शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांनी मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
3
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
4
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
5
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
6
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
7
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
8
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
9
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
10
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
11
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
12
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
13
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
14
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
15
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
16
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
17
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
18
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
19
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
20
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?

कुजबा शिवारातील आमनदीवर पुलाचे बांधकाम करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:07 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क वेलतूर : ‘धरण अन् गाेरगरिबांचे मरण’ याचे जिवंत उदाहरण म्हणजे गाेसेखुर्द प्रकल्प म्हणता येईल. कारण या ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

वेलतूर : ‘धरण अन् गाेरगरिबांचे मरण’ याचे जिवंत उदाहरण म्हणजे गाेसेखुर्द प्रकल्प म्हणता येईल. कारण या प्रकल्पामुळे कुही तालुक्यांतील कुजबावासीयांना अनेक यातना भाेगाव्या लागत आहेत. गावालगतच्या नदी-नाल्यांमध्ये धरणाचे पाणी दुथडी भरून वाहते. परिणामी, शेतीची वहिवाट बंद हाेते. नदी-नाल्याने वेढलेल्या शेतीच्या रस्त्यावर पाणी आल्याने शेती कसण्याची समस्या उभी ठाकली आहे. त्यामुळे या शिवारातील आमनदीवर पुलाचे बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे.

एका बाजूला आमनदी, तर दुसऱ्या बाजूने रुंद पात्र असलेला नालावजा लहान नदीच्या वेढ्याने कुजबा येथील जवळपास २० शेतकऱ्यांच्या शेतजमिनी अडकल्या आहेत. शेतीची वहिवाट व रहदारीसाठी जीव धाेक्यात घालावा लागताे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अंदाजे ४९ हेक्टर शेतजमिनीसाठी शासनाने मजबूत बंधाऱ्याचे बांधकाम करावे किंवा सुधारित भूसंपादन कायद्यानुसार शेतजमिनी संपादित कराव्या, अशी मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून केली जात आहे. याकडे गांभीर्याने लक्ष पुरवून स्थानिक लाेकप्रतिनिधींनी आमची समस्या साेडवावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

या संदर्भात गावकऱ्यांनी अनेकदा निवेदने देऊन समस्या मांडली. विशेषत: नदी-नाल्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनी वेढल्या आहेत, तेथे मागील वर्षापर्यंत शेतीत नियमित ये-जा करण्यासाठी व शेतमाल ने-आण करण्यासाठी एका सुरक्षित नावेचा उपयाेग हाेत हाेता. परंतु, दिवसेंदिवस पाण्याच्या पातळीत हाेणारी वाढ पाहता यंदा नाविकाने ने-आण करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. यामुळे केवळ शेतीवर अवलंबून असणाऱ्या २० कुटुंबांवर उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा ठाकला आहे. त्यामुळे शासनाने पुढील उपाययाेजना हाेईस्ताेवर नावेची साेय करून देण्याची मागणी हाेत असून, आता तरी लाेकप्रतिनिधींनी आमच्या समस्येकडे लक्ष पुरवावे, अशी मागणी कुजबा येथील शेतकरी करीत आहेत.

....

कुजबा येथील शेतकऱ्यांच्या समस्येबाबत माहिती असून, त्यावर ताेडगा काढण्यासाठी लवकरच बैठक बाेलावून समस्या साेडविली जाईल.

- राजू पारवे, आमदार, उमरेड.

...

शासन-प्रशासनाने आमची आर्त हाक ऐकून आम्हाला ये-जा करण्यासाठी आमनदीवर पूल तयार करून द्यावा अन्यथा आमची जमीन संपादित करावी.

- शफी कुरेशी, शेतकरी

खरीप हंगामातील कामे अद्यापही प्रलंबित आहेत. तेव्हा यावर तोडगा काढेपर्यंत शासनाने नावेची सोय करून देत आमच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न साेडवावा.

- पतिराम कुकडे, शेतकरी