शहरं
Join us  
Trending Stories
1
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
2
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
3
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
4
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
5
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
6
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
7
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
8
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
9
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
10
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
11
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
12
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
13
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
14
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
15
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
16
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
17
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
18
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
19
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
20
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...

परीक्षा आयोजनासाठी अधिसभेची विशेष सभा बोलवा : प्राधिकरण सदस्यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2020 20:39 IST

अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा राज्य शासनाचा निर्णय हा परस्पर घेतलेला आहे. यासंदर्भात विद्यापीठे व शिक्षणतज्ज्ञांना विश्वासात घ्यायला हवे होते. विद्यापीठे स्वतंत्र व स्वायत्त संस्था आहेत. शासनाने विद्यापीठ कायद्याचे उल्लंघन केले आहे, असा आरोप राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्राधिकरण सदस्यांकडून करण्यात आला आहे. परीक्षा आयोजनासाठी अधिसभेची विशेष सभा बोलवा, अशी मागणीदेखील पुढे आली आहे.

ठळक मुद्देशासनाकडून विद्यापीठ कायद्याचे उल्लंघन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा राज्य शासनाचा निर्णय हा परस्पर घेतलेला आहे. यासंदर्भात विद्यापीठे व शिक्षणतज्ज्ञांना विश्वासात घ्यायला हवे होते. विद्यापीठे स्वतंत्र व स्वायत्त संस्था आहेत. शासनाने विद्यापीठ कायद्याचे उल्लंघन केले आहे, असा आरोप राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्राधिकरण सदस्यांकडून करण्यात आला आहे. परीक्षा आयोजनासाठी अधिसभेची विशेष सभा बोलवा, अशी मागणीदेखील पुढे आली आहे.परीक्षा संदर्भातील निर्देश व आदेश काढणे हे कायद्यानुसार विद्यापीठाचे कार्य आहे. त्यासाठी अधिसभा आहे. अधिसभा प्रतिनिधी सर्वानुमते तत्संबंधी निर्णय घेत असतात. विशेष परिस्थितीत सरकार केवळ विचार प्रकट करू शकते. परंतु परीक्षा आयोजन व संचालन हा सरकारच्या अधिकार क्षेत्रात नसून, विद्यापीठ कायद्याच्या कलम ४८(ख) (घ) नुसार विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील अधिकार आहे. त्यामुळे सरकारने त्यात हस्तक्षेप करू नये, अशी भूमिका प्राधिकरण सदस्यांनी मांडली आहे.अधिसभा सदस्य प्रवीण उदापुरे यांनी यासंदर्भात राज्यपालांना पत्र लिहिले आहे. कोरोनामुळे राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून विद्यापीठाच्या परीक्षा न झाल्याने विद्यार्थी संभ्रमात आहेत. यातच मुख्यमंत्री व उच्च शिक्षण मंत्री परस्पर विरोधी वक्तव्य देत आहेत. पदवी परीक्षेसाठी निर्णय २० जूनला घोषित करू, असे वक्तव्य उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आधी दिले होते. तर मुख्यमंत्र्यांनी अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेता अगोदरच्या सत्रातील कामगिरीच्या आधारे विद्यार्थ्यांना श्रेणी देण्यात येईल, असे स्पष्ट केले. यामुळे राज्यातील विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रम आणखी वाढला आहे. विद्यापीठ कायद्यानुसार राज्यपाल हे अधिसभेचे प्रमुख असून, परीक्षेसंदर्भात निर्णय घेण्यासाठी तातडीची विशेष सभा बोलवावी, अशी मागणी उदापुरे यांनी केली आहे.अन्यथा कोरोना पदवीचा ठप्पा लागेलविद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी परीक्षा घेणे अत्यंत आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना अगोदरच्या कामगिरीच्या आधारे उत्तीर्ण केल्यास त्यांच्यावर ‘कोरोना डिग्री’चा ठप्पा लागेल. पुढे त्यांना नोकरीत देखील डावलले जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे उशिरा का होईना पण परीक्षा घ्या, अशी मागणी उदापुरे यांनी केली आहे.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठexamपरीक्षा