शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
2
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
3
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
4
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
5
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
6
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
7
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
8
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
9
चर्चा युद्धबंदीची सुरू होती, रशियाने हल्ले वाढवले, प्रवाशांवर बॉम्ब टाकले; ९ जणांचा मृत्यू झाला
10
मनाविरुद्ध गोष्टी घडल्या की राग राग होतो? त्यावर नियंत्रण मिळवण्याच्या सोप्या टिप्स!
11
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
12
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
13
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?
14
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
15
Coronavirus Outbreak: टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
16
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...
17
"लग्नानंतर टिंडरवर अकाऊंट उघडून मी दोन तीन मुलींसोबत..."; अभिजीत सावंतची कबूली, म्हणाला-
18
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या
19
कारगिलमधून बेपत्ता झालेली नागपूरची महिला LOC पार करून पाकिस्तानात पोहचली, कारण...
20
परेश रावल यांचा 'हेराफेरी ३'ला रामराम! सुनील शेट्टीनं सोडलं मौन, म्हणाला - "बाबू भैयाशिवाय श्याम..."

कालवे ठरताहेत निरुपयोगी

By admin | Updated: March 26, 2016 02:51 IST

गोसेखुर्द आणि आंभोरा उपसा सिंचन योजनेंतर्गत कुही तालुक्यातील पचखेडी शिवारात कालव्याचे बांधकाम करण्यात आले.

उपसा सिंचन योजना : कोट्यवधींचा खर्च पाण्यातसुरेश नखाते पचखेडीगोसेखुर्द आणि आंभोरा उपसा सिंचन योजनेंतर्गत कुही तालुक्यातील पचखेडी शिवारात कालव्याचे बांधकाम करण्यात आले. या कालव्यांच्या निर्मितीवर राज्य शासनाने कोट्यावधी रुपये खर्च केले. वास्तवात, २५ वर्षांमध्ये या कालव्यांमध्ये बोटावर मोजण्याइतक्यावेळी पाणी सोडण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांना या कालव्यांचा फारसा उपयोग होत नसल्याने ते निरुपयोगी ठरू पाहात आहेत. कुही तालुक्यात गोसेखुर्द आणि आंभोरा उपसा सिंचन योजनांची निर्मिती करण्यात आली. खरं तर या दोन्ही योजना शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर ठरणाऱ्या होत्या. या योजनांमार्फत शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी १९८४ मध्ये कालव्यांच्या निर्मितीला सुरुवात करण्यात आली. या कालव्यांचे कामही संथगतीने करण्यात आले. त्यासाठी विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्यावतीने निधी उपलब्ध करून देण्यात आला. या कालव्यामुळे पचखेडी, जीवनापूर (पुनर्वसन), सोनेगाव (पुनर्वसन), सिर्सी (पुनर्वसन), ब्राम्हणी (पुनर्वसन), मदनापूर, परसोडी, कऱ्हांडला, शिकारपूर, बोथली यासह अन्य शिवारातील शेकडो एकर शेती ओलिताखाली येणार होती. रबीच्या पिकांना पाणी मिळावे, यासाठी कालव्यात पाणी सोडण्याची अनेकदा मागणी केली जाते. परंतु, पाटबंधारे विभागाचे अधिकारी लक्ष देत नाही, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. दीड महिन्यापूर्वी या कालव्यात एकदा पाणी सोडण्यात आले होते. तेही पुरेसे नव्हते. त्यावेळी पाणी कालव्याच्या टोकावर पोहोचले नव्हते, अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाशिवाय, या कालव्यात पाणी सोडणे शक्य नाही, अशी माहिती पाटबंधारे विभागातील अधिकारी प्रत्येकवेळी देतात. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे विचार केली असता, ते टाळाटाळ करीत वेळ मारून नेतात. त्यामुळे या शिवारात मुबलक पाणी असूनही शेतकऱ्यांना केवळ खरीप पिकांवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे या समस्येवर तोडगा काढणे गरजेचे आहे.