शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

शेतशिवारात वाढतोय रानडुकरांचा उपद्रव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:08 IST

नागपूर : शेतशिवारात पुन्हा रानडुकरांचा उपद्रव वाढायला लागला आहे. अंकुरलेली कोवळी पिके फस्त करीत शेतकऱ्यांचे स्वप्न उधळून लावणाऱ्या रानडुकरांच्या ...

नागपूर : शेतशिवारात पुन्हा रानडुकरांचा उपद्रव वाढायला लागला आहे. अंकुरलेली कोवळी पिके फस्त करीत शेतकऱ्यांचे स्वप्न उधळून लावणाऱ्या रानडुकरांच्या हल्ल्यात मागील ११ वर्षांत राज्यात ८९ व्यक्तींचा मृत्यू झाल्याची नोंद आहेत. रानडुकरांना सरसकट उपद्रवी ठरवून मारण्याची परवानगी मागितली असली, तरी नियम-अटी घालून ती देण्यात आल्याने रानडुकरांचा उपसर्ग उघड्या डोळ्यांंनी पाहण्याशिवाय शेतकऱ्यांना पर्याय राहिलेला नाही.

विदर्भातील शेतकऱ्यांना रानडुकरांचा त्रास मोठ्या प्रमाणावर आहे. अलीकडे रोह्यांचाही (निलगाय) उपसर्ग वाढल्याने गंभीर प्रश्न आहे. त्यांच्या नियंत्रणासाठी विजेचे सापळे लावण्याचे प्रकार मागील काळात उघडकीस आले आहेत. शेतावर काम करताना रानडुकरांकडून ११ वर्षांत ८९ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे, तर रोह्यांच्या हल्ल्यात ७ जणांच्या मृत्यूची नोंद राज्यात आहे. मागील तीन ते चार वर्षांत पूर्व विदर्भातील शेतशिवारात रोह्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. कळपाने येऊन हे प्राणी पिके फस्त करीत असल्याचे प्रकार सर्रास घडत आहेत.

...

रानडुकरांच्या हल्ल्यातील मृत्यू

२०१० - ६

२०११ - ७

२०१२ - ९

२०१३ - ११

२०१४ - ८

२०१५ - १२

२०१६ - १७

२०१७ - १०

२०१८ - १

२०१९ - ३

२०२० - ५

एकूण - ८९

...

विदर्भात कायद्याचाच अडसर

शेतीला उपसर्ग पोहोचविणाऱ्या रानडुकरांच्या बंदोबस्तासाठी वनविभागाने कायदेशीर परवानगी दिली असली, तरी यात कायद्याचाच अडसर आहे. रोही किंवा रानडुक्कर यांच्या शिकारीला परवानगी असली, तरी त्याकरिता संपूर्ण सूट देण्यात आलेली नाही. अभयारण्य किंवा संरक्षित क्षेत्राच्या ५ किमी सभोवतालच्या क्षेत्रात या तरतुदींची अंमलबजावणी करताना विशेष काळजी घेण्याच्या सूचना आहेत. अभयारण्ये आणि राखीव वनक्षेत्रालगत शेती असणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या विदर्भात अधिक आहे. या प्राण्यांचा उपसर्गही अधिक आहे. शिकार करण्यासाठी लागणारा कालावधी व क्षेत्राचा उल्लेख परवानगी पत्रात करण्याची अट असल्यानेही निर्बंध आले आहेत.

...

परवानगीसाठी २४ तासांची मुदत

रोही व रानडुकरांच्या शिकारीची शेतकऱ्यांना परवानगी देण्यासाठी किंवा नाकारण्यासाठी २४ तासांची मुदत नक्की करण्यात आली आहे. शेतकऱ्याने वनक्षेत्रपालाकडे अशी परवानगी मागितल्यानंतर, त्यावर वनविभागाला एका दिवसाच्या आत निर्णय घेणे बंधनकारक असले, तरी प्रत्यक्षात असे होत नाही. शिकारीची परवानगी दिली किंवा नाकारली, तरीही शेतकऱ्याला याबाबतची माहिती कळविणे वनखात्याला बंधनकारक आहे. परवानगीची माहिती शेतकऱ्याला कळवली न गेल्यास, परवानगी असल्याचे गृहीत धरण्याचे प्रयोजन कायद्यात आहे, तरी शेतकरी एवढी हिंमत दाखवित नाहीत.

...