शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
2
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
3
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
4
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
5
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
6
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
7
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
8
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
9
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
10
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
11
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
12
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
13
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
14
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
15
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)
16
Sonam Raghuvanshi : राजाच्या चेहऱ्यावर हसू अन् सोनमच्या डोक्यात हत्येचं प्लॅनिंग? लग्नातला 'तो' Video तुफान व्हायरल
17
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
18
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
19
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 

अपिलावरील नियमांना दाखविली जाते केराची टोपली

By admin | Updated: May 15, 2017 02:27 IST

कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय सरकारच्या विरोधात गेल्यास त्याविरुद्ध वरिष्ठ न्यायालयात अपील करण्याचा किंवा अपील करणे टाळण्याचा निर्णय घेण्यापूर्वी ....

सरकारी वकील जबाबदार : सरकारने दिली कारवाइची तंबी राकेश घानोडे । लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय सरकारच्या विरोधात गेल्यास त्याविरुद्ध वरिष्ठ न्यायालयात अपील करण्याचा किंवा अपील करणे टाळण्याचा निर्णय घेण्यापूर्वी विशिष्ट प्रक्रियेचे पालन करणे आवश्यक आहे. परंतु, सरकारी ताफ्यातील बरेचसे वकील यासंदर्भातील नियमांना केराची टोपली दाखवीत असल्याचे आढळून आले आहे. राज्यात ‘रुल्स फॉर दि कन्डक्ट आॅफ लीगल अफेअर्स आॅफ गव्हर्नमेंट-१९८४’ लागू असून, यातील नियम ४९(९)(ए) व नियम ५० मध्ये अपिलाविषयीची प्रक्रिया सांगण्यात आली आहे. सरकारी ताफ्यातील वकिलांनी या नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. काही प्रकरणांमध्ये सरकारी वकिलांनी नियम पाळले नसल्याचे लक्षात आल्यामुळे, विधी व न्याय विभागाने परिपत्रक जारी करून यापुढे नियमांची पायमल्ली करणाऱ्या सरकारी वकिलांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी तंबी दिली आहे. सरकारी वकिलांनी स्वत:च्या मतानुसार कोणताही निर्णय घेऊ नये. त्यांनी स्वत:च्या मताने निर्णय घेतल्यास त्याकडे अत्यंत गांभीर्याने पाहिले जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. असा आहे नियम ४९(९)(ए) सत्र न्यायालयाने शासनाच्या विरोधात दिलेल्या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात अपील करणे आवश्यक वाटत नसल्यास, संबंधित सरकारी वकिलाने या नियमानुसार, सत्र न्यायालयाच्या निर्णयाची प्रमाणित प्रत व स्वत:चे मत कारणांसह जिल्हा दंडाधिकारी, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक किंवा संबंधित शासकीय अधिकाऱ्याला पाठविणे आवश्यक आहे. सरकारी वकिलाची भूमिका येथे संपते व त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका सुरू होते. अपील दाखल करायचे अथवा नाही, याचा अंतिम निर्णय विधी व न्याय विभागाद्वारे घेतला जातो. काय सांगतो नियम ५० सत्र न्यायालयाने शासनाच्या विरोधात दिलेल्या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात अपील करणे आवश्यक वाटत असल्यास, संबंधित सरकारी वकिलाने या नियमानुसार विधी व न्याय विभागाकडे प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. प्रस्तावासोबत वादग्रस्त निर्णयाच्या प्रमाणित प्रती, अपील करण्यामागची कारणे, आरोपींच्या पत्त्यांची यादी इत्यादी माहिती पाठवावी लागते. जिल्हा दंडाधिकारी, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक किंवा संबंधित शासकीय अधिकारी यांनाही प्रस्ताव द्यावा लागतो. अन्य बाबीदेखील यात सांगण्यात आल्या आहेत. हायकोर्टाने दिली समज सरकारी वकिलाने नियमांचे उल्लंघन केल्याचे एक प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल झाले होते. संबंधित घटनेत सत्र न्यायालयाने शासनाच्याविरोधात निर्णय दिल्यानंतर संबंधित महिला अतिरिक्त सरकारी अभियोक्त्यांनी नियम डावलून स्वत:च अपील करणे आवश्यक नसल्याचा निर्णय घेतला होता. त्यावर उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. सहायक सरकारी वकील किंवा अतिरिक्त सरकारी अभियोक्ता यांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करायला हवे. ते स्वत:च्या मर्जीने कोणताही निर्णय घेऊ शकत नाहीत. नियमांचे पालन करणे त्यांच्यासाठी बंधनकारक आहे अशी समज उच्च न्यायालयाने दिली.