शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
2
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
3
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
4
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
5
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
6
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
7
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
8
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
9
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
10
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
11
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
12
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
13
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
14
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
15
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
16
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
17
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
18
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
19
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
20
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धी महामार्गावर वाहनांचे टायर देऊ शकतात धोका?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2022 08:00 IST

Nagpur News समृद्धी महामार्गावरील वेग पाहता, वाहनचालकांनी टायर्सची काळजी घ्यावी असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

ठळक मुद्देऑटोमोबाइल तज्ज्ञ म्हणतात, टायरची काळजी घ्या

मंगेश व्यवहारे

नागपूर : समृद्धी महामार्गाच्या बाबतीत लोकांमध्ये प्रचंड एक्साइटमेंट आहे. लोकार्पणाच्या दुसऱ्याच दिवशी १२०० वाहनांनी समृद्धीवरून शिर्डीला पोहोचण्याचा प्रयत्न केला. दररोज ही संख्या वाढतच आहे. सध्या तरी या महामार्गावरील वाहनांच्या वेगावर चेक नसल्याने वेगाच्या मर्यादा ओलांडल्या जात आहेत. वाहन चालक नॉनस्टॉप प्रवास करून वेगाद्वारे वेळेशी स्पर्धा करीत आहेत; पण हा वेगवान प्रवास करताना तुमच्या वाहनांचे टायर कधीही धोका देऊ शकतात. त्यामुळे ऑटोमोबाइल तज्ज्ञांनी या प्रवासात वाहनांच्या टायरची काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.

ऑटोमोबाइल तज्ज्ञ निखिल उंबरकर हे अपघात टाळण्यासाठी ऑटोमोबाइल क्षेत्रात वेगवेगळे प्रयोग करीत असतात. निखिल यांनी समृद्धी महामार्गाचे परीक्षण केले आहे. महामार्गाच्या लोकार्पणानंतर नागपूर-शिर्डीच्या प्रवासाबाबत लोकांमध्ये प्रचंड एक्साइटमेंट आहे. वाहनात इंधन टाकले की ते थेट प्रवासाला निघत आहेत. पण प्रवासापूर्वी काळजी घेण्याचा सल्ला ते देतात.

- काय काळजी घ्यावी

१) लोक वाहनांच्या टायरमध्ये प्रवासापूर्वी साधी हवा भरतात. त्यात ७८ टक्के नायट्रोजन, २१ टक्के ऑक्सिजन व १ टक्का इतर वायू असतो. वाहनामध्ये ३२ ते ३३ बार हवा भरली जाते. नॉनस्टॉप वाहन चालविल्यानंतर या टायरमध्ये हवा एक्सपाँड होते. ३२ बार भरलेली हवा ४५ व ५० पर्यंत पोहोचू शकते. त्यामुळे टायर फुटू शकतो, म्हणून नायट्रोजन हवा वाहनांच्या टायरमध्ये भरावी.

२) एवढा लांब प्रवास करताना टायरची साइड वॉल चेक केली पाहिजे. गाडीचे अलायमेंट बरोबर तपासले पाहिजे. नॉनस्टॉप वाहन चालवू नये. अन्यथा टायर आणि इंजिनवर त्याचा परिणाम होतो. १०० ते १५० किलोमीटरमध्ये १० मिनिटांचा किमान ब्रेक घ्यावा.

३) हिवाळा असल्यामुळे रस्त्याचे तापमान कमी आहे; पण उन्हाळ्यात रस्त्याचे तापमान प्रचंड वाढते. त्यातच वाहनांचा वेग व सातत्याने वाहन चालविल्यास टायरचे तापमान वाढून टायर कधीही धोका देऊ शकतो.

- लाइटवेट वाहनांनी गाठूच नये वेगाची मर्यादा

लाइटवेट असलेल्या ऑल्टो, वॅगनार, व्हॅन यासारख्या वाहनांनी किंवा ज्या वाहनाचे चाक लहान आहे. त्यांनी वेगाशी स्पर्धा करूच नये, असा सल्ला त्यांचा आहे. इनोव्हा, फॉर्च्युनर, बीएमडब्ल्यू, मर्सिडीजसारखी वाहने ताशी १२० वेगापर्यंत धावू शकतात; पण त्यापेक्षा जास्त वेगाचे धाडस करू नये. त्यातही प्रवासापूर्वी वाहनांचे टायर तपासून घ्यावे.

 

- महामार्गावरील अपघाताची कारणमीमांसा करीत असतानाच काही कारणे पुढे आली. त्यातील महत्त्वाचे कारण म्हणजे ५०० किलोमीटरचा प्रवास करताना वाहन चालकाने प्रवासापूर्वी टायरची तपासणी करणे महत्त्वाचे आहे. मी तर माझ्या वाहनात ‘रुफ फ्लॅप ब्रेक’ ही इमर्जन्सी ब्रेक सिस्टम इन्स्टॉल केली आहे. वाहन १२०, १४० ते १६० पर्यंत वेगाने असतानाही ब्रेक लावल्यास वाहन अनियंत्रित होत नाही. टायरची रस्त्यावरची ग्रीप सुटत नाही. ठराविक अंतरापूर्वीच गाडी थांबते. समृद्धी महामार्गावर जनावरांचे हर्डल्स असल्यामुळे सेफ्टी फिचर्स वाहनात लावा. वेगावर नियंत्रण ठेवा, वेग व वेळेशी स्पर्धा करू नका अन् सुरक्षित प्रवास करा.

-निखिल उंबरकर, ऑटोमोबाइल तज्ज्ञ

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग