शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

पंजाबमधील उद्योगधंदे चौपट, प्रतिमाही होत आहे मलिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:05 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर अडून बसलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाने पंजाबला जे वळण दिले ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर अडून बसलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाने पंजाबला जे वळण दिले आहे, त्यामुळे पंजाबची प्रतिमा मलिन होत आहे. पंजाब आणि नजीकच्या सीमावर्ती हरियाणाच्या काही जिल्ह्यांमध्ये तथाकथित शेतकरी मोबाईल टॉवर्स बंद करण्यात मश्गूल आहेत. पेट्रोल पंप आणि स्टोर्स उघडू दिले जात नाहीत. जाणकारांच्या मते, उद्योग विरोधी पोस्टर्सचा धुमाकूळ असलेल्या या आंदोलनाचा फटका केवळ मोबाईल कंपन्यांनाच बसत आहे असे नाही तर यामुळे उद्योगधंदेही डबघाईला आले आहेत. एसोचैमच्या आकलनानुसार शेतकरी आंदोलनाने उद्योगधंद्यांना दररोज ३५०० कोटी रुपयांचा फटका बसत आहे.

मोबाईल टॉवर बंद केल्याने ऑनलाईन व्यवसायाशी निगडित नागरिकांचे भविष्य अंधकारात गेले आहे. सोबतच विद्यार्थ्यांचे ऑनलाईन क्लासेसही बंद पडले आहेत. कोरोना महामारीच्या काळात वर्क फ्रॉम होमचा विचारही डब्बाबंद पडला आहे. विशेषज्ञांच्या मतानुसार, आंदोलनाची आग आता पंजाबच्या अंतर्गत भागातही पोहोचलेली आहे. लहान-मोठे व्यवसाय करणाऱ्या नागरिकांसोबतच पंजाबचा प्रसिद्ध होजियरी उद्योगही आंदोलनामुळे डबघाईला आला आहे. एवढेच नव्हे तर स्वत: शेतकऱ्यांनाही येणाऱ्या काही दिवसांत विद्युत संकटाचा सामना करावा लागणार आहे. मुख्यमंत्री कोणत्याही पक्षाचा का असेना, त्यांचे प्रयत्न पंजाबमध्ये गुंतवणूक आणण्याचे असतात. परंतु, दुर्दैवाने आंदोलनाच्या काळात सर्वच पक्षांचे नेते गप्प बसले आहेत. व्होट बँकेसाठी पंजाबमध्ये उद्योगधंदे आणि शेतकऱ्यांना एकमेकांच्या विरोधात उभे करणारे पंजाबचे नुकसान करणार असल्याचे मत पंजाबचे हितचिंतक व्यक्त करत आहेत. पंजाबमधील औद्योगिकीकरण नष्ट करून ते पंजाबसोबतच शेतकऱ्यांचेही नुकसानच करणार आहेत. बंगालमध्येही उद्योगधंद्यांना अशाच तऱ्हेने विरोध केला गेला आणि आज ते राज्य आर्थिक विवंचनेत राहिले आहे. ही बाब शेतकऱ्यांनी समजून घेणे गरजेचे आहे. त्यांचा उपयोग केवळ राजकीय शस्त्र म्हणून केला जात असल्याची भावनाही व्यक्त केली जात आहे.

शेतकऱ्यांचे सुरू असलेले हे आंदोलन पं. बंगालमधील सिंगुर जमीन विवादाचे स्मरण करून देत आहे. त्या आंदोलनाचे भोग संपूर्ण बंगालला भोगावे लागले होते आणि टाटाचा नॅनो प्लांट गुजरातमध्ये शिफ्ट करण्यात आला होता. त्याचा फटका सिंगुलमधील शेतकऱ्यांना बसला आणि आज ते अत्यंत बिकट परिस्थितीत जगत आहेत. विशेष म्हणजे, ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्री पदावर येताच टाटा कंपनीला बंगालमध्ये मोठे उद्योग आणण्यासाठी आमंत्रित केले होते. पंजाबने प. बंगालकडून शिकवण घेणे गरजेचे आहे.

.........