शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

समृद्धी महामार्गावर वाहनांचे टायर देऊ शकतात धोका?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2022 08:00 IST

Nagpur News समृद्धी महामार्गावरील वेग पाहता, वाहनचालकांनी टायर्सची काळजी घ्यावी असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

ठळक मुद्देऑटोमोबाइल तज्ज्ञ म्हणतात, टायरची काळजी घ्या

मंगेश व्यवहारे

नागपूर : समृद्धी महामार्गाच्या बाबतीत लोकांमध्ये प्रचंड एक्साइटमेंट आहे. लोकार्पणाच्या दुसऱ्याच दिवशी १२०० वाहनांनी समृद्धीवरून शिर्डीला पोहोचण्याचा प्रयत्न केला. दररोज ही संख्या वाढतच आहे. सध्या तरी या महामार्गावरील वाहनांच्या वेगावर चेक नसल्याने वेगाच्या मर्यादा ओलांडल्या जात आहेत. वाहन चालक नॉनस्टॉप प्रवास करून वेगाद्वारे वेळेशी स्पर्धा करीत आहेत; पण हा वेगवान प्रवास करताना तुमच्या वाहनांचे टायर कधीही धोका देऊ शकतात. त्यामुळे ऑटोमोबाइल तज्ज्ञांनी या प्रवासात वाहनांच्या टायरची काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.

ऑटोमोबाइल तज्ज्ञ निखिल उंबरकर हे अपघात टाळण्यासाठी ऑटोमोबाइल क्षेत्रात वेगवेगळे प्रयोग करीत असतात. निखिल यांनी समृद्धी महामार्गाचे परीक्षण केले आहे. महामार्गाच्या लोकार्पणानंतर नागपूर-शिर्डीच्या प्रवासाबाबत लोकांमध्ये प्रचंड एक्साइटमेंट आहे. वाहनात इंधन टाकले की ते थेट प्रवासाला निघत आहेत. पण प्रवासापूर्वी काळजी घेण्याचा सल्ला ते देतात.

- काय काळजी घ्यावी

१) लोक वाहनांच्या टायरमध्ये प्रवासापूर्वी साधी हवा भरतात. त्यात ७८ टक्के नायट्रोजन, २१ टक्के ऑक्सिजन व १ टक्का इतर वायू असतो. वाहनामध्ये ३२ ते ३३ बार हवा भरली जाते. नॉनस्टॉप वाहन चालविल्यानंतर या टायरमध्ये हवा एक्सपाँड होते. ३२ बार भरलेली हवा ४५ व ५० पर्यंत पोहोचू शकते. त्यामुळे टायर फुटू शकतो, म्हणून नायट्रोजन हवा वाहनांच्या टायरमध्ये भरावी.

२) एवढा लांब प्रवास करताना टायरची साइड वॉल चेक केली पाहिजे. गाडीचे अलायमेंट बरोबर तपासले पाहिजे. नॉनस्टॉप वाहन चालवू नये. अन्यथा टायर आणि इंजिनवर त्याचा परिणाम होतो. १०० ते १५० किलोमीटरमध्ये १० मिनिटांचा किमान ब्रेक घ्यावा.

३) हिवाळा असल्यामुळे रस्त्याचे तापमान कमी आहे; पण उन्हाळ्यात रस्त्याचे तापमान प्रचंड वाढते. त्यातच वाहनांचा वेग व सातत्याने वाहन चालविल्यास टायरचे तापमान वाढून टायर कधीही धोका देऊ शकतो.

- लाइटवेट वाहनांनी गाठूच नये वेगाची मर्यादा

लाइटवेट असलेल्या ऑल्टो, वॅगनार, व्हॅन यासारख्या वाहनांनी किंवा ज्या वाहनाचे चाक लहान आहे. त्यांनी वेगाशी स्पर्धा करूच नये, असा सल्ला त्यांचा आहे. इनोव्हा, फॉर्च्युनर, बीएमडब्ल्यू, मर्सिडीजसारखी वाहने ताशी १२० वेगापर्यंत धावू शकतात; पण त्यापेक्षा जास्त वेगाचे धाडस करू नये. त्यातही प्रवासापूर्वी वाहनांचे टायर तपासून घ्यावे.

 

- महामार्गावरील अपघाताची कारणमीमांसा करीत असतानाच काही कारणे पुढे आली. त्यातील महत्त्वाचे कारण म्हणजे ५०० किलोमीटरचा प्रवास करताना वाहन चालकाने प्रवासापूर्वी टायरची तपासणी करणे महत्त्वाचे आहे. मी तर माझ्या वाहनात ‘रुफ फ्लॅप ब्रेक’ ही इमर्जन्सी ब्रेक सिस्टम इन्स्टॉल केली आहे. वाहन १२०, १४० ते १६० पर्यंत वेगाने असतानाही ब्रेक लावल्यास वाहन अनियंत्रित होत नाही. टायरची रस्त्यावरची ग्रीप सुटत नाही. ठराविक अंतरापूर्वीच गाडी थांबते. समृद्धी महामार्गावर जनावरांचे हर्डल्स असल्यामुळे सेफ्टी फिचर्स वाहनात लावा. वेगावर नियंत्रण ठेवा, वेग व वेळेशी स्पर्धा करू नका अन् सुरक्षित प्रवास करा.

-निखिल उंबरकर, ऑटोमोबाइल तज्ज्ञ

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग