शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
4
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
5
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
6
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
7
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
8
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
9
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
10
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
11
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
12
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
13
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
14
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
15
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
16
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
17
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
19
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
20
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय

प्राथमिक केंद्रांमध्ये व्हावेत हृदयरुग्णांवर आकस्मिक उपचार

By admin | Updated: September 29, 2014 01:02 IST

बहुसंख्य प्राथमिक आरोग्य केंद्रात हृदयविकाराचा झटका आलेल्यांवर उपचारच होत नाही. रुग्णाला मोठ्या इस्पितळाकडे पाठविले जाते. परिणामी २५ टक्के रुग्णांचा मृत्यू होतो. देशात वाढत्या

विदर्भ हृदयरोग संघटनेचा पदग्रहण सोहळा थाटातनागपूर : बहुसंख्य प्राथमिक आरोग्य केंद्रात हृदयविकाराचा झटका आलेल्यांवर उपचारच होत नाही. रुग्णाला मोठ्या इस्पितळाकडे पाठविले जाते. परिणामी २५ टक्के रुग्णांचा मृत्यू होतो. देशात वाढत्या हृदयरोगाच्या रुग्णांची संख्या लक्षात घेता प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात आकस्मिक सेवा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ (दिल्ली) डॉ. के. श्रीनाथ रेड्डी यांनी येथे केले.डॉ. के.जी. देशपांडे स्मृती व्याख्यान व विदर्भ हृदयरोग संघटनेचा पदग्रहण सोहळ्याचे रविवारी आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते ‘लोकमत’शी बोलत होते. डॉ. रेड्डी म्हणाले, तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन करणाऱ्यांमधील ७० टक्के लोकांचा मृत्यू हृदयविकारामुळे होतो. हृदयरोगापासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या तंबाखुचे व्यसन, धूम्रपान, स्थूलतेचे प्रमाण या बाबी टाळल्या पाहिजेत. त्याचबरोबर उच्च रक्तदाब, शरीरातील चरबीचे प्रमाण, मधुमेह आदी बाबींवर नियंत्रण राखले पाहिजे. त्यासाठी नियमित व्यायाम, नियंत्रित वजन, पोषक जीवनशैली करत राहिलो तर औषधे घ्यावी लागणार नाहीत. परंतु सध्याच्या घडीला जोपर्यंत आजार होत नाही तो पर्यंत त्याकडे दुर्लक्ष केले जाते. दुसरीकडे देशात हृदयरोगाच्या आकस्मिक सेवेचा खर्च सामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. यात महत्त्वाचे निर्णय होणे आवश्यक आहे. हृदयरोगाचे रुग्ण कमी करण्यासाठी गावपातळीवर आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना आणि आशा वर्कस यांच्याकडून हृदयरोगाप्रति जनजागृती होणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले. दरम्यान कार्डिओलॉजिकल सोसायटी आॅफ इंडिया, विदर्भ शाखेचा सत्र २०१४-१५ साठी पदग्रहण सोहळा थाटात पार पडला. नवनियुक्त अध्यक्ष डॉ. शंतनू सेनगुप्ता, सचिव डॉ. पवन अग्रवाल यांनी शपथ घेतली. यावेळी मंचावर डॉ. रेड्डी, मुंबईचे हृदयरोगतज्ज्ञ डॉ. भरत दळवी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. (प्रतिनिधी)