शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

कॅशलेस आरोग्य योजना शिक्षकांना लागू करणार

By admin | Updated: September 10, 2016 02:27 IST

पोलिसांप्रमाणे शिक्षकांनाही कॅशलेस आरोग्य योजना लागू करावी, अशी मागणी बऱ्याच वर्षांपासून शिक्षकांची आहे.

शिक्षण आयुक्त : समायोजनासंदर्भात बोलणे टाळले नागपूर : पोलिसांप्रमाणे शिक्षकांनाही कॅशलेस आरोग्य योजना लागू करावी, अशी मागणी बऱ्याच वर्षांपासून शिक्षकांची आहे. येत्या दोन महिन्यांत कॅशलेस आरोग्य कुटुंब योजना शिक्षकांनाही लागू करण्याचे आश्वासन शिक्षण आयुक्त धीरजकुमार यांनी दिले. शिक्षकांच्या विभागीय कार्यशाळेसाठी धीरजकुमार नागपुरात आले असता, महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी शिक्षक संघाच्या वतीने त्यांना नागपूर विमानतळावर निवेदन देण्यात आले. शिक्षक आणि त्यांच्या कुटुंबीयांना एखादा दुर्धर आजार झाल्यास किंवा आपत्कालीन परिस्थितीत शस्त्रक्रिया करायची असल्यास, शिक्षकांना स्वत: खर्च करावा लागतो. झालेल्या सर्व खर्चाचे बिल व तपशील जोडून परताव्यासाठी शिक्षण विभागाकडे पाठवावा लागतो. आरोग्यावर झालेल्या खर्चाचा परतावा मिळण्यासाठी शिक्षकांना बराच कालावधी लागतो. इच्छा नसताना लाचही द्यावी लागते. शिक्षकांना त्यासाठी बराच त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे शिक्षकांसाठी कॅशलेस आरोग्य योजना सुरू करावी, अशी शिक्षकांची मागणी आहे. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी शिक्षक संघातर्फे सरकारला वेळोवेळी निवेदन देण्यात आले आहे. या मागणीला घेऊन संघाचे विभागीय अध्यक्ष खेमराज खोडे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने शिक्षण आयुक्त धीरजकुमार यांच्याशी नागपूर विमानतळावर भेट घेतली. त्यांच्याशी आरोग्य योजनेसंदर्भात चर्चा करण्यात आली. त्यांनी येत्या दोन महिन्यात कॅशलेस आरोग्य योजना शिक्षकांना लागू करणार असल्याचे आश्वासन दिले. परंतु सध्या शिक्षण क्षेत्रात चर्चेत असलेला अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाच्या विषयावर फारसे बोलणे टाळले. यावेळी संघाचे नरेश भोयर, मो. आदिल शेख, ज्ञानेश्वर चंदनखेडे, ओमप्रकाश ढाबेकर, देवेंद्र सोनटक्के, प्रवीण आंभोरे उपस्थित होते. (प्रतिनिधी)१४ सप्टेंबरपर्यंत समायोजनाची प्रक्रिया होणार असल्याची चर्चागेल्या दोन दिवसांपासून शिक्षकांच्या समायोजनाची संपूर्ण प्रक्रिया ठप्प आहे. नागपुरात १० व ११ सप्टेंबर या दोन दिवसात विभागीय शैक्षणिक कार्यशाळा होणार आहे. या कार्यशाळेला शिक्षण आयुक्त धीरजकुमार, शिक्षण संचालक गोविंद नांदेडे उपस्थित राहणार आहेत. समायोजनाच्या विषयावरून कार्यशाळेत शिक्षकांकडून कुठलाही त्रागा होऊ नये म्हणून १४ सप्टेंबरपर्यंत समायोजनाची प्रक्रिया पूर्ण होईल अशी चर्चा व्हॉट्सअ‍ॅपवर सुरू आहे. परंतु अधिकाऱ्यांकडून याला दुजोरा मिळालेला नाही.