शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

पंजाबमधील उद्योगधंदे चौपट, प्रतिमाही होत आहे मलिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:05 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर अडून बसलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाने पंजाबला जे वळण दिले ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर अडून बसलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाने पंजाबला जे वळण दिले आहे, त्यामुळे पंजाबची प्रतिमा मलिन होत आहे. पंजाब आणि नजीकच्या सीमावर्ती हरियाणाच्या काही जिल्ह्यांमध्ये तथाकथित शेतकरी मोबाईल टॉवर्स बंद करण्यात मश्गूल आहेत. पेट्रोल पंप आणि स्टोर्स उघडू दिले जात नाहीत. जाणकारांच्या मते, उद्योग विरोधी पोस्टर्सचा धुमाकूळ असलेल्या या आंदोलनाचा फटका केवळ मोबाईल कंपन्यांनाच बसत आहे असे नाही तर यामुळे उद्योगधंदेही डबघाईला आले आहेत. एसोचैमच्या आकलनानुसार शेतकरी आंदोलनाने उद्योगधंद्यांना दररोज ३५०० कोटी रुपयांचा फटका बसत आहे.

मोबाईल टॉवर बंद केल्याने ऑनलाईन व्यवसायाशी निगडित नागरिकांचे भविष्य अंधकारात गेले आहे. सोबतच विद्यार्थ्यांचे ऑनलाईन क्लासेसही बंद पडले आहेत. कोरोना महामारीच्या काळात वर्क फ्रॉम होमचा विचारही डब्बाबंद पडला आहे. विशेषज्ञांच्या मतानुसार, आंदोलनाची आग आता पंजाबच्या अंतर्गत भागातही पोहोचलेली आहे. लहान-मोठे व्यवसाय करणाऱ्या नागरिकांसोबतच पंजाबचा प्रसिद्ध होजियरी उद्योगही आंदोलनामुळे डबघाईला आला आहे. एवढेच नव्हे तर स्वत: शेतकऱ्यांनाही येणाऱ्या काही दिवसांत विद्युत संकटाचा सामना करावा लागणार आहे. मुख्यमंत्री कोणत्याही पक्षाचा का असेना, त्यांचे प्रयत्न पंजाबमध्ये गुंतवणूक आणण्याचे असतात. परंतु, दुर्दैवाने आंदोलनाच्या काळात सर्वच पक्षांचे नेते गप्प बसले आहेत. व्होट बँकेसाठी पंजाबमध्ये उद्योगधंदे आणि शेतकऱ्यांना एकमेकांच्या विरोधात उभे करणारे पंजाबचे नुकसान करणार असल्याचे मत पंजाबचे हितचिंतक व्यक्त करत आहेत. पंजाबमधील औद्योगिकीकरण नष्ट करून ते पंजाबसोबतच शेतकऱ्यांचेही नुकसानच करणार आहेत. बंगालमध्येही उद्योगधंद्यांना अशाच तऱ्हेने विरोध केला गेला आणि आज ते राज्य आर्थिक विवंचनेत राहिले आहे. ही बाब शेतकऱ्यांनी समजून घेणे गरजेचे आहे. त्यांचा उपयोग केवळ राजकीय शस्त्र म्हणून केला जात असल्याची भावनाही व्यक्त केली जात आहे.

शेतकऱ्यांचे सुरू असलेले हे आंदोलन पं. बंगालमधील सिंगुर जमीन विवादाचे स्मरण करून देत आहे. त्या आंदोलनाचे भोग संपूर्ण बंगालला भोगावे लागले होते आणि टाटाचा नॅनो प्लांट गुजरातमध्ये शिफ्ट करण्यात आला होता. त्याचा फटका सिंगुलमधील शेतकऱ्यांना बसला आणि आज ते अत्यंत बिकट परिस्थितीत जगत आहेत. विशेष म्हणजे, ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्री पदावर येताच टाटा कंपनीला बंगालमध्ये मोठे उद्योग आणण्यासाठी आमंत्रित केले होते. पंजाबने प. बंगालकडून शिकवण घेणे गरजेचे आहे.

.........