शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
7
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
8
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
9
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
10
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
11
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
12
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
13
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
14
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
15
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
16
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
17
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
18
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

आर्थिक टंचाईत शिक्षकांच्या वेतनाचा भार

By admin | Updated: September 9, 2015 03:14 IST

एलबीटीमुळे महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट आहे. विकास कामासाठी निधी नसतानाच प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे शिक्षकांना वेतन..

शालार्थ प्रणालीला मनपाची ना : नऊ कोटी परत जाण्याची शक्यतानागपूर : एलबीटीमुळे महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट आहे. विकास कामासाठी निधी नसतानाच प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे शिक्षकांना वेतन देण्यासाठी शालार्थ प्रणाली अमलात न आणल्याने शिक्षकांना मनपाच्या तिजोरीतून वेतन दिले जात आहे. दुसरीकडे मागील सहा महिन्यांच्या शिक्षकांच्या वेतनासाठी मंजूर नऊ कोटी अखर्चित असल्याने शिक्षण विभागाकडे परत जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.मनपाच्या १७ माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळातील २५० शिक्षकांचे वेतन शालार्थ प्रणालीद्वारे देण्यात यावे. यासाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सचिव प्रमोद रेवतकर व मनपा शिक्षक संघाचे अध्यक्ष राजेश गवरे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने मंगळवारी अपर आयुक्त नयना गुंडे यांना निवेदन दिले. शालार्थ प्रणाली अमलात आणल्यास मनपाला दर महिन्याला शिक्षकांच्या वेतनावर १ कोटी ८० लाखाचा खर्च करावा लागणार नसल्याचे निदर्शनास आणले. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शालार्थ प्रणालीद्वारे वेतन देण्याचे शासन निर्देश आहे. परंतु मनापाचे शिक्षणाधिकारी यांच्या मनमानी कारभारामुळे याबाबतची फाईल शिक्षण विभागाकडे पाठविण्यात आलेली नाही. त्यामुळे या प्रणालीचा लाभ शिक्षकांना मिळत नाही. ही प्रणाली अमलात आणल्यास वेतन थेट शिक्षकांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. या प्रणालीद्वारे वेतन दिले जात असेल तरच सरकारकडून वेतनासाठी निधी उपलब्ध होणार आहे. परंतु शिक्षणाधिकारी अशोक टालाटुले याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप गवरे व रेवतकर यांनी केला. शिष्टमंडळात अविनाश बढे, तेजराव राजूरकर, मधुकर भोयर, राकेश दुमपलवार, मधुकर भोयर व दशरथ मानकर आदींचा समावेश होता.(प्रतिनिधी)