शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

'त्या' शिक्षण मंडळाच्या शाळांची मान्यता रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 10:38 IST

महाराष्ट्रातील विविध शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा करण्यात येईल व त्यासाठी कायद्यात संशोधन करून अधिक कठोर करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केली.

ठळक मुद्देमराठी सक्तीच्या घोषणेचे स्वागतपण कठोर अंमलबजावणीचा आग्रह

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्रातील विविध शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा करण्यात येईल व त्यासाठी कायद्यात संशोधन करून अधिक कठोर करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केली. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेचे साहित्य व शैक्षणिक क्षेत्रातून स्वागत होत असले तरी कठोर अंमलबजावणीसाठी शासन काय पावले उचलणार, कोणत्या वर्गापर्यंत ही सक्ती लागू असेल, याबाबत कोणतीही स्पष्टता दिसून येत नसल्याने साशंकताही व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे २००९ मध्ये तत्कालीन शासनानेही अशाप्रकारे आठवीपर्यंत मराठी सक्तीचे परिपत्रक काढले होते, मात्र अंमलबजावणीअभावी त्याचा फज्जा उडाला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची ही घोषणा केवळ घोषणा ठरू नये, असा आग्रह तज्ज्ञांनी धरला.

मुख्यमंत्री धाडस दाखविणार का?राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषेचे शिक्षण सक्तीचे करावे यासाठी राज्य शासनाने २००९ सालीच निर्णय जारी करून सीबीएसई, आयसीएसई आणि अन्य मंडळाच्या शाळांमध्ये ना हरकत प्रमाणपत्र देताना मराठी भाषा द्वितीय शिकविणे सक्तीचे केले होते. मात्र याची कठोरपणे अंमलबजावणी झाली नाही. ही अंमलबजावणी का झाली नाही? ज्यांनी केली नाही त्यांची चौकशी होणार का? त्यांच्या विरोधात काय कारवाई करणार? यांचीही उत्तरे मिळाली पाहिजेत. अशा नामांकित पाच/दहा शाळांची मान्यता रद्द करण्याचा दणका दिला तरच या शाळांचे व्यवस्थापन सुतासारखे सरळ होईल. त्यांची मान्यता रद्द करण्याचे धाडस मुख्यमंत्री फडणवीस दाखविणार का? त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी झाली नाही तर ही सक्ती पुन्हा कागदावरच राहील.- शेखर जोशी

मराठीतूनच रुजतात संस्काराची मुळेमराठी भाषा अनिवार्य करणे अगदी स्तुत्य निर्णय आहे. महाराष्ट्र राज्यात संपूर्ण कानाकोपऱ्यात मराठी भाषा विविध स्वरूपात बोलली जाते. जन्मत: मूल याच भाषेतून ज्ञान संवर्धनाचे कार्य करते. कुठलीही संकल्पना मुलांना त्यांच्या मातृभाषेतून किंवा सभोवताली बोलल्या जाणाºया भाषेत लवकर स्पष्ट होते. तसेच मराठी भाषेतून भावभावनांचे अगदी मार्मिक अध्यापन पद्धतीतून मुलांमध्ये संस्काराची मुळे रुजवायला मलाही अगदी सहज वाटली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी केलेली घोषणा योग्यच आहे. मात्र या घोषणेची काटेकोर अंमलबजावणी व्हावीे.- मुबारक सय्यद, मुख्याध्यापक, जिप शाळा खराशी

मराठी माणसांनीही कर्तव्य पार पाडावीमुख्यमंत्री यांनी ह्यमराठी सक्तीची करण्याची आणि त्याबाबत कठोर कायदा करण्यात येईल ह्यअशी जी विधानसभेत ग्वाही दिली त्याचं स्वागत आहे. कारण मराठी भाषा वाचविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. मराठी मुलांना मराठी येत नाही. नीट वाचता येत नाही, लिहिता येत नाही, ही लाजिरवाणी गोष्ट आहे. आपली ओळख कायम ठेवण्यासाठी शासनाच्या निर्णयाला हातभार लावणे हे प्रत्येक मराठी माणसाचे कर्तव्य आहे. मराठी बाबत कायदे करणे आणि ते अमलात आणणेही तेवढेच गरजेचे आहे.- विजया ब्राम्हणकार, लेखिका

गांभीर्य राहावेमहाराष्ट्रात राहणाºया प्रत्येकाला मराठी आलीच पाहिजे, त्याने मराठी शिकलीच पाहिजे. त्यासाठी कठोर कायदे करावे लागले तरी हरकत नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेचे स्वागतच आहे. मात्र मुख्यमंत्र्यांची ही घोषणा केवळ घोषणा राहू नये तर कठोरपणे अंमलात यावी. याकडे मुख्यमंत्री, शासन व प्रशासनाने गांभीर्याने पावले उचलणे काळाची गरज आहे.- शुभांगी भडभडे, लेखिका

घोषणेची अंमलबजावणी करावी.केवळ घोषणाबाजीने चालणार नाही तर ठोस कृती करण्याची गरज आहे. दक्षिणकडील राज्यात अशाप्रकारे मातृभाषेची सक्ती कठोरपणे अंमलात आणण्यात आली आहे. मराठी आज केवळ खेड्यापाड्यात आणि बहुजन वर्गात शिकण्यापुरती मर्यादित झाल्यासारखी वाटते. शासन, प्रशासन व या क्षेत्रातील लोकांनी प्रामाणिकपणे या घोषणेची अंमलबजावणी करावी.- शैलेंद्र लेंडे, मराठी विभाग प्रमुख,नागपूर विद्यापीठ

स्पष्टता दिसत नाहीमुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेचे खरोखरच स्वागत आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय हा आॅगस्ट २००९ मध्ये शासनाने आठवीपर्यंत मराठी सक्तीची करण्याची निर्णयाला धरूनच आहे की बारावीपर्यंत सक्तीची करण्याच्या आमच्या मागणीनुसार आहे, ही बाब स्पष्ट होत नाही किंवा त्यांनी स्पष्ट केली नाही. याशिवाय २००९ च्या निर्णयाची अंमलबजावणी का झाली नाही, ती न करणाऱ्यांची चौकशी करून कारवाई करणार का, हेही स्पष्ट करणे गरजेचे आहे.- डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी,ज्येष्ठ साहित्यिक

टॅग्स :marathiमराठी