शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

साध्वी प्रज्ञा ठाकूर यांच्या पुतळ्याचे दहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 12:02 IST

भारतीय जनता पक्षाच्या नेत्या प्रज्ञा ठाकूर यांनी शहीद हेमंत करकरे यांच्यावर निराधार आरोप लावून त्यांचा अपमान केल्यामुळे खळबळ उडाली आहे. नागपूर शहरात जय जवान जय किसान संघटना, असंघटित कामगार कॉंग्रेसने त्यांच्या पुतळ्याचे दहन केले.

ठळक मुद्देजय जवान जय किसान संघटना व असंघटित कामगार काँग्रेसतर्फे वक्तव्याचा निषेध

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतीय जनता पक्षाच्या नेत्या प्रज्ञा ठाकूर यांनी लोकसभेच्या निवडणुकीत प्रचारादरम्यान शहीद हेमंत करकरे यांच्यावर निराधार आरोप लावून त्यांचा अपमान केल्यामुळे खळबळ उडाली आहे. त्याचे पडसाद नागपूर शहरात उमटत असून जय जवान जय किसान संघटना,असंघटित कामगार कॉंग्रेसने त्यांच्या पुतळ्याचे दहन केले.लक्ष्मीभुवन चौकात जय जवान जय किसान संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी साध्वीच्या विरोधात घोषणा दिल्या. भाजपा नेते राष्ट्रप्रेम, देशभक्तीच्या गोष्टी करतात. परंतु, देशाचे रक्षण करणारे पोलीस आणि जवानांबद्दल त्यांच्या मनात आदर नाही. शहिदाबाबत वक्तव्य करणारी व्यक्ती साध्वी राहूच शकत नसल्याचे सांगून शहिदांच्या अपमानाबद्दल पंतप्रधानांनी देशाची माफी मागावी आणि निवडणूक आयोगाने त्यांची उमेदवारी रद्द करावी. सोमवारपर्यंत भाजपाने निर्णय न घेतल्यास संघ मुख्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा पवार यांनी दिला. यावेळी अरुण वनकर, मिलिंद महादेवकर, शेखर शिरभाते, रवींद्र इटकेलवार, राजेंद्र भोयर, शरद शाहु, आकाश थेटे, नरेंद्र सारवे, प्रकाश मेश्राम, नीलेश कोल्हे उपस्थित होते. दरम्यान, असंघटित कामगार कॉंग्रेसचे अध्यक्ष युगल विदावत यांनी मतांचे राजकारण करण्यासाठी भाजप शहिदांचा वापर करीत असल्याचे सांगून शहीद, सैनिक आणि पोलिसांवरील आरोप कॉंग्रेस सहन करणार नसल्याचे सांगितले. कोणतेही पुरावे नसताना शहिदांवर आरोप करून त्यांच्याकडे बोट दाखविणाऱ्यांचा त्यांनी यावेळी निषेध केला. साध्वी प्रज्ञा ठाकूर यांच्या पुतळ्याचे दहन करून कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी आपला निषेध व्यक्त केला. यावेळी दुर्गा लाहोरी, धीरज पांडे, रिजवान रुमवी, गुड्डु नेताम, विमलेश, सचिन, अबरार पटेल उपस्थित होते.

साध्वींना मत मांडण्याचा अधिकार : मा. गो. वैद्यमालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात तुरुंगात असताना आलेल्या अनुभवांवरून साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी दिलेली प्रतिक्रिया हा त्यांचा मत मांडण्याचा अधिकार आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी अखिल भारतीय प्रचार प्रमुख मा. गो. वैद्य यांनी म्हटले आहे. आरोप असलेले अनेकजण निवडणुकीच्या रिंगणात उतरतात. त्यामुळे साध्वी यांच्या उमेदवारीत काहीच आक्षेपार्ह नाही. त्यांच्या विधानामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असल्यास त्यांनी साध्वी विरुद्ध न्यायालयात खटला दाखल करावा, असे वैद्य यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Sadhvi Pragya Singh Thakurसाध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर