शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

किशोरदांच्या स्वरांनी सजलेले बर्मन्स संगीत

By admin | Updated: October 17, 2014 01:04 IST

मेलोडियस वाद्यांच्या संगीतात गीताचा शब्द त्याच्या आशयासह पोहोचविणारे संगीतकार एस. डी. बर्मन आणि पाश्चिमात्य संगीताचा प्रभाव असणारे पण भारतीय संगीताचे फ्युजन

आदित्य-अनघाचे आयोजन : सूरसंगम संस्थेचे सुरेल सादरीकरण नागपूर : मेलोडियस वाद्यांच्या संगीतात गीताचा शब्द त्याच्या आशयासह पोहोचविणारे संगीतकार एस. डी. बर्मन आणि पाश्चिमात्य संगीताचा प्रभाव असणारे पण भारतीय संगीताचे फ्युजन चपखलपणे गीतातून पकडत रसिकांची लय नेमकेपणाने सांभाळणारे संगीतकार आर. डी. बर्मन म्हणजे भारतीय चित्रपट संगीताचे बादशहाच. या पितापुत्रांनी अवीट माधुर्याच्या संगीताने गीते अजरामर करून ठेवलीत. पिढ्या बदलल्या, संगीताचे प्रवाहही बदलत गेले पण गीतांचा अर्थ, आशय, भावना संगीतातून व्यक्त करताना थेट रसिकांच्या भावनांना हात घालणाऱ्या या संगीतकारांच्या गीतांवर कायमच रसिकांनी प्रेम केले. बर्मन्सची गीते ऐकणे हा रसिकांसाठी आनंददायी अनुभव असतो. हाच अनुभव आज रसिकांनी डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात घेतला. आदित्य-अनघा मल्टीस्टेट क्रेडिट को-आॅपरेटिव्ह सोसायटीच्यावतीने ‘बर्मन्स किशोरदा विथ सागर’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची संकल्पना अनघा सराफ आणि विशाल गुरव यांची होती. यापूर्वीही आदित्य-अनघाने एस. डी आणि आर. डी या संकल्पनेवर केलेला कार्यक्रम गाजला होता. तर आज बर्मन्स आणि किशोरदा असे समीकरण सादर करण्यात आले. सूरसंगमचे तयारीचे वादक आणि विदर्भाचा किशोरकुमार सागर मधुमटके तसेच सुप्रसिद्ध गायिका सुरभी ढोमणे यांच्या गायनाने हा कार्यक्रम बर्मन्सच्या संगीताचा पुन:प्रत्यय देणारा ठरला. सागरने ‘फुलों के रंग से दिल की कलम से..’ या गीताने प्रारंभ केला आणि जवळपास प्रत्येक गीताला दाद देत रसिकांनी या कार्यक्रमाचा आनंद घेतला. दोन्ही गायकांचे हसत - खेळत झालेले सादरीकरण आणि श्वेता शेलगावकर यांचे बर्मन्स आणि किशोरदा यांच्या नात्यावर भाष्य करणारे निवेदन यामुळे कार्यक्रमाची रंगत उत्तरोत्तर वाढत गेली. अनेक दर्दी रसिक यावेळी वन्समोअरची मागणी करीत होते. याप्रसंगी ‘गुम है किसी के प्यार मे..., ख्वाब हो तुम या.., कहना है..., माना जनाब ने पुकारा नही.., रुक जाना ओ जाना जरा दो बाते.., आँखो मे क्या जी.., सागर जैसी आँखो वाली.., हाल कैसा हे जनाब का.., फिर वही रात है.., अरे यार मेरी..., हवा के साथ साथ, रुप तेरा मस्ताना, खुल्लम खुल्ला प्यार करेंगे.., खिलते है गुल यहां.., ये जवानी है दिवानी, छोड दो आंचल जमाना क्या कहेगा.., हमे तुमसे प्यार कितना...’आदी गीते याप्रसंगी सागर आणि सुरभीने सादर केली. एस. डी. आणि आर. डी. यांचे संगीत त्यात किशोरदांसारखा हरहुन्नरी गायक आणि बर्मन्स आणि किशोरदांच्या जुळलेल्या समीकरणांची ही गीते दाद द्यायला भाग पाडणारी होती. मानवी जीवनातल्या प्रत्येक भावनेला हात घालणाऱ्या या गीतांनी उपस्थितांच्या आठवणींना उजाळा दिला. याप्रसंगी ‘ये मैने कसम ली, कांची रे कांची रे, कोरा कागज था ये मन मेरा, वादा करो नही छोडेंगे..., तेरे मेरे मिलन की ये बेला, आप की आँखो मे..., ये लाल रंग कब मुझे..., नदियां से दरिया...’ आदी गीतांनी रंगत आणली. कार्यक्रमाचे संगीत संयोजन सचिन ढोमणे यांचे होते. गायकांना कीबोर्डवर महेंद्र ढोले, मायनर विक्रम जोशी, आॅक्टोपॅड नंदू गोहाणे, व्हायोलीन अमर शेंडे, बासरी अरविंद उपाध्ये, गिटार प्रसन्न वानखेडे, संजय गाडे आणि ढोलकीवर पंकज यादव यांनी सुरेल साथ केली. रंगमंच सजावट सुनील हमदापुरे, प्रकाशयोजना शिवशंकर माळोदे आणि ध्वनी स्वप्नील उके यांचे होते. कार्यक्रमाचे संयोजन, समन्वयन मो. सलीम यांनी केले. (प्रतिनिधी)