शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
3
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
4
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
5
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
6
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
7
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
8
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन
9
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
10
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
11
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
12
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
13
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
14
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
15
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
16
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
17
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
18
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
19
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
20
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!

कुजबा शिवारातील आमनदीवर पुलाचे बांधकाम करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:07 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क वेलतूर : ‘धरण अन् गाेरगरिबांचे मरण’ याचे जिवंत उदाहरण म्हणजे गाेसेखुर्द प्रकल्प म्हणता येईल. कारण या ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

वेलतूर : ‘धरण अन् गाेरगरिबांचे मरण’ याचे जिवंत उदाहरण म्हणजे गाेसेखुर्द प्रकल्प म्हणता येईल. कारण या प्रकल्पामुळे कुही तालुक्यांतील कुजबावासीयांना अनेक यातना भाेगाव्या लागत आहेत. गावालगतच्या नदी-नाल्यांमध्ये धरणाचे पाणी दुथडी भरून वाहते. परिणामी, शेतीची वहिवाट बंद हाेते. नदी-नाल्याने वेढलेल्या शेतीच्या रस्त्यावर पाणी आल्याने शेती कसण्याची समस्या उभी ठाकली आहे. त्यामुळे या शिवारातील आमनदीवर पुलाचे बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे.

एका बाजूला आमनदी, तर दुसऱ्या बाजूने रुंद पात्र असलेला नालावजा लहान नदीच्या वेढ्याने कुजबा येथील जवळपास २० शेतकऱ्यांच्या शेतजमिनी अडकल्या आहेत. शेतीची वहिवाट व रहदारीसाठी जीव धाेक्यात घालावा लागताे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अंदाजे ४९ हेक्टर शेतजमिनीसाठी शासनाने मजबूत बंधाऱ्याचे बांधकाम करावे किंवा सुधारित भूसंपादन कायद्यानुसार शेतजमिनी संपादित कराव्या, अशी मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून केली जात आहे. याकडे गांभीर्याने लक्ष पुरवून स्थानिक लाेकप्रतिनिधींनी आमची समस्या साेडवावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

या संदर्भात गावकऱ्यांनी अनेकदा निवेदने देऊन समस्या मांडली. विशेषत: नदी-नाल्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनी वेढल्या आहेत, तेथे मागील वर्षापर्यंत शेतीत नियमित ये-जा करण्यासाठी व शेतमाल ने-आण करण्यासाठी एका सुरक्षित नावेचा उपयाेग हाेत हाेता. परंतु, दिवसेंदिवस पाण्याच्या पातळीत हाेणारी वाढ पाहता यंदा नाविकाने ने-आण करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. यामुळे केवळ शेतीवर अवलंबून असणाऱ्या २० कुटुंबांवर उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा ठाकला आहे. त्यामुळे शासनाने पुढील उपाययाेजना हाेईस्ताेवर नावेची साेय करून देण्याची मागणी हाेत असून, आता तरी लाेकप्रतिनिधींनी आमच्या समस्येकडे लक्ष पुरवावे, अशी मागणी कुजबा येथील शेतकरी करीत आहेत.

....

कुजबा येथील शेतकऱ्यांच्या समस्येबाबत माहिती असून, त्यावर ताेडगा काढण्यासाठी लवकरच बैठक बाेलावून समस्या साेडविली जाईल.

- राजू पारवे, आमदार, उमरेड.

...

शासन-प्रशासनाने आमची आर्त हाक ऐकून आम्हाला ये-जा करण्यासाठी आमनदीवर पूल तयार करून द्यावा अन्यथा आमची जमीन संपादित करावी.

- शफी कुरेशी, शेतकरी

खरीप हंगामातील कामे अद्यापही प्रलंबित आहेत. तेव्हा यावर तोडगा काढेपर्यंत शासनाने नावेची सोय करून देत आमच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न साेडवावा.

- पतिराम कुकडे, शेतकरी