शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

फुलकोबी ६० तर मेथी ८० रुपये किलो!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:12 IST

श्याम नाडेकर लोकमत न्यूज नेटवर्क नरखेड : मागणीपेक्षा पुरवठा कमी झाला की भाववाढ होते. सध्या भाजीबाजारात मागणीपेक्षा आवक कमी ...

श्याम नाडेकर

लोकमत न्यूज नेटवर्क

नरखेड : मागणीपेक्षा पुरवठा कमी झाला की भाववाढ होते. सध्या भाजीबाजारात मागणीपेक्षा आवक कमी असल्यामुळे पावसाळ्यापूर्वी २० रुपये किलो असलेली फुलकोबी आता ६० रुपये किलो तर, ४० रुपये किलो असलेली मेथी ८० रुपये किलो झाली आहे. पालेभाज्यांच्या दरात झालेल्या वाढीमुळे गृहिणींचे किचन बजेट बिघडले आहे. नरखेड तालुक्यात एक हजार हेक्टरमध्ये भाजीपाल्याचे उत्पादन घेतल्या जाते. मेथी, टमाटर, फुलकोबी, पत्ताकोबी, कोथिंबीर, कारले व काकडीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन शेतकरी घेतात. त्यामुळे ताजा व स्वस्त दरात भाजीपाला बाजारात मिळतो. परंतु गत दोन महिन्यात मागणीपेक्षा आवक कमी, पावसामुळे वाहतुकीवर झालेला परिणाम, वाहन खर्चात झालेली वाढ, वातावरणाचा पिकांवर होणारा परिणाम यामुळे काही भाजीपाल्याच्या दरात वाढ तर, विशेषतः पालेभाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. काहींच्या दरात घसरण झाल्याचे भाजीपाला व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

पावसाळ्यापूर्वी असे होते दर

पावसाळ्यापूर्वी पुढीलप्रमाणे प्रति किलो दर होते. मेथी ४० रुपये, पालक १५ रुपये, कोथिंबीर ४० रुपये, गवार ४० रुपये, चवळी भाजी २० रुपये, काकडी ४० रुपये, टमाटर ४० रुपये, कारले ६० रुपये, फुलकोबी २० रुपये, मिरची ६० रुपये, वांगी ४०, भेंडी ४० रुपये.

१० ऑगस्टचे दर असे

नरखेडच्या बाजारात मंगळवारी (दि. १०) मेथी ८० रुपये, पालक २० रुपये, कोथिंबीर ८० रुपये, गवार ६० रुपये, चवळी भाजी ४० रुपये, काकडी २० रुपये, टमाटर २० रुपये, कारले ८० रुपये, फुलकोबी ६० रुपये, मिरची ८० रुपये, वांगी ३०, भेंडी ३० रुपये प्रति किलो असा दर होता.

छिंदवाडा येथून आवक

तालुक्यात कोबी, पालक, कोशिंबीर, भेंडी, काकडी, टमाटर, वांगी स्थानिक शेतकऱ्याकडून व मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथून येते. मिरची अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातून येते.

--

भाजीबाजारात शेतकरी दलालांना माल देतात. दलालाकडून आम्ही घेतो. बाजारात एखाद्या भाजीची आवक कमी झाली की लिलावात बोली बोलणारे जास्त असतात, त्यामुळे आम्ही चढ्या भावाने खरेदी करतो. त्यावर १०-१५ टक्के वाढवून आम्ही विक्री करतो. पावसाळ्यात पालक, मेथी, कोशिंबीर मोठ्या प्रमाणात खराब होते. ती घट भरून काढण्याकरिता निरुपाय होऊन भाव वाढवावेच लागतात .

चंदू नाडेकर , नरखेड

--

घरी वापराच्या कोणत्याही जिन्नसाचे दर वाढले की गृहिणीचे महिन्याचे बजेट बिघडते. जुळवाजुळव करण्याकरिता तारावरचीच कसरत करावी लागते. किचन मॅनेजमेंट हा गृहिणींना लाभलेला दैवी गुण असल्यामुळे थोडा त्रास होतो, परंतु होऊन जाते.

शालिनी अरसडे, गृहिणी, नरखेड