शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रीडा मंत्री माणिकराव कोकटे यांना कुठल्याही क्षणी अटक होणार?; जिल्हा कोर्टाने सुनावला निकाल
2
IPL 2026 Auction : कॅमरुन ग्रीनसह BCCI ही मालामाल! ऑस्ट्रेलिन खेळाडूवर लागली रेकॉर्ड ब्रेकिंग बोली
3
"ज्यांनी तुम्हाला हिंदुत्व शिकवलं त्या बाळासाहेबांच्या कुटुंबाला..."; बाळा नांदगावकरांचा टोला
4
"मुंबईचे मारेकरी कोण? राजकीय स्वार्थासाठी मराठी माणसाला वापरले"; भाजपाचा ठाकरेंना टोला
5
निर्मला सीतारामन यांचं एक वक्तव्य आणि 'या' शेअर्सना लागले पंख; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
6
राज ठाकरेंच्या भेटीबाबत अनिल परबांनी सगळे सांगितले; म्हणाले, “युती, जागावाटप अन्...”
7
"एक मुस्लीम महिला म्हणून…!"; हिजाब ओढल्यावरून 'दंगल गर्ल' जायरा नीतीश कुमारांवर भडकली!
8
Chandrapur Farmer : किडनी वीक पण कर्ज फेड ! सावकाराच्या सांगण्यावरून शेतकऱ्याने ८ लाखांना विकली किडनी; कंबोडियात जाऊन केले ऑपेरेशन
9
निवडणुका जाहीर होताच उद्धवसेनेला धक्का; माजी नगरसेवकांचा जय महाराष्ट्र, शिंदे गटात प्रवेश
10
धक्कादायक! ७ वर्षांच्या मुलीचा तिसऱ्या मजल्यावरून पडून संशयास्पद मृत्यू, आईनेच खाली फेकल्याचा संशय  
11
“२०२९ मध्ये भाजपा विरुद्ध सर्व पक्ष असे चित्र दिसेल, राक्षसी महत्त्वाकांक्षा...”: रोहित पवार
12
IPL 2026 Auction : लिलावासाठी काव्या मारन नटली; सोशल मीडियावर तिच्या स्टायलिश Look ची चर्चा रंगली
13
Marriage: लग्नात आधी वधू वरमाला का घालते? त्यामागे काय आहे धार्मिक आणि सामाजिक कारण 
14
कष्टाचं फळ! आईसोबत शेतात केली मजुरी; ८ वेळा अपयश पण खचला नाही, झाला मोठा अधिकारी
15
विराट आणि अनुष्का पुन्हा एकदा पोहचले वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे घेतले आशीर्वाद
16
"अरे मर्दा, मागे तर बघ, आम्ही बिहारहून आलोय!" Vaibhav Suryavanshi याचा 'तो' व्हिडीओ व्हायरल
17
८ दिवसांत १८० टक्क्यांची तेजी; सातत्यानं 'या' शेअरला लागतंय अपर सर्किट, केडियांचीही आहे गुंतवणूक
18
पश्चिम बंगालमध्ये ५८ लाख मतदारांची नावे वगळली, निवडणूक आयोगाने नवी यादी केली प्रसिद्ध
19
PAN-Aadhaar लिंक करण्याची अखेरची तारीख जवळ; विसरलात तर लागेल इतका दंड, पाहा स्टेप बाय स्टेप प्रोसिजर
20
IPL 2026 Auction: अखेरच्या क्षणी BCCI कडून यादीत बदल! टीम इंडियातून डावललेला खेळाडूही लिलावात दिसणार
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धी महामार्गाची ओळख जागतिकस्तरावर निर्माण करा

By admin | Updated: July 10, 2017 01:48 IST

राज्याच्या विकासाला नवी दिशा देणाऱ्या महत्त्वाकांक्षी नागपूर- मुंबई या समृद्धी महामार्गामुळे केवळ वेळेची बचत होणार नसून राज्यातील २४ जिल्ह्यांना त्याचा लाभ होणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : आंतरराष्ट्रीय पूल व बोगदे बांधकाम परिषदलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्याच्या विकासाला नवी दिशा देणाऱ्या महत्त्वाकांक्षी नागपूर- मुंबई या समृद्धी महामार्गामुळे केवळ वेळेची बचत होणार नसून राज्यातील २४ जिल्ह्यांना त्याचा लाभ होणार आहे. समृद्धी महामार्ग व कॉरिडोर तयार करण्यासाठी नाविन्यपूर्ण तसेच सर्वोत्कृष्ट निर्मितीसाठी अभियांत्रिकी रचनाकारांनी संकल्पना तयार करून सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.आंतरराष्ट्रीय पूल व बोगदे परिषदेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.पूल व बोगद्यांच्या निर्मितीसाठी सर्वोत्कृष्ट रचना आणि आकर्षकता संदर्भातील आंतरराष्ट्रीय अभियंता परिषदेचे आयोजन केंद्रीय महामार्ग निर्मिती विभाग, राज्याचा सार्वजनिक बांधकाम विभाग व भारतीय राष्ट्रीय पूल व अभियांत्रिकी स्थापत्य अभियंत्यांच्या संघटनांमार्फत करण्यात आले आहे.यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, संयोजक संघटनेचे अध्यक्ष तथा एनएचएआयचे सदस्य डी. ओ. तावडे, आय. के. पांड्या, तांत्रिक समितीचे अध्यक्ष ए. के. बॅनर्जी, डॉ. वर्षा सुब्बाराव, आर. के. पांडे तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव अजित सगणे व्यासपीठावर उपस्थित होते.आंतरराष्ट्रीय पूल व बोगदे बांधकाम परिषदेला जागतिक स्तरावरील तज्ज्ञ तसेच राज्याच्या विविध भागातून सुमारे ४५० प्रतिनिधी उपस्थित आहेत.राज्याच्या महत्त्वाकांक्षी समृद्धी महामार्गामुळे नागपूरहून मुंबईत केवळ आठ ते दहा तासात पोहोचणे शक्य होणार असून, हा प्रकल्प कृषी व उद्योग व विकासासाठी समृद्धी कॉरिडोर म्हणून विकसित करण्यात येत असल्याचे सांगताना मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यातील २४ जिल्ह्यांतून जाणारा हा महामार्ग कृषी समृद्धीचा महामार्ग ठरणार आहे. या महामार्गावरून गॅस, पेट्रोल, पेट्रोकेमिकल आदी पाईपलाईन राहणार आहेत तसेच विमान उतरण्याचीसुद्धा सुविधा असणाऱ्या या राज्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे डिझाईन हे जागतिकस्तराचे असावे यासाठी सर्व अभियांत्रिकी वास्तुविशारदांनी पुढाकार घेऊन जगातील अत्यंत सुंदर असे डिझाईन तयार करण्यात सहकार्य करावे, असे आवाहन केले.आंतरराष्ट्रीय पूल व बोगदे बांधकाम हा परिसंवाद नव्या भारताच्या निर्मितीला पुढे नेणारा असल्याचे सांगताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आधुनिक तंत्रज्ञानाने काश्मीरला जोडणारा बोगदा तसेच ब्रह्मपुत्रेवरील सर्वात मोठा सेतू ही नवी भारताची ओळख पंतप्रधान नरेंद्र मोदी व भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या अद्वितीय कार्यामुळे झाली आहे. एनएचएआयचे सदस्य व एआयबीएसईचे अध्यक्ष डी. ओ. तावडे यांनी स्वागत करून प्रास्ताविकात आंतरराष्ट्रीय पूल व बोगदे बांधकाम परिषदेच्या आयोजनाबाबत सांगताना बांधकामाच्या क्षेत्रातील नाविन्यपूर्ण संशोधन तसेच नवनिर्मितीमध्ये गुणवत्ता, दर्जा व सौंदर्य यावर विशेष भर देऊन महामार्गाची निर्मिती करताना जगातील पर्यटकांना आकर्षित करणारे पूल व बोगदे तयार करण्यासाठी या परिषदेत विचारमंथन होत असल्याचे सांगितले.संघटनेचे प्रमुख आय. के. पांडे यांनी आभार मानले. यावेळी महापौर नंदाताई जिचकार, युरोपसह विविध देशातील अभियांत्रिकी क्षेत्रातील तज्ज्ञ उपस्थित होते.सी-लिंकमुळे आज मुंबई व राज्याची ओळख बांधकामाच्या निर्मितीमध्ये आकर्षकता असेल तर ती राज्याची ओळख ठरते. पूर्वी गेट वे आॅफ इंडिया ही मुंबई व राज्याची ओळख होती; आता वरळी-वांद्रे सी-लिंक ही राज्याची व मुंबईची ओळख झाली आहे. मुंबई येथील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी वरळी-वांद्रे सी-लिंकसोबत वांद्रे ते वर्सोवा नवीन सी-लिंक तयार करण्यात येणार आहे. नरिमन पॉर्इंट ते वरळी समुद्री मार्ग, ट्रान्स हार्बर सी-लिंकचे बांधकाम करताना सुरक्षा, सुंदरता व टिकाऊपणा याला प्राधान्य असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. नितीन गडकरी यांचा गौरव देशातील रस्ते विकासासोबतच पूल व बोगद्यांच्या कामाला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नवी दिशा दिली असून, या क्षेत्रातील त्यांच्या कामाचा गौरव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला. तसेच यावेळी अखिल भारतीय अभियांत्रिकी संघटनेतर्फे नितीन गडकरी यांनी अभियांत्रिकी कौशल्याला सुवर्णकाळ मिळवून दिल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात येणार होता. परंतु ते उपस्थित राहू शकले नाही. त्यामुळे गडकरी यांना देण्यात येणाऱ्या मानपत्राचे यावेळी वाचन करण्यात आले.