शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
2
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
3
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
4
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
5
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
6
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
7
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
8
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
9
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
10
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
11
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
12
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
13
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
14
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
15
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
16
उल्हासनगर महापालिका आयुक्त व आमदारात चर्चा, शहर समस्यांचा वाचला पाडा
17
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
18
Raja Raghuvanshi Murder: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
19
तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं?
20
पती ५०००० रुपयांचे कर्ज फेडू शकला नाही,पत्नीला विकलं; पण पुढे जे झालं ते ऐकून पोलीसही हैराण 

अनामत रकमेसाठी उमेदवारांच्या चकरा

By admin | Updated: May 7, 2014 02:24 IST

जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. यात अनेकांनी नामांकन अर्ज सादर केले होते. नामांकन अर्ज सादर करताना उमेदवाराने भरलेली अनामत रक्कम परत करण्याचा

 रकमेची माहिती नाही : ग्रा. पं. निवडणूक संपली

कारंजा (घाडगे): जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. यात अनेकांनी नामांकन अर्ज सादर केले होते. नामांकन अर्ज सादर करताना उमेदवाराने भरलेली अनामत रक्कम परत करण्याचा नियम आहे; मात्र कारंजा तालुक्यात ही रक्कम परत मिळावी, याकरिता संबंधितांना तहसील कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत असल्याचा प्रकार समोर आला आहे. कारंजा तालुक्यात मे महिन्यात १६ तारखेला विद्यमान सदस्यांचा कार्यकाळ संपणार आहे.

नव्याने तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम घोषीत होवून ३५ २३ मार्च २०१४ रोजी मतदान झाले. निवडणूक २७७ जागांकरिता असली तरी ७८३ उमेदवार रिंगणात होते. यात २६६ उमेदवार निवडून आले. यातही काही ठिकाणी आलेल्या अडचणीमुळे तालुक्यात १७ पदे रिक्त आहेत. निवडणुका मार्च महिन्यात आटोपल्या. विविध प्रवर्गातून नामनिर्देशन पत्रांच्या प्रत्येकी २० प्रमाणे ११०० अर्जांची विक्री झाली. याची रक्कम २२ हजारांच्या घरात आहे. निवडणूक रिंगणात असलेल्या तत्कालिन ७८३ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्राची अनामत रक्कम संबंधित आरओकडे जमा केली. आरओने ती रक्कम निवडणूक अधिकारी नायब तहसीलदार यांंच्याकडे जमा केली. सदर रक्कम तीन लाखांच्या घरात असल्याचे तहसील कार्यालयातून सांगण्यात आले. निवडणूक संपल्यामुळे ते उमेदवार तहसील कार्यालयात अनामत रक्कम परत मिळावी, याकरिता चकरा मारत आहे. नायब तहसीलदार निवडणूक हे गत दीड महिन्यापासून रजेवर आहेत. त्यांचा भ्रमनध्वनीसुध्दा प्रतिसाद देत नाही. ही रक्कम नेमकी कुठे आहे, याचा पत्ता खुद्द तहसीलदार बालपांडे यांनासुध्दा नाही. त्यामुळे संबंधित उमेदवारांत संभ्रम निर्माण झाला आहे. संबंधित उमेदवार अनामत रकमेकरिता चकरा मारुन थकले आहेत.

कार्यालयातर्फेसुद्धा त्यांना थकवल्या जात असल्याचे दिसून येते. संबंधितांना तहसील कार्यालयातून त्या रकमा परत करण्यास उशिर का होतोय, यामागील कारणही न समजणारे आहे. याबाबत संबंधितांनी तत्काळ लक्ष देत या रकमेची रितसर चौकशी करुन ती त्या उमेदवारांना द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे. या प्रकरणी तहसीलदार काय कारवाई करतात, याकडे तालुक्यात निवडणुकीत उभ्या असलेल्या त्या उमेदवारांचे लक्ष आहे.(शहर प्रतिनिधी)

नियम म्हणतात...

नामनिर्देशन पत्राची अनामत रक्कम ही तहसील कार्यालयाच्या नाझरकडे जमा असावी व ती रक्कम रितसर कोषागारात सुरक्षीत ठेवावी किंवा पोलीस निगराणीत असावी, असा नियम आहे.

या रकमेबाबत तहसील कार्यालयात विचारणा केली असता कुणालाही माहिती नसल्याचे समोर आले आहे. मग ही रक्कम कुठेच नाही, तर ती रक्कम नायब तहसीलदार निवडणूक यांनी नेमकी कुठे ठेवली, असा नवा प्रश्न उपस्थित झाला आहे. याबद्दल मला काहीच माहिती नाही. मी वर्धेला जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीत आहे. माहिती घेवून काय ते सांगतो. - जे. आर. बालपांडे तहसीलदार, कारंजा (घा.)