शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

ग्रामीण भागातील बसफेऱ्या बंद, विद्यार्थ्यांनी शाळेत जावे तरी कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:13 IST

ब्रिजेश तिवारी काटोल : कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना काटोल-नरखेड तालुक्यातील वर्ग ८ ते १२ पर्यंतच्या शाळा सुरू झाल्या. ...

ब्रिजेश तिवारी

काटोल : कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना काटोल-नरखेड तालुक्यातील वर्ग ८ ते १२ पर्यंतच्या शाळा सुरू झाल्या. मात्र, काटोल एसटी आगारातील ग्रामीण भागातील बसफेऱ्या सुरू झाल्या नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शाळेत जावे तरी कसे, असा बिकट प्रश्न आहे. डिझेलअभावी अनेक बसफेऱ्या रद्द होत असल्याने अवैध प्रवासी वाहतुकीला प्रोत्साहन मिळत आहे. त्यामुळे सामान्य प्रवाशी एसटीपासून दूर जात आहेत.

काटोल एसटी आगारातर्फे काटोल-नरखेड तालुक्यात दररोज ८७ शेड्यूल आहे; पण कोरोनाच्या संकटानंतर केवळ ४२ शेड्यूल सुरू आहेत. काटोल-नरखेड तालुक्यातील ग्रामीण भागातील बसफेऱ्या अद्यापही सुरू करण्यात आल्या नाहीत, तसेच एसटीच्या नागपूर विभागात गेल्या तीन महिन्यांपासून डिझेल संकट सुरू आहे. काटोल आगारात गत तीन महिन्यांपासून डिझेल येत नसल्याने गाड्यांना डिझेल भरण्यासाठी नागपूरला जावे लागते. म्हणजे काटोल-कोंढाळी फेरीकरिता काटोलवरून बस नागपूरला जाते. डिझेल मिळाले तर परत काटोलला येते, नंतर ती कोंढाळीला जाते. डिझेलअभावी दररोज काटोल आगाराच्या जवळपास २५ बसफेऱ्या रद्द होत आहेत. एक तर बसफेऱ्या कमी. त्यातही डिझेलअभावी बसफेरी रद्द होत असल्याने काटोल, नरखेड, सावनेर आदी मार्गांवर तासन्‌तास बस उपलब्ध नसल्याने अवैध प्रवासी वाहतुकीला प्रोत्साहन मिळाले आहे. असेच चित्र जिल्ह्यातील इतर आगाराचे आहे. नागपूर विभागांतर्गत काटोल, रामटेक, उमरेड, सावनेर व नागपूर शहरातील घाट रोड, गणेशपेठ, इमामवाडा, वर्धमाननगर, असे एकूण आठ आगार मोडतात; पण सर्व एसटी आगारांना केवळ गणेशपेठ व घाटरोड आगारातूनच डिझेल मिळत आहे.

काटोल- नरखेड तालुक्यातील वर्ग ८ ते १२ पर्यंत शाळा सुरू झाल्या असल्या तरी काटोल आगारातर्फे ग्रामीण भागातील बसफेऱ्या डिझेलअभावी अद्यापही सुरू करण्यात आल्या नाहीत.

-सुधीर पवार, वाहतूक निरीक्षक, काटोल आगार

एसटी पासचा उपयोग काय?

काटोल एसटी आगारांतर्गत काटोल, कोंढाळी, नरखेड, सावरगाव व मोवाड ही पाच बसस्थानके येतात. या पाचही बसस्थानकांवरून जवळपास ३ हजार विद्यार्थ्यांना एसटी सवलत पास व मुलींना अहिल्याबाई होळकर योजनेंतर्गत मोफत पास देण्यात येते. त्यामुळे ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थी शिक्षणाकरिता काटोल, कोंढाळी, जलालखेडा, नरखेड, मोवाड येथे येतात; पण ग्रामीण भागातील बसफेऱ्या बंद असल्याने या विद्यार्थ्यांनी शिक्षणाकरिता यावे तरी कसे, असा बिकट प्रश्न आहे.

काटोलनजीकच्या कचारी सावंगा येथील विमल मोरे या काटोलच्या लता मंगेशकर ग्रामीण हॉस्पिटलमध्ये उपचाराला आल्या होत्या. काटोल बसस्थानकावर दुपारी १ वाजता आल्या; पण डिझेलअभावी एसटी बस नसल्याने चार तासांपासून बसस्थानकावरच ताटकळत थांबल्या आहेत. विमल मोरे एकट्याच नव्हेत, तर कचारी सावंगा येथील 20 ते 25 प्रवासी असूनही डिझेलअभावी बससेवा नाही.

फोटो....विमल मोरे कचारी सावंगा