शहरं
Join us  
Trending Stories
1
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
2
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
3
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
4
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
5
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
6
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
7
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
8
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
9
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
10
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
11
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
12
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
13
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
14
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
15
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
16
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
17
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
18
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 
19
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
20
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान

शेतशिवारात वाढतोय रानडुकरांचा उपद्रव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:08 IST

नागपूर : शेतशिवारात पुन्हा रानडुकरांचा उपद्रव वाढायला लागला आहे. अंकुरलेली कोवळी पिके फस्त करीत शेतकऱ्यांचे स्वप्न उधळून लावणाऱ्या रानडुकरांच्या ...

नागपूर : शेतशिवारात पुन्हा रानडुकरांचा उपद्रव वाढायला लागला आहे. अंकुरलेली कोवळी पिके फस्त करीत शेतकऱ्यांचे स्वप्न उधळून लावणाऱ्या रानडुकरांच्या हल्ल्यात मागील ११ वर्षांत राज्यात ८९ व्यक्तींचा मृत्यू झाल्याची नोंद आहेत. रानडुकरांना सरसकट उपद्रवी ठरवून मारण्याची परवानगी मागितली असली, तरी नियम-अटी घालून ती देण्यात आल्याने रानडुकरांचा उपसर्ग उघड्या डोळ्यांंनी पाहण्याशिवाय शेतकऱ्यांना पर्याय राहिलेला नाही.

विदर्भातील शेतकऱ्यांना रानडुकरांचा त्रास मोठ्या प्रमाणावर आहे. अलीकडे रोह्यांचाही (निलगाय) उपसर्ग वाढल्याने गंभीर प्रश्न आहे. त्यांच्या नियंत्रणासाठी विजेचे सापळे लावण्याचे प्रकार मागील काळात उघडकीस आले आहेत. शेतावर काम करताना रानडुकरांकडून ११ वर्षांत ८९ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे, तर रोह्यांच्या हल्ल्यात ७ जणांच्या मृत्यूची नोंद राज्यात आहे. मागील तीन ते चार वर्षांत पूर्व विदर्भातील शेतशिवारात रोह्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. कळपाने येऊन हे प्राणी पिके फस्त करीत असल्याचे प्रकार सर्रास घडत आहेत.

...

रानडुकरांच्या हल्ल्यातील मृत्यू

२०१० - ६

२०११ - ७

२०१२ - ९

२०१३ - ११

२०१४ - ८

२०१५ - १२

२०१६ - १७

२०१७ - १०

२०१८ - १

२०१९ - ३

२०२० - ५

एकूण - ८९

...

विदर्भात कायद्याचाच अडसर

शेतीला उपसर्ग पोहोचविणाऱ्या रानडुकरांच्या बंदोबस्तासाठी वनविभागाने कायदेशीर परवानगी दिली असली, तरी यात कायद्याचाच अडसर आहे. रोही किंवा रानडुक्कर यांच्या शिकारीला परवानगी असली, तरी त्याकरिता संपूर्ण सूट देण्यात आलेली नाही. अभयारण्य किंवा संरक्षित क्षेत्राच्या ५ किमी सभोवतालच्या क्षेत्रात या तरतुदींची अंमलबजावणी करताना विशेष काळजी घेण्याच्या सूचना आहेत. अभयारण्ये आणि राखीव वनक्षेत्रालगत शेती असणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या विदर्भात अधिक आहे. या प्राण्यांचा उपसर्गही अधिक आहे. शिकार करण्यासाठी लागणारा कालावधी व क्षेत्राचा उल्लेख परवानगी पत्रात करण्याची अट असल्यानेही निर्बंध आले आहेत.

...

परवानगीसाठी २४ तासांची मुदत

रोही व रानडुकरांच्या शिकारीची शेतकऱ्यांना परवानगी देण्यासाठी किंवा नाकारण्यासाठी २४ तासांची मुदत नक्की करण्यात आली आहे. शेतकऱ्याने वनक्षेत्रपालाकडे अशी परवानगी मागितल्यानंतर, त्यावर वनविभागाला एका दिवसाच्या आत निर्णय घेणे बंधनकारक असले, तरी प्रत्यक्षात असे होत नाही. शिकारीची परवानगी दिली किंवा नाकारली, तरीही शेतकऱ्याला याबाबतची माहिती कळविणे वनखात्याला बंधनकारक आहे. परवानगीची माहिती शेतकऱ्याला कळवली न गेल्यास, परवानगी असल्याचे गृहीत धरण्याचे प्रयोजन कायद्यात आहे, तरी शेतकरी एवढी हिंमत दाखवित नाहीत.

...