शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

राज्यस्तरावर प्रथमच १.५० लाख मे.टन युरियाचा बफर स्टॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:08 IST

नागपूर : रासायनिक खतामध्ये १० टक्के बचतीचे उद्दिष्ट राज्य शासनाने ठेवले आहे. यंदा राज्यात युरियाची कमतरता भासणार नाही. दीड ...

नागपूर : रासायनिक खतामध्ये १० टक्के बचतीचे उद्दिष्ट राज्य शासनाने ठेवले आहे. यंदा राज्यात युरियाची कमतरता भासणार नाही. दीड लाख मेट्रिक टन युरियाचा बफर स्टॉक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यातून गरजेप्रमाणे तालुक्यांना पुरवठा होईल, अशी माहिती कृषीमंत्री दादा भुसे यांनी दिली. नागपूर दौऱ्यावर आले असता खरीप आढावा बैठकीनंतर झालेल्या पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते.

राज्यातील कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी राज्य सरकार योजना आखली आहे. त्याअंतर्गत ‘विकेल ते पिकेल’ तत्त्वाने राज्यामध्ये उत्पन्नवाढीवर भर देण्यात येईल. प्रत्येक गावाची उत्पादकता, जमिनीचा पोत आणि त्या मातीत येणारे उत्पन्न याचा सूक्ष्म अभ्यास करून हे धोरण आखले जात आहे. यासाठी ग्राम कृषी विकास समितीची स्थापना प्रत्येक गावांवर करण्याचे नियोजन आहे. या माध्यमातून राज्यातील सर्व गावांच्या कृषी क्षेत्राचे सूक्ष्म नियोजन होईल. यातून राज्याची कृषी उत्पादकता वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पत्रकार परिषदेला मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार, पशुसंवर्धन दुग्धविकासमंत्री सुनील केदार, पालकमंत्री नितीन राऊत प्रामुख्याने उपस्थित होते.

बियाण्यासाठी शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान

शेतकऱ्यांना ऑनलाइन बियाणे देण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे. यासाठी त्यांच्या खात्यावर अनुदान दिले जाईल. सोयाबीन बियाण्याची कमतरता भासणार नाही. महाबीजच्या मागील वर्षाच्या दरानेच यंदाही हे बियाणे दिले जाईल. गरज भासल्यास मध्य प्रदेशातील बियाणे उपलब्ध करण्याच्या दृष्टीनेदेखील नियोजन करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.

राज्याच्या आर्थिक स्थितीत शेतकऱ्यांचे योगदान

कोरोना संक्रमणाच्या काळातही महाराष्ट्रात आर्थिक स्थिती बरी आहे. यात शेतकऱ्यांचे मोठे योगदान आहे. चांगल्या उत्पन्नामुळेच राज्यात टंचाई नाही. कृषिमाल ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी सरकारचे उत्तम नियोजन सुरू आहे. त्यासाठी पुढाकार घेतला जात असल्याचे भुसे यांनी सांगितले.

‘विकेल ते पिकेल’अंतर्गत नागपूर विभागातील नियोजन

- अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी गावातील गर्द लाल रंगाची व मध्यम तिखट मिरची व देवरी, मोरगाव अर्जुनी या दोन तालुक्यांतील केशोरी मिरचीचे उत्पादन गोंदियासह इतर जिल्ह्यांत वाढवून ते सरासरी ४०० हेक्टरपर्यंत घेण्याचे नियोजन आहे.

- ड्रॅगन फ्रूटसाठी गोंदिया, नागपूर, गडचिरोली या जिल्ह्यांत खरीप हंगामामध्ये सरासरी २०.५ हेक्टरमध्ये लागवडीचे नियोजन आहे. या फळांच्या लागवडीचा प्रति एकरी खर्च ३ लाख १३ हजार रुपये असून सरासरी उत्पादन ७ मे. टन प्रति एकर आहे.

- भाजीपाला पिकामध्ये करटोली व विदेशी भाजीपाला, सुगंधी वनस्पतीमध्ये सिंट्रोनेला तसेच मसाला पिकांमध्ये भिवापुरी मिरची, केशोरी मिरची, हळद व वायगाव हळद या पिकांना प्राधान्य देण्यात आले आहे.

- नागपूर विभागात ४,२३३ हेक्टरमध्ये रब्बी ज्वारी, गडचिरोली व भंडारा जिल्ह्यात १२० हेक्टरमध्ये लाल भात, १६३ हेक्टरमध्ये काळा भात, १,१६० हेक्टर करडई, १,५४७ हेक्टर जवस, २,४०४ हेक्टरमध्ये तीळ तर ३,०९५ हेक्टर भुईमूग या पिकांचे नियोजन आहे.