

पावसाळ्यापूर्वी असे होते दर

पावसाळ्यापूर्वी पुढीलप्रमाणे प्रति किलो दर होते. मेथी ४० रुपये, पालक १५ रुपये, कोथिंबीर ४० रुपये, गवार ४० रुपये, चवळी भाजी २० रुपये, काकडी ४० रुपये, टमाटर ४० रुपये, कारले ६० रुपये, फुलकोबी २० रुपये, मिरची ६० रुपये, वांगी ४०, भेंडी ४० रुपये.

१० ऑगस्टचे दर असे

नरखेडच्या बाजारात मंगळवारी (दि. १०) मेथी ८० रुपये, पालक २० रुपये, कोथिंबीर ८० रुपये, गवार ६० रुपये, चवळी भाजी ४० रुपये, काकडी २० रुपये, टमाटर २० रुपये, कारले ८० रुपये, फुलकोबी ६० रुपये, मिरची ८० रुपये, वांगी ३०, भेंडी ३० रुपये प्रति किलो असा दर होता.

छिंदवाडा येथून आवक

तालुक्यात कोबी, पालक, कोशिंबीर, भेंडी, काकडी, टमाटर, वांगी स्थानिक शेतकऱ्याकडून व मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथून येते. मिरची अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातून येते.

--

भाजीबाजारात शेतकरी दलालांना माल देतात. दलालाकडून आम्ही घेतो. बाजारात एखाद्या भाजीची आवक कमी झाली की लिलावात बोली बोलणारे जास्त असतात, त्यामुळे आम्ही चढ्या भावाने खरेदी करतो. त्यावर १०-१५ टक्के वाढवून आम्ही विक्री करतो. पावसाळ्यात पालक, मेथी, कोशिंबीर मोठ्या प्रमाणात खराब होते. ती घट भरून काढण्याकरिता निरुपाय होऊन भाव वाढवावेच लागतात .

चंदू नाडेकर , नरखेड

--

घरी वापराच्या कोणत्याही जिन्नसाचे दर वाढले की गृहिणीचे महिन्याचे बजेट बिघडते. जुळवाजुळव करण्याकरिता तारावरचीच कसरत करावी लागते. किचन मॅनेजमेंट हा गृहिणींना लाभलेला दैवी गुण असल्यामुळे थोडा त्रास होतो, परंतु होऊन जाते.

शालिनी अरसडे, गृहिणी, नरखेड