शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
2
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
3
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
4
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
5
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
6
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
7
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
8
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
9
"मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो, कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
10
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
11
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
12
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
13
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
14
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
15
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
16
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
17
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
18
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
19
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
20
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात

प्राथमिक केंद्रांमध्ये व्हावेत हृदयरुग्णांवर आकस्मिक उपचार

By admin | Updated: September 29, 2014 01:02 IST

बहुसंख्य प्राथमिक आरोग्य केंद्रात हृदयविकाराचा झटका आलेल्यांवर उपचारच होत नाही. रुग्णाला मोठ्या इस्पितळाकडे पाठविले जाते. परिणामी २५ टक्के रुग्णांचा मृत्यू होतो. देशात वाढत्या

विदर्भ हृदयरोग संघटनेचा पदग्रहण सोहळा थाटातनागपूर : बहुसंख्य प्राथमिक आरोग्य केंद्रात हृदयविकाराचा झटका आलेल्यांवर उपचारच होत नाही. रुग्णाला मोठ्या इस्पितळाकडे पाठविले जाते. परिणामी २५ टक्के रुग्णांचा मृत्यू होतो. देशात वाढत्या हृदयरोगाच्या रुग्णांची संख्या लक्षात घेता प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात आकस्मिक सेवा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ (दिल्ली) डॉ. के. श्रीनाथ रेड्डी यांनी येथे केले.डॉ. के.जी. देशपांडे स्मृती व्याख्यान व विदर्भ हृदयरोग संघटनेचा पदग्रहण सोहळ्याचे रविवारी आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते ‘लोकमत’शी बोलत होते. डॉ. रेड्डी म्हणाले, तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन करणाऱ्यांमधील ७० टक्के लोकांचा मृत्यू हृदयविकारामुळे होतो. हृदयरोगापासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या तंबाखुचे व्यसन, धूम्रपान, स्थूलतेचे प्रमाण या बाबी टाळल्या पाहिजेत. त्याचबरोबर उच्च रक्तदाब, शरीरातील चरबीचे प्रमाण, मधुमेह आदी बाबींवर नियंत्रण राखले पाहिजे. त्यासाठी नियमित व्यायाम, नियंत्रित वजन, पोषक जीवनशैली करत राहिलो तर औषधे घ्यावी लागणार नाहीत. परंतु सध्याच्या घडीला जोपर्यंत आजार होत नाही तो पर्यंत त्याकडे दुर्लक्ष केले जाते. दुसरीकडे देशात हृदयरोगाच्या आकस्मिक सेवेचा खर्च सामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. यात महत्त्वाचे निर्णय होणे आवश्यक आहे. हृदयरोगाचे रुग्ण कमी करण्यासाठी गावपातळीवर आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना आणि आशा वर्कस यांच्याकडून हृदयरोगाप्रति जनजागृती होणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले. दरम्यान कार्डिओलॉजिकल सोसायटी आॅफ इंडिया, विदर्भ शाखेचा सत्र २०१४-१५ साठी पदग्रहण सोहळा थाटात पार पडला. नवनियुक्त अध्यक्ष डॉ. शंतनू सेनगुप्ता, सचिव डॉ. पवन अग्रवाल यांनी शपथ घेतली. यावेळी मंचावर डॉ. रेड्डी, मुंबईचे हृदयरोगतज्ज्ञ डॉ. भरत दळवी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. (प्रतिनिधी)