शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
4
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
5
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
6
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
7
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
8
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
9
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
10
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
11
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
12
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
13
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
14
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
15
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
16
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
17
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
18
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
19
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
20
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल

मुख्यमंत्र्यांच्या विद्यापीठाला कानपिचक्या

By admin | Updated: February 21, 2015 14:49 IST

१0१ वा दीक्षांत समारंभ : निकाल वेळेत व अचूक लागावे, 'सोशल मीडिया'चा उपयोग व्हावा

■ येथे येण्याअगोदर मी विद्यापीठाचे 'सोशल मीडिया'वर कुठले 'अकाऊंट' आहे का याचा शोध घेतला. एक 'अकाऊंट' सापडले, पण त्यात २0११ पासून कुठलीही हालचाल झालेली नाही. 'सोशल मीडिया' हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील अविभाज्य घटक झाला आहे. त्यामुळे परीक्षांचे वेळापत्रक, त्यातील बदल, सूचना इत्यादी बाबी या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवता येऊ शकतात. त्यामुळे 'सोशल मीडिया'चा वापर करण्याबाबत विद्यापीठाने विचार करावा, असेदेखील ते म्हणाले.नागपूर विद्यापीठाला मिळावा केंद्रीय दर्जा■ राज्यात एकही केंद्रीय विद्यापीठ नसल्याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली. नागपूर हे देशाचे मध्यवर्ती केंद्र आहे. त्यामुळे नागपूर विद्यापीठाला केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न होणे आवश्यक आह. जर तसा पुढाकार घेण्यात आला तर शासनाकडून त्याला पूर्ण सहकार्य मिळेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. नागपूर : साधारणत: एखाद्या विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ म्हटला की त्याबद्दल प्रमुख अतिथींकडून गोडवे गायले जातात. परंतु राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचेच माजी विद्यार्थी असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यापीठाच्या ढिसाळ कार्यपद्धतीबद्दल १0१ व्या दीक्षांत समारंभादरम्यान प्रशासनाला कानपिचक्या दिल्या. परीक्षांचे निकाल वेळेवर व अचूकपणे लागावेत ही विद्यार्थ्यांची अपेक्षा असते. प्रशासकीय चौकटीतून बाहेर येऊन जास्तीत जास्त प्रमाणात तंत्रज्ञानाचा वापर व्हावा, असा सल्लादेखील त्यांनी दिला.डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात झालेल्या १0१ व्या दीक्षांत समारंभाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांची पूर्ण वेळ उपस्थिती होती. याच विद्यापीठात शिक्षण झाले असल्याने व लोकप्रतिनिधी म्हणून येथील समस्यांची जाण असल्याने मुख्यमंत्र्यांनी विद्यापीठाच्या त्रुटींवर बरोबर बोट ठेवले. विद्यापीठात सर्वात मोठी समस्या आहे ती मूल्यांकनासंदर्भात. वेळेत मूल्यांकन न होणे, चुकीच्या पद्धतीचे मूल्यांकन तसेच फेरमूल्यांकनाच्या निकालांना होणार उशीर यामुळे विद्यार्थ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे यात लवकरात लवकर बदल करणे आवश्यक आहेत. त्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर वाढायला हवा व या सर्व बाबी 'ई-प्लॅटफॉर्म'वर यायला हव्यात, असे मुख्यमंत्री म्हणाले. विद्यापीठात अनेक अभ्यासक्रम आजच्या तारखेत सुरू आहेत. यातील किती अभ्यासक्रम खरोखरच कामाचे आहेत याची विद्यापीठाने तपासणी करायला हवी. अभ्यासक्रमांच्या वास्तविकतेचे मूल्यमापन करणे आवश्यक असल्याचे फडणवीस म्हणाले.