शहरं
Join us  
Trending Stories
1
Prajwal Revanna: माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा अत्याचार प्रकरणात दोषी, उद्या शिक्षेची घोषणा
2
Dahi Handi 2025: गोविंदा आला रे...! सरकार संरक्षण देणार; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार...
3
मानहानी प्रकरणात कंगनाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका, नेमकं प्रकरण काय?
4
'हल्ली मुली नग्न होऊन पैसे कमावत आहेत'; साध्वी ऋतंभरा यांच्या विधानाने नवा वाद
5
फक्त ३,००० रुपये भरा आणि वर्षभर टोल फ्री प्रवास करा, १५ ऑगस्टपासून नवा नियम! फक्त 'या' वाहनांना लागू
6
Mahabharat: एखादी गोष्ट बायकांच्या पोटात राहत नाही, त्याला कारणीभूतआहे महाभारतातली 'ही' कथा!
7
IND vs ENG : एक धाव वाचवण्याच्या नादात 'मॅच विनर' खेळाडू कसोटीतून OUT; टीम इंडिया याचा फायदा उठवणार?
8
PM Kisan योजनेच्या २० व्या हप्त्यासाठी फक्त एक दिवस शिल्लक; लाभार्थींच्या यादीत नाव आहे का चेक करा
9
कृषिमंत्रिपदाची सर्वात पहिली ऑफर अजित पवारांनी मला दिली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
10
चीनमुळे अनेक उद्योगांवर संकट, सामना करण्यासाठी आता भारताचा 'मास्टर प्लान', सरकार उचलणार पाऊल?
11
महाराष्ट्र बदलतोय : पैठणी ते कोल्हापुरी चप्पल, MSME उद्योगांची डिजिटल झेप!
12
२ पिढ्या पण ध्येय एकच! माय-लेकीच्या जोडीची दमदार कामगिरी, एकत्र पास केली NEET
13
दमदार इंजिन, शानदार मायलेज..; Honda ने लॉन्च केली स्वस्त स्पोर्ट्स बाईक, किंमत...
14
Powerful Air Forces : जगातील सगळ्यात ताकदवान हवाई दलं; भारत 'टॉप ५'मध्ये कितव्या स्थानावर?
15
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
16
रमीला ऑलिम्पिक दर्जा मिळणार, कोकाटेंना क्रीडा मंत्रालय देऊन सन्मानच; काँग्रेसचा महायुतीला चिमटा
17
Monsoon Recipe: तुम्ही कधी पंजाबी शिरा 'प्यायलात' का? ट्राय करा, पावसाळी आजारांवरचा चविष्ट उपाय!
18
ओव्हल कसोटीत टीम इंडियाकडून झाली मोठी चूक, ठरू शकते पराभवाचं कारण  
19
UPI New Rule: आजपासून लागू झाले यूपीआयचे नवे नियम; सारखं सारखं करता येणार नाही 'हे' काम
20
दीड वर्षांचा लेक, महिन्याभरापूर्वी प्रमोशन; लेफ्टनंट कर्नल भानू प्रताप शहीद, दगड पडले अन्...

चिनी उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचा ‘कॅट’चा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 06:00 IST

सणासुदीत भारतात विक्रीस येणाऱ्या सर्व चिनी वस्तूंची देशात विक्री न करण्याचे आवाहन देशातील ७ कोटींपेक्षा जास्त रिटेल व्यापाऱ्यांना आणि खरेदीवर प्रतिबंध आणण्याचे आवाहन ग्राहकांना करण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे२९ ऑगस्टला दिल्लीत बैठकभारतीय उद्योजक व ग्राहकांना आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पाकिस्तानच्या समर्थनात उतरलेल्या चीनमधील उत्पादनांवर १ सप्टेंबर २०१९ पासून बहिष्कार घालण्याचा इशारा कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) दिला आहे. या संदर्भात सर्व राज्याच्या पदाधिकाऱ्यांची बैठक २९ ऑगस्ट रोजी दिल्लीत बोलविल्याची माहिती कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भरतीया यांनी दिली. देशात ७ कोटींपेक्षा जास्त रिटेल व्यावसायिक असल्याचे त्यांनी सांगितले.काश्मीर प्रश्नावर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत सर्व राष्ट्रांनी भारताला पाठिंबा दिला, मात्र चीनने पाकिस्तानला समर्थन दिले. त्यामुळे सणासुदीत भारतात विक्रीस येणाऱ्या सर्व चिनी वस्तूंची देशात विक्री न करण्याचे आवाहन देशातील ७ कोटींपेक्षा जास्त रिटेल व्यापाऱ्यांना आणि खरेदीवर प्रतिबंध आणण्याचे आवाहन ग्राहकांना करण्यात येणार आहे. या संदर्भात कॅटच्या देशभरातील सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक २९ ऑगस्टला दिल्लीत होणार आहे. बैठकीनंतर १ सप्टेंबरपासून चिनी वस्तूंवर बहिष्कार घातला जाईल, असे भरतीया म्हणाले. चीनऐवजी भारताने बांगला देशासारख्या लहान आणि कमी विकसित देशांशी व्यवहार वाढविले पाहिजे, असे आवाहन बैठकीत करण्यात येणार आहे.चीनची सर्वात मोठी बाजारपेठ भारतात आहे. देशात सन २०१७-१८ मध्ये चीनहून ९० बिलियन डॉलर्सच्या वस्तूंची आयात झाली होती. आता मात्र चीनचा व्यापार धोक्यात सापडला आहे. आपली अर्थव्यवस्था भारतावर अवलंबून असतानाही चीन पाकिस्तानच्या बाजूने उभा राहात आहे. त्यामुळे भारतीयांनी चीनला धडा शिकवावा, असे आवाहन भरतीया यांनी केले.चीनमध्ये निर्मित वस्तूंवर भारताने ३०० ते ५०० टक्के आयात शुल्क लावावे. त्यामुळे चीनच्या वस्तू भारतात येणार नाहीत. चीनमधून ज्या वस्तू आयात करण्यात येतात, त्या वस्तू भारतातच तयार करण्यासाठी भारतीय उद्योजकांना प्रोत्साहन द्यावे. विविध खेळणी निर्मितीसाठी लघु उद्योजकांना सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. घरगुती वापरातील स्वस्त आणि गुणवत्ता नसलेल्या वस्तू भारतात येतात याकडे सरकारने लक्ष द्यावे, असे भरतीया यांनी सांगितले.

टॅग्स :Marketबाजार