शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
3
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
4
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
5
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
6
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
7
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
8
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
9
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
10
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
11
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
12
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
13
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
14
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
15
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
16
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
17
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
18
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
19
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
20
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!

परीक्षा आयोजनासाठी अधिसभेची विशेष सभा बोलवा : प्राधिकरण सदस्यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2020 20:39 IST

अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा राज्य शासनाचा निर्णय हा परस्पर घेतलेला आहे. यासंदर्भात विद्यापीठे व शिक्षणतज्ज्ञांना विश्वासात घ्यायला हवे होते. विद्यापीठे स्वतंत्र व स्वायत्त संस्था आहेत. शासनाने विद्यापीठ कायद्याचे उल्लंघन केले आहे, असा आरोप राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्राधिकरण सदस्यांकडून करण्यात आला आहे. परीक्षा आयोजनासाठी अधिसभेची विशेष सभा बोलवा, अशी मागणीदेखील पुढे आली आहे.

ठळक मुद्देशासनाकडून विद्यापीठ कायद्याचे उल्लंघन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा राज्य शासनाचा निर्णय हा परस्पर घेतलेला आहे. यासंदर्भात विद्यापीठे व शिक्षणतज्ज्ञांना विश्वासात घ्यायला हवे होते. विद्यापीठे स्वतंत्र व स्वायत्त संस्था आहेत. शासनाने विद्यापीठ कायद्याचे उल्लंघन केले आहे, असा आरोप राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्राधिकरण सदस्यांकडून करण्यात आला आहे. परीक्षा आयोजनासाठी अधिसभेची विशेष सभा बोलवा, अशी मागणीदेखील पुढे आली आहे.परीक्षा संदर्भातील निर्देश व आदेश काढणे हे कायद्यानुसार विद्यापीठाचे कार्य आहे. त्यासाठी अधिसभा आहे. अधिसभा प्रतिनिधी सर्वानुमते तत्संबंधी निर्णय घेत असतात. विशेष परिस्थितीत सरकार केवळ विचार प्रकट करू शकते. परंतु परीक्षा आयोजन व संचालन हा सरकारच्या अधिकार क्षेत्रात नसून, विद्यापीठ कायद्याच्या कलम ४८(ख) (घ) नुसार विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील अधिकार आहे. त्यामुळे सरकारने त्यात हस्तक्षेप करू नये, अशी भूमिका प्राधिकरण सदस्यांनी मांडली आहे.अधिसभा सदस्य प्रवीण उदापुरे यांनी यासंदर्भात राज्यपालांना पत्र लिहिले आहे. कोरोनामुळे राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून विद्यापीठाच्या परीक्षा न झाल्याने विद्यार्थी संभ्रमात आहेत. यातच मुख्यमंत्री व उच्च शिक्षण मंत्री परस्पर विरोधी वक्तव्य देत आहेत. पदवी परीक्षेसाठी निर्णय २० जूनला घोषित करू, असे वक्तव्य उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आधी दिले होते. तर मुख्यमंत्र्यांनी अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेता अगोदरच्या सत्रातील कामगिरीच्या आधारे विद्यार्थ्यांना श्रेणी देण्यात येईल, असे स्पष्ट केले. यामुळे राज्यातील विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रम आणखी वाढला आहे. विद्यापीठ कायद्यानुसार राज्यपाल हे अधिसभेचे प्रमुख असून, परीक्षेसंदर्भात निर्णय घेण्यासाठी तातडीची विशेष सभा बोलवावी, अशी मागणी उदापुरे यांनी केली आहे.अन्यथा कोरोना पदवीचा ठप्पा लागेलविद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी परीक्षा घेणे अत्यंत आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना अगोदरच्या कामगिरीच्या आधारे उत्तीर्ण केल्यास त्यांच्यावर ‘कोरोना डिग्री’चा ठप्पा लागेल. पुढे त्यांना नोकरीत देखील डावलले जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे उशिरा का होईना पण परीक्षा घ्या, अशी मागणी उदापुरे यांनी केली आहे.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठexamपरीक्षा