शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

चिनी उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचा ‘कॅट’चा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 06:00 IST

सणासुदीत भारतात विक्रीस येणाऱ्या सर्व चिनी वस्तूंची देशात विक्री न करण्याचे आवाहन देशातील ७ कोटींपेक्षा जास्त रिटेल व्यापाऱ्यांना आणि खरेदीवर प्रतिबंध आणण्याचे आवाहन ग्राहकांना करण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे२९ ऑगस्टला दिल्लीत बैठकभारतीय उद्योजक व ग्राहकांना आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पाकिस्तानच्या समर्थनात उतरलेल्या चीनमधील उत्पादनांवर १ सप्टेंबर २०१९ पासून बहिष्कार घालण्याचा इशारा कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) दिला आहे. या संदर्भात सर्व राज्याच्या पदाधिकाऱ्यांची बैठक २९ ऑगस्ट रोजी दिल्लीत बोलविल्याची माहिती कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भरतीया यांनी दिली. देशात ७ कोटींपेक्षा जास्त रिटेल व्यावसायिक असल्याचे त्यांनी सांगितले.काश्मीर प्रश्नावर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत सर्व राष्ट्रांनी भारताला पाठिंबा दिला, मात्र चीनने पाकिस्तानला समर्थन दिले. त्यामुळे सणासुदीत भारतात विक्रीस येणाऱ्या सर्व चिनी वस्तूंची देशात विक्री न करण्याचे आवाहन देशातील ७ कोटींपेक्षा जास्त रिटेल व्यापाऱ्यांना आणि खरेदीवर प्रतिबंध आणण्याचे आवाहन ग्राहकांना करण्यात येणार आहे. या संदर्भात कॅटच्या देशभरातील सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक २९ ऑगस्टला दिल्लीत होणार आहे. बैठकीनंतर १ सप्टेंबरपासून चिनी वस्तूंवर बहिष्कार घातला जाईल, असे भरतीया म्हणाले. चीनऐवजी भारताने बांगला देशासारख्या लहान आणि कमी विकसित देशांशी व्यवहार वाढविले पाहिजे, असे आवाहन बैठकीत करण्यात येणार आहे.चीनची सर्वात मोठी बाजारपेठ भारतात आहे. देशात सन २०१७-१८ मध्ये चीनहून ९० बिलियन डॉलर्सच्या वस्तूंची आयात झाली होती. आता मात्र चीनचा व्यापार धोक्यात सापडला आहे. आपली अर्थव्यवस्था भारतावर अवलंबून असतानाही चीन पाकिस्तानच्या बाजूने उभा राहात आहे. त्यामुळे भारतीयांनी चीनला धडा शिकवावा, असे आवाहन भरतीया यांनी केले.चीनमध्ये निर्मित वस्तूंवर भारताने ३०० ते ५०० टक्के आयात शुल्क लावावे. त्यामुळे चीनच्या वस्तू भारतात येणार नाहीत. चीनमधून ज्या वस्तू आयात करण्यात येतात, त्या वस्तू भारतातच तयार करण्यासाठी भारतीय उद्योजकांना प्रोत्साहन द्यावे. विविध खेळणी निर्मितीसाठी लघु उद्योजकांना सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. घरगुती वापरातील स्वस्त आणि गुणवत्ता नसलेल्या वस्तू भारतात येतात याकडे सरकारने लक्ष द्यावे, असे भरतीया यांनी सांगितले.

टॅग्स :Marketबाजार