शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
2
'एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकेल'; अमेरिकेचा पाकिस्तानसोबत करार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
3
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात सर्व आरोपी निर्दोष सुटल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले...
4
बाईकचा चेसिस नंबर सापडलाच नाही! प्रज्ञा सिंह ठाकूर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून कशा सुटल्या?
5
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावे लागणार; पाहा नवे दर
6
मला माझे ९०० रुपये परत हवेत; मालेगाव बॉम्बस्फोटात निर्दोष सुटलेल्या समीर कुलकर्णींची मागणी 
7
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण निकाल: सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता, कुणावर होते काय आरोप?
8
Upcoming Smartphones: विवो, रेडमीपासून ते गूगल पिक्सेलपर्यंत; ऑगस्टमध्ये पडणार स्मार्टफोनचा पाऊस!
9
पाकिस्तानी बॉर्डरजवळ विखुरलेल्या बांगड्यांचं सत्य काय?; भारताने शोधून काढलं दडलेलं रहस्य
10
मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निर्णयावर ओवेसी नाराज, मोदी सरकारवर केले गंभीर आरोप...
11
शिक्षण महागलं! "ABCD शिकवण्याचे २.५ लाख द्यायचे?"; लेकीची नर्सरीची फी पाहून आई शॉक
12
सावधान! AI मुळे 'या' नोकऱ्या धोक्यात? मायक्रोसॉफ्टच्या अभ्यासात धक्कादायक खुलासा, तुमची नोकरी सुरक्षित आहे का?
13
ट्रम्प यांचा भारतावरील टॅरिफ बॉम्ब अमेरिकन लोकांवरच उलटणार? औषधांच्या किंमती वाढण्याचा धोका
14
"राजकीय बदनामीच्या षड्यंत्राचा पर्दाफाश, काँग्रेसने हिंदूंची माफी मागावी", भाजपाचा हल्लाबोल
15
"हिंदू दहशतवादी नाही, शाहांचं विधान अन् आज कोर्टात आरोपींची निर्दोष सुटका हा फक्त योगायोग"
16
१७ वर्षांनी आरोपी निर्दोष सुटले, मग दोषी कुठे आहेत?; मालेगाव स्फोट खटल्याच्या निकालानंतर प्रश्नचिन्ह
17
धक्कादायक! ८ वर्षांच्या चिमुकल्याच्या गुप्तांगावर शिक्षिकेनं फवारलं कॉलीन; नालासोपाऱ्याच्या शाळेला टाळं
18
लॉर्ड्स मैदानावर खेळला शाहिद कपूर, इंग्लंडच्या माजी खेळाडूंसोबत शेअर केले Photo
19
Malegaon Blast Case Verdict : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष सुटताच प्रज्ञा सिंह भावूक, अश्रू अनावर, म्हणाल्या - 'भगवा जिंकला...'
20
मालेगाव बॉम्बस्फोट; कधी अन् कसा झाला? किती लोक मृत्यूमुखी पडले? जाणून घ्या पूर्ण टाईमलाईन

मौन पदयात्रेतून संवैधानिक सहिष्णुता टिकविण्याची हाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 22:28 IST

देशाचे वातावरण सध्या पूर्वीसारखे राहिले नाही. धर्माच्या नावाखाली लोकांची माथी भडकवून देशात अराजकता निर्माण करण्याचा कट शिजतोय. देशाची शांतता आणि संविधानाने दिलेले विचारस्वातंत्र्य नष्ट करून पुन्हा ‘कोड आॅफ मनू’ लागू करण्याचे हे षड्यंत्र आहे. नागरिकांनो हे षड्यंत्र ओळखा आणि संविधानाची सहिष्णुता टिकविण्यासाठी एकत्रित या, असा संदेश देताना दक्षिणायानच्या शेकडो कार्यकर्त्यांनी मंगळवारी दीक्षाभूमीहून मौन पदयात्रा काढली.

