शहरं
Join us  
Trending Stories
1
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
2
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
3
धक्कादायक! राजस्थानमधील झालावाड शाळेतील दुर्घटनेनंतर आणखी एक निष्काळजीपणा, विद्यार्थ्याचे टायर पेटवून अंत्यसंस्कार
4
हृदयद्रावक! "माझी दोन्ही मुलं गेली, देवाने मला...", आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
5
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
6
गृहकर्जावरील व्याज अनुदान; सविस्तर जाणून घ्या, मोदी सरकारची ही खास योजना; पूर्ण होईल घर घेण्याचं स्वप्न!
7
पहिला श्रावणी रविवार: वैभवप्राप्तीसाठी आदित्य राणूबाई व्रत; वाचा व्रतविधी आणि द्या खिरीचा नैवेद्य!
8
NSE, SBI आणि IDBI साठी NSDL चा आयपीओ बनला मल्टीबॅगर मनी मशीन; ३९९९०% पर्यंत रिटर्न  
9
Shravan Somvar 2025: महादेवाला वाहिलेले बेलाचे पान टाकू नका, तेच करेल धनवृद्धी!
10
वर्षभर मसल पॉवर रसेलची बॅट सोबत बाळगली; तो निवृत्त झाल्यावर ती टीम डेविडच्या हाती तळपली
11
ओठ फुटलेत, कोरडे झालेत... ओठांना मॉइश्चरायझ करण्यासाठी लिप बाम की ऑइल काय आहे बेस्ट?
12
"मला दु:ख आहे की मी अशा सरकारला पाठिंबा देतोय जे..."; चिराग पासवान यांची संतप्त प्रतिक्रिया
13
१७ वर्ष जुनी कंपनी आणतेय IPO, SEBI कडे केला अर्ज; BSE आणि NSE मध्ये लिस्टिंगची शक्यता
14
Period Pain : ‘तिच्या’ आयुष्यातील ‘ते’ चार दिवस; कोवळ्या कळ्यांना पाळीचा अर्थ समजावताना कुठे कमी पडतोय आपण?
15
चीन नंबर १ आणि भारत दुसऱ्या क्रमांकावर, ही कोणती यादी ज्यात अमेरिका-इंडो​नेशिया आणि तुर्कीही राहिले मागे
16
भारत-यूके मुक्त व्यापार कराराने लक्झरी कारच्या किंमती दणक्यात कमी होणार; या वाहनांना मोठा फायदा मिळणार; तुमचा विश्वास बसणार नाही!
17
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
18
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
19
माता न तू वैरिणी! बिर्याणीवाल्याच्या प्रेमात वेडी झाली टिकटॉक स्टार, पोटच्या लेकरांना संपवलं अन्...
20
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड

जिल्ह्यात हरभऱ्याची बंपर पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 04:17 IST

नागपूर : यावर्षी ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र हा पूर रबी ...

नागपूर : यावर्षी ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र हा पूर रबी पिकासाठी लाभदायक ठरत आहे. अतिवृष्टीमुळे जमिनीत ओलावा निर्माण झाल्याने रबीची लागवड वाढली आहे. रबीच्या ६० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. त्यातही शेतकरी गव्हापेक्षा हरभरा लागवडीला प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे.

कृषी विभागाच्या माहितीनुसार गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यात पाऊस सरासरी गाठत आहे. त्याचा थेट परिणाम गतवर्षीही रबी पेरणीवर झाला होता. यंदाही पावसाने जिल्ह्यात जवळपास सरासरी पार केली आहे. सोबतच अतिवृष्टी व त्यामुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे जमिनीत ओलावा कायम आहे. त्याचा फायदा रबी पिकांना होणार असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. जिल्ह्यात रबी हंगामामध्ये गहू, हरभरा, रबी ज्वारी, मका, मिरची, भाजीपाला आदी प्रमुख पिके घेतली जातात. रबीचे जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्र हे १ लाख ७३ हजार ५४७ हेक्टर इतके आहे. गतवर्षी जिल्ह्यात रबीमध्ये कृषी विभागाचे १.५५ लाख नियोजित क्षेत्र होते. त्यापैकी १ लाख ५८ हजारावर प्रत्यक्ष पेरणी झाली होती. यंदा कृषी विभागाने रबीसाठी सर्वसाधारण क्षेत्रापेक्षा ३ हजार ६५३ हेक्टर अधिकचे म्हणजेच १ लाख ७७ हजार २०० हेक्टरचे एकूण नियोजन केले आहे. यंदा रबी हंगामामध्ये गव्हाचे ८५ हजार हेक्टर क्षेत्र आहे. हरभऱ्याचे ८६ हजार हेक्टरवर लागवड क्षेत्र राहणार असून, त्याखालोखाल रबी ज्वारी, मका आदींचा समावेश आहे.

गत दोन वर्षांपासून जिल्ह्यात चांगला पाऊस होत असल्याने, रबीसाठी तो लाभदायक ठरत असल्याचे दिसून येत आहे. यंदा पाऊस चांगला बरसल्याने पिण्याच्या पाण्यासोबतच सिंचनाचाही प्रश्न जवळपास मिटला आहे. त्यामुळे रबीमध्ये पाणी जास्त लागणाऱ्या गहू व हरभऱ्याची पेरणी वाढून उत्पन्न वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यादृष्टीने शेतकरी हरभऱ्याची मोठ्या प्रमाणात लागवडही करीत आहेत. आजघडीला जिल्ह्यात हरभऱ्याची नियोजित क्षेत्राच्या ९० टक्क्यापर्यंत तर गव्हाची २७ टक्क्यावर व ज्वारीची १५ टक्क्यावर पेरणी आटोपलीही आहे.

वाढले रबीचे क्षेत्र

यंदा जिल्ह्यात खरीपामध्ये कपाशीच्या तुलनेत सोयाबीनचा पेरा अधिक होता. म्हणजेच नियोजित क्षेत्रापेक्षा २० हजार हेक्टरवर सोयाबीनची लागवड झाली, तर मक्याचीही मोठ्या प्रमाणात पेरणी झाली. मका व सोयाबीन हे कमी कालावधीचे पीक आहे. त्यामुळे खरीपानंतर त्याच जमिनीवर रबीचाही पेरा घेणे शक्य होत असते, यामुळेही जिल्ह्यात रबीचे पेरणी क्षेत्र वाढण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

अशी झाली पेरणी

पीक क्षेत्र (हेक्टर)

गहू२६१४३

हरभरा६३९९०

ज्वारी१८५

मका १४५

जवस २७

सूर्यफूल१०००

मोहरी३००

भाजीपाला ३८३९