शहरं
Join us  
Trending Stories
1
"एअर इंडियाच्या बोइंग 787 विमानांची उड्डाणं रोखावीत"; भारतीय पायलट संघाचं सरकारला पत्र; केल्या तीन मागण्या
2
“लोकशाही वाचवण्यासाठी तुम्हीही पुढाकार घ्या”; राऊतांचे CM फडणवीसांना आवाहन, प्रकरण काय?
3
नोबेल हुकले तरी ट्रम्प यांचा तोरा कायम; म्हणाले, “लाखो लोकांचे जीव वाचवल्याचा जास्त आनंद”
4
CM फडणवीसांकडून क्लीन चिट मिळताच योगेश कदमांनी मन मोकळे केले, भली मोठी पोस्ट लिहीत म्हणाले...
5
आता ओबीसींचे वादळ रस्त्यावर;  ...तर मुंबई, ठाणे, पुणे जाम करू !
6
सोने-चांदी नव्हे, या धातूने दिले सर्वाधिक रिटर्न; डोळे विस्फारतील, धक्का बसेल... पण खरे आहे... 
7
"सोना कितना सोना है...", घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान करवाचौथला गोविंदाने बायकोला दिला सोन्याचा हार
8
आजचे राशीभविष्य : शनिवार ११ ऑक्टोबर २०२५; अचानक धनलाभ होईल, हितशत्रू सरसावतील, एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल
9
संपादकीय: राखेतून शांतता उगवेल? ट्रम्प इस्रायल-हमास युद्ध थांबवू शकणार?
10
नोबेल पुरस्कारापासून वंचित ट्रम्प यांचा रागाने थयथयाट; मारिया मचाडो यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार  
11
इक्विटी फंड गुंतवणुकीला ब्रेक; या ईटीएफमध्ये पैसा ओततायत लोक, तुम्ही...
12
लाडक्या बहिणींना ‘दिवाळी भेट’; सप्टेंबरचा हप्ता थेट खात्यात जमा
13
मंत्र्यांना फर्मान : आश्वासने दिली तर ती ९० दिवसांत पूर्णही करा !
14
आमदार विलास भुमरे म्हणाले, २० हजार मतदार बाहेरून आणले 
15
नोबेल नायतर नाय, तात्यांना थेट ‘महा-नोबेल’च! गावातच भांडणं लावायला आणि ती ‘मिटवायला’...
16
तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; नियोजन करून पडा बाहेर
17
शाळांमध्ये तिसऱ्या भाषेची सक्ती नकोच; प्रश्नावलीची गरज तरी काय? भाषातज्ज्ञांकडून प्रश्न उपस्थित
18
‘अर‌-ट्टाय’ काय आहे? ते व्हॉट्सॲपला पर्याय ठरेल? 
19
आधी धुरळा कुणाचा? जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीबाबत निर्णय दिवाळीनंतर
20
"माझा शारीरिक छळही झाला", घटस्फोटाबद्दल मयुरी वाघचा धक्कादायक खुलासा, म्हणाली- "ज्याच्यावर विश्वास ठेवला त्यानेच..."

शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी २६ मार्चला भारत बंदची हाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:08 IST

नागपूर : शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आणि संयुक्त किसान मोर्चाने २६ मार्चला जाहीर केलेल्या भारत बंदच्या समर्थनार्थ नागपुरातील किसान संघर्ष समन्वय ...

नागपूर : शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आणि संयुक्त किसान मोर्चाने २६ मार्चला जाहीर केलेल्या भारत बंदच्या समर्थनार्थ नागपुरातील किसान संघर्ष समन्वय समितीने पाठिंबा व्यक्त केला आहे. दिल्लीमधील आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी या दिवशी नागपुरात व्यापाऱ्यांना समर्थन देण्याचे आवाहन केले आहे. काँग्रेसनेही पाठिंबा दर्शवून उपोषण करण्याचे जाहीर केले आहे.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मागील ११० दिवसापासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरू आहे. संयुक्त किसान मोर्चाने केलेल्या आवाहनानुसार २६ मार्चला भारत बंदची हाक देण्यात आली आहे. नागपुरातील किसान संघर्ष समन्वय समितीनेही या बंदला पाठिंबा दर्शविला आहे. मात्र नागपुरातील कोरोनाची परिस्थिती, सातत्याने सुरू असलेले लॉकडाऊन त्यामुळे झालेली व्यापाराची परिस्थिती लक्षात घेऊन सर्व व्यापाऱ्यांनी या संपाला समर्थन द्यावे, अशी भूमिका घेत आवाहन केले आहे.

विदर्भभर हा बंद पाळला जाणार आहे. मात्र या दिवशी नागपुरात कोणतेही आंदोलन करण्यात येणार नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असंघटित कामगार, शेतकरी, शेतमजूर यांची उपासमार होणार नाही, त्यांना गरजेपुरते धान्य व पैसा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य व केंद्र शासनाने पावले उचलावीत, अशी मागणी किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने संयोजक अरुण वनकर व अरुण लाटकर यांनी केली आहे.

...

काँग्रेसचा सक्रिय पाठिंबा, राज्यभर करणार उपोषण

दरम्यान या बंदला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्याविरोधात आणि महागाईविरोधात राज्यभर उपोषण केले जाणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. या दिवशी सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत राज्य, विभाग, जिल्हा व तालुका मुख्यालयी उपोषण करण्यात येणार आहे.