शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धी महामार्गावर वाहनांचे टायर देऊ शकतात धोका?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2022 08:00 IST

Nagpur News समृद्धी महामार्गावरील वेग पाहता, वाहनचालकांनी टायर्सची काळजी घ्यावी असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

ठळक मुद्देऑटोमोबाइल तज्ज्ञ म्हणतात, टायरची काळजी घ्या

मंगेश व्यवहारे

नागपूर : समृद्धी महामार्गाच्या बाबतीत लोकांमध्ये प्रचंड एक्साइटमेंट आहे. लोकार्पणाच्या दुसऱ्याच दिवशी १२०० वाहनांनी समृद्धीवरून शिर्डीला पोहोचण्याचा प्रयत्न केला. दररोज ही संख्या वाढतच आहे. सध्या तरी या महामार्गावरील वाहनांच्या वेगावर चेक नसल्याने वेगाच्या मर्यादा ओलांडल्या जात आहेत. वाहन चालक नॉनस्टॉप प्रवास करून वेगाद्वारे वेळेशी स्पर्धा करीत आहेत; पण हा वेगवान प्रवास करताना तुमच्या वाहनांचे टायर कधीही धोका देऊ शकतात. त्यामुळे ऑटोमोबाइल तज्ज्ञांनी या प्रवासात वाहनांच्या टायरची काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.

ऑटोमोबाइल तज्ज्ञ निखिल उंबरकर हे अपघात टाळण्यासाठी ऑटोमोबाइल क्षेत्रात वेगवेगळे प्रयोग करीत असतात. निखिल यांनी समृद्धी महामार्गाचे परीक्षण केले आहे. महामार्गाच्या लोकार्पणानंतर नागपूर-शिर्डीच्या प्रवासाबाबत लोकांमध्ये प्रचंड एक्साइटमेंट आहे. वाहनात इंधन टाकले की ते थेट प्रवासाला निघत आहेत. पण प्रवासापूर्वी काळजी घेण्याचा सल्ला ते देतात.

- काय काळजी घ्यावी

१) लोक वाहनांच्या टायरमध्ये प्रवासापूर्वी साधी हवा भरतात. त्यात ७८ टक्के नायट्रोजन, २१ टक्के ऑक्सिजन व १ टक्का इतर वायू असतो. वाहनामध्ये ३२ ते ३३ बार हवा भरली जाते. नॉनस्टॉप वाहन चालविल्यानंतर या टायरमध्ये हवा एक्सपाँड होते. ३२ बार भरलेली हवा ४५ व ५० पर्यंत पोहोचू शकते. त्यामुळे टायर फुटू शकतो, म्हणून नायट्रोजन हवा वाहनांच्या टायरमध्ये भरावी.

२) एवढा लांब प्रवास करताना टायरची साइड वॉल चेक केली पाहिजे. गाडीचे अलायमेंट बरोबर तपासले पाहिजे. नॉनस्टॉप वाहन चालवू नये. अन्यथा टायर आणि इंजिनवर त्याचा परिणाम होतो. १०० ते १५० किलोमीटरमध्ये १० मिनिटांचा किमान ब्रेक घ्यावा.

३) हिवाळा असल्यामुळे रस्त्याचे तापमान कमी आहे; पण उन्हाळ्यात रस्त्याचे तापमान प्रचंड वाढते. त्यातच वाहनांचा वेग व सातत्याने वाहन चालविल्यास टायरचे तापमान वाढून टायर कधीही धोका देऊ शकतो.

- लाइटवेट वाहनांनी गाठूच नये वेगाची मर्यादा

लाइटवेट असलेल्या ऑल्टो, वॅगनार, व्हॅन यासारख्या वाहनांनी किंवा ज्या वाहनाचे चाक लहान आहे. त्यांनी वेगाशी स्पर्धा करूच नये, असा सल्ला त्यांचा आहे. इनोव्हा, फॉर्च्युनर, बीएमडब्ल्यू, मर्सिडीजसारखी वाहने ताशी १२० वेगापर्यंत धावू शकतात; पण त्यापेक्षा जास्त वेगाचे धाडस करू नये. त्यातही प्रवासापूर्वी वाहनांचे टायर तपासून घ्यावे.

 

- महामार्गावरील अपघाताची कारणमीमांसा करीत असतानाच काही कारणे पुढे आली. त्यातील महत्त्वाचे कारण म्हणजे ५०० किलोमीटरचा प्रवास करताना वाहन चालकाने प्रवासापूर्वी टायरची तपासणी करणे महत्त्वाचे आहे. मी तर माझ्या वाहनात ‘रुफ फ्लॅप ब्रेक’ ही इमर्जन्सी ब्रेक सिस्टम इन्स्टॉल केली आहे. वाहन १२०, १४० ते १६० पर्यंत वेगाने असतानाही ब्रेक लावल्यास वाहन अनियंत्रित होत नाही. टायरची रस्त्यावरची ग्रीप सुटत नाही. ठराविक अंतरापूर्वीच गाडी थांबते. समृद्धी महामार्गावर जनावरांचे हर्डल्स असल्यामुळे सेफ्टी फिचर्स वाहनात लावा. वेगावर नियंत्रण ठेवा, वेग व वेळेशी स्पर्धा करू नका अन् सुरक्षित प्रवास करा.

-निखिल उंबरकर, ऑटोमोबाइल तज्ज्ञ

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग