शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

फुलकोबी ६० तर मेथी ८० रुपये किलो!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:12 IST

श्याम नाडेकर लोकमत न्यूज नेटवर्क नरखेड : मागणीपेक्षा पुरवठा कमी झाला की भाववाढ होते. सध्या भाजीबाजारात मागणीपेक्षा आवक कमी ...

श्याम नाडेकर

लोकमत न्यूज नेटवर्क

नरखेड : मागणीपेक्षा पुरवठा कमी झाला की भाववाढ होते. सध्या भाजीबाजारात मागणीपेक्षा आवक कमी असल्यामुळे पावसाळ्यापूर्वी २० रुपये किलो असलेली फुलकोबी आता ६० रुपये किलो तर, ४० रुपये किलो असलेली मेथी ८० रुपये किलो झाली आहे. पालेभाज्यांच्या दरात झालेल्या वाढीमुळे गृहिणींचे किचन बजेट बिघडले आहे. नरखेड तालुक्यात एक हजार हेक्टरमध्ये भाजीपाल्याचे उत्पादन घेतल्या जाते. मेथी, टमाटर, फुलकोबी, पत्ताकोबी, कोथिंबीर, कारले व काकडीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन शेतकरी घेतात. त्यामुळे ताजा व स्वस्त दरात भाजीपाला बाजारात मिळतो. परंतु गत दोन महिन्यात मागणीपेक्षा आवक कमी, पावसामुळे वाहतुकीवर झालेला परिणाम, वाहन खर्चात झालेली वाढ, वातावरणाचा पिकांवर होणारा परिणाम यामुळे काही भाजीपाल्याच्या दरात वाढ तर, विशेषतः पालेभाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. काहींच्या दरात घसरण झाल्याचे भाजीपाला व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

पावसाळ्यापूर्वी असे होते दर

पावसाळ्यापूर्वी पुढीलप्रमाणे प्रति किलो दर होते. मेथी ४० रुपये, पालक १५ रुपये, कोथिंबीर ४० रुपये, गवार ४० रुपये, चवळी भाजी २० रुपये, काकडी ४० रुपये, टमाटर ४० रुपये, कारले ६० रुपये, फुलकोबी २० रुपये, मिरची ६० रुपये, वांगी ४०, भेंडी ४० रुपये.

१० ऑगस्टचे दर असे

नरखेडच्या बाजारात मंगळवारी (दि. १०) मेथी ८० रुपये, पालक २० रुपये, कोथिंबीर ८० रुपये, गवार ६० रुपये, चवळी भाजी ४० रुपये, काकडी २० रुपये, टमाटर २० रुपये, कारले ८० रुपये, फुलकोबी ६० रुपये, मिरची ८० रुपये, वांगी ३०, भेंडी ३० रुपये प्रति किलो असा दर होता.

छिंदवाडा येथून आवक

तालुक्यात कोबी, पालक, कोशिंबीर, भेंडी, काकडी, टमाटर, वांगी स्थानिक शेतकऱ्याकडून व मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथून येते. मिरची अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातून येते.

--

भाजीबाजारात शेतकरी दलालांना माल देतात. दलालाकडून आम्ही घेतो. बाजारात एखाद्या भाजीची आवक कमी झाली की लिलावात बोली बोलणारे जास्त असतात, त्यामुळे आम्ही चढ्या भावाने खरेदी करतो. त्यावर १०-१५ टक्के वाढवून आम्ही विक्री करतो. पावसाळ्यात पालक, मेथी, कोशिंबीर मोठ्या प्रमाणात खराब होते. ती घट भरून काढण्याकरिता निरुपाय होऊन भाव वाढवावेच लागतात .

चंदू नाडेकर , नरखेड

--

घरी वापराच्या कोणत्याही जिन्नसाचे दर वाढले की गृहिणीचे महिन्याचे बजेट बिघडते. जुळवाजुळव करण्याकरिता तारावरचीच कसरत करावी लागते. किचन मॅनेजमेंट हा गृहिणींना लाभलेला दैवी गुण असल्यामुळे थोडा त्रास होतो, परंतु होऊन जाते.

शालिनी अरसडे, गृहिणी, नरखेड