शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

रॅपिड अ‍ॅण्टीबॉडी टेस्ट किट तातडीने खरेदी करा; हायकोर्टाचा सरकारला आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 09:26 IST

कोरोना संक्रमणाविरुद्धचा लढा अधिक सशक्त व्हावा याकरिता मान्यताप्राप्त कंपन्यांकडून तातडीने रॅपिड अ‍ॅण्टीबॉडी टेस्ट किट खरेदी करण्यात याव्यात, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला दिला आहे.

ठळक मुद्देलालफीतशाहीपासून दूर राहण्याची सूचना

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोना संक्रमणाविरुद्धचा लढा अधिक सशक्त व्हावा याकरिता मान्यताप्राप्त कंपन्यांकडून तातडीने रॅपिड अ‍ॅण्टीबॉडी टेस्ट किट खरेदी करण्यात याव्यात, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला दिला आहे. तसेच, या खरेदीला विलंब होऊ नये याकरिता सरकारने लालफीतशाहीपासून दूर राहावे, अशी सूचना केली आहे.केंद्र सरकारद्वारे न्यायालयाला देण्याता आलेल्या माहितीनुसार, इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्चने १३ कंपन्यांच्या रॅपिड अ‍ॅण्टी बॉडी टेस्ट किटना मान्यता प्रदान केली आहे. तसेच, किट खरेदीच्या धोरणात बदल करण्यात आला आहे. आता राज्य सरकारला किट खरेदी करण्यासाठी कौन्सिलवर अवलंबून राहण्याची गरज नाही. ते थेट मान्यताप्राप्त कंपन्यांकडून किट खरेदी करू शकतात. न्यायालयाने ही बाब लक्षात घेता हा आदेश दिला. कोरोनाच्या प्राथमिक चाचणीकरिता रॅपिड अ‍ॅण्टीबॉडी टेस्ट किट अत्यंत उपयोगी आहे. या किटचा अहवाल लवकर येतो. परिणामी, प्रशासनाला कोरोना संक्रमण रोखण्यासाठी तातडीने आवश्यक उपाययोजना करता येईल, असे मत न्यायालयाने हा आदेश देताना व्यक्त केले. प्रकरणावर न्यायमूर्ती रोहित देव यांच्यासमक्ष सुनावणी झाली. यासंदर्भात शिवराय कुलकर्णी यांची जनहित याचिका उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. पुढील सुनावणी २६ मे रोजी निश्चित करण्यात आली आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. पंकज नवलानी, राज्य सरकारतर्फे अ‍ॅड. सुमंत देवपुजारी, केंद्र सरकारतर्फे अ‍ॅड. उल्हास औरंगाबादकर तर, महानगरपालिकेतर्फे अ‍ॅड. जेमिनी कासट यांनी कामकाज पाहिले.

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय