शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत जास्मिन लांबोरियाची 'सुवर्ण' कामगिरी!
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
4
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
5
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
6
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
7
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
8
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
9
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
10
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
11
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
12
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
13
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
14
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
15
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
16
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
17
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
18
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
19
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
20
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!

फुलकोबी ६० तर मेथी ८० रुपये किलो!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:12 IST

श्याम नाडेकर लोकमत न्यूज नेटवर्क नरखेड : मागणीपेक्षा पुरवठा कमी झाला की भाववाढ होते. सध्या भाजीबाजारात मागणीपेक्षा आवक कमी ...

श्याम नाडेकर

लोकमत न्यूज नेटवर्क

नरखेड : मागणीपेक्षा पुरवठा कमी झाला की भाववाढ होते. सध्या भाजीबाजारात मागणीपेक्षा आवक कमी असल्यामुळे पावसाळ्यापूर्वी २० रुपये किलो असलेली फुलकोबी आता ६० रुपये किलो तर, ४० रुपये किलो असलेली मेथी ८० रुपये किलो झाली आहे. पालेभाज्यांच्या दरात झालेल्या वाढीमुळे गृहिणींचे किचन बजेट बिघडले आहे. नरखेड तालुक्यात एक हजार हेक्टरमध्ये भाजीपाल्याचे उत्पादन घेतल्या जाते. मेथी, टमाटर, फुलकोबी, पत्ताकोबी, कोथिंबीर, कारले व काकडीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन शेतकरी घेतात. त्यामुळे ताजा व स्वस्त दरात भाजीपाला बाजारात मिळतो. परंतु गत दोन महिन्यात मागणीपेक्षा आवक कमी, पावसामुळे वाहतुकीवर झालेला परिणाम, वाहन खर्चात झालेली वाढ, वातावरणाचा पिकांवर होणारा परिणाम यामुळे काही भाजीपाल्याच्या दरात वाढ तर, विशेषतः पालेभाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. काहींच्या दरात घसरण झाल्याचे भाजीपाला व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

पावसाळ्यापूर्वी असे होते दर

पावसाळ्यापूर्वी पुढीलप्रमाणे प्रति किलो दर होते. मेथी ४० रुपये, पालक १५ रुपये, कोथिंबीर ४० रुपये, गवार ४० रुपये, चवळी भाजी २० रुपये, काकडी ४० रुपये, टमाटर ४० रुपये, कारले ६० रुपये, फुलकोबी २० रुपये, मिरची ६० रुपये, वांगी ४०, भेंडी ४० रुपये.

१० ऑगस्टचे दर असे

नरखेडच्या बाजारात मंगळवारी (दि. १०) मेथी ८० रुपये, पालक २० रुपये, कोथिंबीर ८० रुपये, गवार ६० रुपये, चवळी भाजी ४० रुपये, काकडी २० रुपये, टमाटर २० रुपये, कारले ८० रुपये, फुलकोबी ६० रुपये, मिरची ८० रुपये, वांगी ३०, भेंडी ३० रुपये प्रति किलो असा दर होता.

छिंदवाडा येथून आवक

तालुक्यात कोबी, पालक, कोशिंबीर, भेंडी, काकडी, टमाटर, वांगी स्थानिक शेतकऱ्याकडून व मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथून येते. मिरची अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातून येते.

--

भाजीबाजारात शेतकरी दलालांना माल देतात. दलालाकडून आम्ही घेतो. बाजारात एखाद्या भाजीची आवक कमी झाली की लिलावात बोली बोलणारे जास्त असतात, त्यामुळे आम्ही चढ्या भावाने खरेदी करतो. त्यावर १०-१५ टक्के वाढवून आम्ही विक्री करतो. पावसाळ्यात पालक, मेथी, कोशिंबीर मोठ्या प्रमाणात खराब होते. ती घट भरून काढण्याकरिता निरुपाय होऊन भाव वाढवावेच लागतात .

चंदू नाडेकर , नरखेड

--

घरी वापराच्या कोणत्याही जिन्नसाचे दर वाढले की गृहिणीचे महिन्याचे बजेट बिघडते. जुळवाजुळव करण्याकरिता तारावरचीच कसरत करावी लागते. किचन मॅनेजमेंट हा गृहिणींना लाभलेला दैवी गुण असल्यामुळे थोडा त्रास होतो, परंतु होऊन जाते.

शालिनी अरसडे, गृहिणी, नरखेड