शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
7
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
8
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
9
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
10
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
11
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
12
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
13
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
14
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
15
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
16
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
17
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
18
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
19
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
20
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी

शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी २६ मार्चला भारत बंदची हाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:08 IST

नागपूर : शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आणि संयुक्त किसान मोर्चाने २६ मार्चला जाहीर केलेल्या भारत बंदच्या समर्थनार्थ नागपुरातील किसान संघर्ष समन्वय ...

नागपूर : शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आणि संयुक्त किसान मोर्चाने २६ मार्चला जाहीर केलेल्या भारत बंदच्या समर्थनार्थ नागपुरातील किसान संघर्ष समन्वय समितीने पाठिंबा व्यक्त केला आहे. दिल्लीमधील आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी या दिवशी नागपुरात व्यापाऱ्यांना समर्थन देण्याचे आवाहन केले आहे. काँग्रेसनेही पाठिंबा दर्शवून उपोषण करण्याचे जाहीर केले आहे.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मागील ११० दिवसापासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरू आहे. संयुक्त किसान मोर्चाने केलेल्या आवाहनानुसार २६ मार्चला भारत बंदची हाक देण्यात आली आहे. नागपुरातील किसान संघर्ष समन्वय समितीनेही या बंदला पाठिंबा दर्शविला आहे. मात्र नागपुरातील कोरोनाची परिस्थिती, सातत्याने सुरू असलेले लॉकडाऊन त्यामुळे झालेली व्यापाराची परिस्थिती लक्षात घेऊन सर्व व्यापाऱ्यांनी या संपाला समर्थन द्यावे, अशी भूमिका घेत आवाहन केले आहे.

विदर्भभर हा बंद पाळला जाणार आहे. मात्र या दिवशी नागपुरात कोणतेही आंदोलन करण्यात येणार नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असंघटित कामगार, शेतकरी, शेतमजूर यांची उपासमार होणार नाही, त्यांना गरजेपुरते धान्य व पैसा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य व केंद्र शासनाने पावले उचलावीत, अशी मागणी किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने संयोजक अरुण वनकर व अरुण लाटकर यांनी केली आहे.

...

काँग्रेसचा सक्रिय पाठिंबा, राज्यभर करणार उपोषण

दरम्यान या बंदला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्याविरोधात आणि महागाईविरोधात राज्यभर उपोषण केले जाणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. या दिवशी सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत राज्य, विभाग, जिल्हा व तालुका मुख्यालयी उपोषण करण्यात येणार आहे.