ठळक मुद्देदेशभरातील साहित्यिक, विचारवंतांचा सहभाग : दक्षिणायनचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशाचे वातावरण सध्या पूर्वीसारखे राहिले नाही. धर्माच्या नावाखाली लोकांची माथी भडकवून देशात अराजकता निर्माण करण्याचा कट शिजतोय. देशाची शांतता आणि संविधानाने दिलेले विचारस्वातंत्र्य नष्ट करून पुन्हा ‘कोड आॅफ मनू’ लागू करण्याचे हे षड्यंत्र आहे. नागरिकांनो हे षड्यंत्र ओळखा आणि संविधानाची सहिष्णुता टिकविण्यासाठी एकत्रित या, असा संदेश देताना दक्षिणायानच्या शेकडो कार्यकर्त्यांनी मंगळवारी दीक्षाभूमीहून मौन पदयात्रा काढली.सत्य, अहिंसा व संविधान सुरक्षेचा संदेश देण्यासाठी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर, राजमोहन गांधी व दक्षिणायनचे डॉ. गणेश देवी यांच्या नेतृत्वात निघालेल्या मौन पदयात्रेत देशभरातील पुरोगामी विचारांचा पुरस्कार करणारे नामवंत साहित्यिक, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते या पदयात्रेत सहभागी झाले होते. यामध्ये कुमार शिराळकर, कुमार केतकर, रावसाहेब कसबे, मेधा पाटकर, मेधा पानसरे, उल्का महाजन, लीलाताई चितळे, डॉ. प्रज्ञा दया पवार, राजन अनवर , विद्या बाळ, शारदा साठे, नागेश चौधरी, धनाजी गुरव, राजन खान, डॉ. क्रिष्णा कांबळे, अमिताभ पावडे, कवी ज्ञानेश वाकुडकर, सुनैना आझाद, भालचंद्र कांगो, अरुणा सबाने, ई. झेड. खोब्रागडे, हरिभाऊ केदार, प्रा. प्रमोद मुनघाटे, जनमंचचे अध्यक्ष प्रा. शरद पाटील, विलास भोंगाडे, डॉ. हरीश धुरट, प्रज्ज्वला तट्टे, विभा पुरी दास, के. के. चक्रवर्ती, प्रा. अंजली मायदेव, आसाराम लोमटे, प्रफुल्ल शिलेदार, रजिया पटेल, हमीद दाभोळकर, दामोदर मौझो, दत्ता नाईक, राजन खान, वीरा राठोड, प्रल्हाद लुलेकर, वैशाली रोडे, प्रभु राजगडकर, के. नीला, सुरेखा देवी, भारती शर्मा, मंदार काळे, निशा शिरुरकर, मीनल सोहनी, शिवाजी गायकवाड, अभय कांता, सुधीर देसाई, संदेश प्रभुदेसाई, प्रतिभा शिंदे, निला लिमये, सुनिती धारवडकर, सुरेश सावंत, वसंत एकबोटे, मीनाक्षी बाली, सत्यपाल राजपूत, वनराज तुळजापूरकर, धनंजय कांबळे, नीता साने, शमसुद्दीन तांबोळी, सुनयना अजात, वनराज चावला, पल्लवी चौधरी, चेतना दीक्षित तसेच जमाते इस्लामीचे डॉ. अनवर सिद्दीकी, इरशाद खान, महिला अध्यक्ष डॉ. साबिया यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले.सुरुवातीला दीक्षाभूमीवर तथागत बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करीत पदयात्रा सुरू करण्यात आली. हातात देशातील महापुरुषांचे फोटोसह अनेक प्रकारचे संदेश देणारे फलक घेऊन व्हेरायटी चौकात महात्मा गांधी यांना नमन करण्यात आले. धनवटे नॅशनल कॉलेजला पदयात्रेचे समापन करण्यात आले.

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर