लाेकमत न्यूज नेटवर्क
बुटीबाेरी : पाेलिसांनी रुईखैरी शिवारात केलेल्या कारवाईमध्ये दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यात विक्रीसाठी नेली जात असलेली दारू पकडली. यात दाेघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून एकूण ४ लाख १७ हजार ३०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई गुरुवारी (दि. ३१) सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास करण्यात आली.
आशिष प्रकाश हाडके, रा. कडजना, ता. हिंगणघाट, जिल्हा वर्धा व विलास भारत बेलेकर, रा. आठवडी बाजार, समुद्रपूर, जिल्हा वर्धा अशी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहेत. बुटीबाेरी परिसरातून वर्धा जिल्ह्याच्या दिशेने दारूची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाल्याने पाेलिसांनी नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील रुईखैरी शिवारात नाकाबंदी केली हाेती. यात पाेलिसांनी हिंगणघाटच्या दिशेने जाणारी एमएच-०६/एएन-९१०३ क्रमांकाची कार थांबवून झडती घेतली. त्या कारमध्ये पाेलिसांना विदेशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या.
ती दारूची अवैध वाहतूक असल्याचे तसेच दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यात विक्रीसाठी नेली जात असल्याचे चाैकशीत स्पष्ट हाेताच पाेलिसांनी कारमधील दाेघांना अटक केली आणि कार व दारू जप्त केली. या कारवाईमध्ये चार लाख रुपयांची कार आणि १७,३०० रुपये किमतीची दारू असा एकूण ४ लाख १७ हजार ३०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती ठाणेदार ओमप्रकाश काेकाटे यांनी दिली. याप्रकरणी बुटीबाेरी पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई पाेलीस हवालदार मिलिंद नांदूरकर यांच्या नेतृत्वातील पथकाने केली.