शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

बैलबाजार भरला पण ग्राहकच दिसेना?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:09 IST

शरद मिरे भिवापूर : कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, आठवडी बाजार बंद ठेवण्यात आले आहेत. असे असले तरी ...

शरद मिरे

भिवापूर : कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, आठवडी बाजार बंद ठेवण्यात आले आहेत. असे असले तरी शेतीपयोगी महत्त्वाची बाब म्हणून बैलबाजार भरविण्यास मुभा आहे. त्यानुसार शुक्रवारी तालुकास्थळी भरलेल्या बैलबाजारात विक्रीसाठी मोठ्या संख्येत बैल दाखल झाले होते. मात्र खरेदीसाठी ग्राहकच नसल्याचे आढळले.

बैल हा शेतकऱ्यांचा मित्र आहे. शेतात पेरणीपासून तर उगवणीपर्यंत आणि शेतमाल हातात आल्यानंतर मार्केटमध्ये पोहचविण्यापर्यंतची सर्व कामे यापूर्वी बैलबंडीने व्हायची. मात्र गत काही वर्षांपासून शेतीपयोगी साहित्यात विज्ञान व तंत्रज्ञानाने भर घातली. शेतातील बहुतांश सर्वच कामे यंत्राने होऊ लागली. बैलबंडीची जागा ट्रॅक्टरने घेतली. त्यामुळे वखरणी, डवरणी, पेरणीसह आदी कामे वेळेत पूर्ण होऊ लागली. सद्यस्थितीत बैल आणि बंडी शेतकऱ्यांच्या शेतात दिसणे दुरापास्त झाले आहे. याचाच परिणाम थेट बैलबाजारावर पडला आहे. दर शुक्रवारी तालुक्याचा आठवडी बाजार असतो. याच दिवशी कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत शेतकऱ्यासाठी बैलबाजार भरविल्या जातो. शुक्रवारी भरलेल्या बैलबाजारात अंदाजे २०० वर बैलजोड्या विक्रीसाठी दाखल झाल्या होत्या. मात्र त्यातुलनेत खरेदीदार ग्राहकांची संख्या बोटावर मोजण्याइतपतच होती. भिवापूरचा बैलबाजार सर्वत्र प्रसिद्ध असून नागपूरसह भंडारा, चंद्रपूर, वर्धा येथील शेतकरी मोठ्या संख्येत बैल खरेदी व विक्रीसाठी येथे येतात. मात्र गत काही दिवसापासून या बाजारात विक्रीसाठी येणाऱ्या बैलांची संख्या मोठी असली तरी, त्यातुलनेत खरेदीदार शेतकऱ्यांची संख्या मंदावली आहे.

केवळ दुभती जनावरे अंगणात

ट्रॅक्टरमुळे बैलबंडीचे महत्त्व कमी झाले. त्यामुळे शेतकरी बैल खरेदी करताना दिसत नाही. असले तरी दुभती जनावरे मात्र शेतकऱ्यांच्या अंगणात दिसतात. असमानी संकटाच्या चक्रव्यूहात शेतातील उभे पीक कधी आडवे होईल, याचा नेम नाही. अशा परिस्थितीत दुभती जनावरे शेतकऱ्यांचा खरा आधार ठरत आहे. गाय, शेळी, म्हैस यांच्या पालनपोषणाला शेतकरी प्राधान्य देत आहेत. यातून जन्माला आलेल्या जनावरांच्या विक्रीतूनही शेतकऱ्यांना मदत होते.