शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
3
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
4
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
5
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
6
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
7
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
8
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
9
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
10
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
11
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
12
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
13
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
14
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
15
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
16
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
17
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
18
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
19
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
20
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ

महिलांच्या गुलामगिरीवरच जातीव्यवस्था टिकून

By admin | Updated: April 12, 2016 05:29 IST

या देशातील जातीव्यवस्था, विषमता, लिंगभेद, असमानता ही महिलांच्या गुलामगिरीवर अवलंबून आहे. महिला ज्या

नागपूर : या देशातील जातीव्यवस्था, विषमता, लिंगभेद, असमानता ही महिलांच्या गुलामगिरीवर अवलंबून आहे. महिला ज्या दिवशी ही गुलामगिरी तोडून स्वतंत्र होतील, त्या दिवशी या देशातील हा सर्व भेदाभेद दूर होईल, असे रोखठोक प्रतिपादन जिजाऊ ब्रिगेडच्या कार्याध्यक्षा अ‍ॅड. वैशाली डोळस यांनी येथे केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्य संयुक्त नागरी जयंती समारोह समिती आणि डॉ. आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी यांच्या संयुक्त विद्यमाने दीक्षाभूमी येथे वैचारिक परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. सोमवारी क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले यांना समर्पित विशेष परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी प्रमुख वक्त्या म्हणून त्या बोलत होत्या. बहुजन संघर्षचे संपादक नागेश चौधरी अध्यक्षस्थानी होते, तर मराठा सेवा संघ महाराष्ट्राचे समन्वयक श्रीमंत शिवाजी कोकाटे प्रमुख अतिथी होते. अ‍ॅड. डोळस म्हणाल्या, या देशातील जातीव्यवस्था, विषमता टिकून राहावी म्हणूनच महिलांना येथील धर्मव्यवस्थेने गुलाम करून ठेवले आहे. त्यामुळे महिलांच्या स्वातंत्र्याचा जेव्हा जेव्हा प्रश्न उभा राहतो, तेव्हा तेव्हा येथील सनातनी लोक खवळून उभे राहतात. फुले, शाहू आंबेडकरांच्या विचारांमुळे महिलांमध्ये आज इतकी ऊर्जा आली आहे की, त्यांना देवसुद्धा घाबरायला लागले आहेत. आता जातीभेद राहिला नाही. महिलांनाही सन्मानाची वागणूक दिली जाते. परंतु शनिशिंगणापूरच्या विषयाने या देशातील भेदभाव पुन्हा एकदा प्रकर्षाने पुढे आला आहे, असेही त्यांनी सांगितले. श्रीमंत शिवाजी कोकाटे यांनी आपल्या भाषणात या देशातील धर्मव्यवस्थेमुळे बहुजनांचा विकास खुंटला आहे, तेव्हा देशातील बहुजनांनी धर्मव्यवस्था नाकारून विकासाची कास धरावी, असे आवाहनही केले. नागेश चौधरी यांनी अध्यक्षीय भाषण केले. प्रास्ताविक डॉ. नीरज बोधी यांनी केले. संचालन डॉ. सुचित बागडे यांनी केले. दरम्यान अशोक स्वरस्वती यांच्या प्रबोधनाचा कार्यक्रम पार पडला. (प्रतिनिधी)आज ‘अल्पसंख्यांक’ या विषयावर परिसंवाद ४१२ एप्रिल रोजी दीक्षाभूमीवर अल्पसंख्यांक या विषयावर विशेष परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. यात अ.भा. ख्रिश्चन परिषदेचे महासचिव डॉ. जॉन दयाल, अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, इरफान अली इंजिनियर आणि प्रो. डॉ. दीपक कुमार प्रमुख वक्ते राहतील.