शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

वाहनचालक, वाहक, प्रवाशांची काेराेना टेस्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:09 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क काेंढाळी : नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावरून राेज हजाराे नागरिक प्रवास करतात. त्यात काेण काेराेना संक्रमित आहे आणि ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

काेंढाळी : नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावरून राेज हजाराे नागरिक प्रवास करतात. त्यात काेण काेराेना संक्रमित आहे आणि काेण नाही हे कळत नसल्याने काेंढाळी (ता. काटाेल) प्राथमिक आराेग्य केंद्राच्यावतीने या राष्ट्रीय महामार्गावरील काेंढाळी येथील वर्धा टी पाॅईंटजवळ वाहनचालक, वाहक व वाहनातील प्रवाशांची काेराेना टेस्ट करायला सुरुवात केली आहे. यात काही नागरिक विनाकारण हुज्जत घालत असल्याने त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी पाेलीस प्रशासनाची मदत घेण्यात आली आहे. काेराेना संक्रमण नियंत्रणात आणण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे खंडविकास अधिकारी संजय पाटील यांनी सांगितले.

सध्या लाॅकडाऊन असले करीत नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गाने अमरावती, नागपूर, अकाेला, बुलडाणा यासह या मार्गावरील अन्य शहरांमधील नागरिक खासगी वाहनांनी राेज प्रवास करतात. यात रुग्णवाहिका, रुग्णांचे नातेवाईक व इतरही असतात. या प्रवाशांमध्ये काही काेराेना पाॅझिटिव्ह असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागपूर शहर, ग्रामीण व लगतच्या अमरावती व वर्धा जिल्ह्यात काेराेना संक्रमण हाेण्याची शक्यता असते. हा महामार्ग काेंढाळी येथून जात असल्याने येथे या प्रवाशांची काेराेना टेस्ट करण्याची माेहीम हाती घेण्यात आली आहे, असे खंडविकास अधिकारी संजय पाटील यांनी सांगितले.

परिणामी, या मार्गावर प्रवास करणाऱ्यांचे प्रत्येक वाहन काेंढाळी येथील वर्धा टी पाॅईंटजवळ थांबविले जात असून, प्रवाशांना काेराेना प्रतिबंधक उपाययाेजना व लसीकरणाचे महत्त्व थाेडक्यात समजावून सांगितले जात आहे. शिवाय, वाहनचालक, वाहक व वाहनातील सर्व प्रवाशांची ॲंटिजन टेस्ट केली जात आहे. या जी व्यक्ती काेराेना पाॅझिटिव्ह आढळून आली, त्यांना परत पाठविण्यात येत असून, निगेटिव्ह व्यक्तीला प्रमाणपत्र देऊन नागपूर, अमरावती व वर्धा जिल्ह्यात जाण्याची परवानगी दिली जात आहे. ही माेहीम दाेन दिवसांपासून सुरू करण्यात आल्याची माहिती ठाणेदार विश्वास फुल्लरवार यांनी दिली.

...

फिरणारे रुग्ण काेविड सेंटरमध्ये

ग्रामीण व शहरी भागातील काेराेना पाॅझिटिव्ह रुग्णांना गृह विलगीकरणात राहण्याचा सल्ला दिला जात असून, त्यांच्या औषधाेपचाराचीही साेय केली जात आहे. मात्र, काही रुग्ण कुणाचेही न ऐकता घराबाहेर पडून मनसाेक्त फिरतात. ताे काेराेना सुपर स्प्रेडर असल्याने इतरांसाठी घातक ठरत आहे. त्यामुळे अशा बाहेर फिरणाऱ्यांना रुग्णांचा शाेध घेऊन त्यांची तातडीने पाेलिसांना माहिती द्यावी व काेविड सेंटरमध्ये रवानगी करावी, असे आदेश सरपंच व ग्रामसेवकांना दिले आहेत, अशी माहिती खंडविकास अधिकारी संजय पाटील यांनी दिली.