शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

राज्यस्तरावर प्रथमच १.५० लाख मे.टन युरियाचा बफर स्टॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:08 IST

नागपूर : रासायनिक खतामध्ये १० टक्के बचतीचे उद्दिष्ट राज्य शासनाने ठेवले आहे. यंदा राज्यात युरियाची कमतरता भासणार नाही. दीड ...

नागपूर : रासायनिक खतामध्ये १० टक्के बचतीचे उद्दिष्ट राज्य शासनाने ठेवले आहे. यंदा राज्यात युरियाची कमतरता भासणार नाही. दीड लाख मेट्रिक टन युरियाचा बफर स्टॉक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यातून गरजेप्रमाणे तालुक्यांना पुरवठा होईल, अशी माहिती कृषीमंत्री दादा भुसे यांनी दिली. नागपूर दौऱ्यावर आले असता खरीप आढावा बैठकीनंतर झालेल्या पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते.

राज्यातील कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी राज्य सरकार योजना आखली आहे. त्याअंतर्गत ‘विकेल ते पिकेल’ तत्त्वाने राज्यामध्ये उत्पन्नवाढीवर भर देण्यात येईल. प्रत्येक गावाची उत्पादकता, जमिनीचा पोत आणि त्या मातीत येणारे उत्पन्न याचा सूक्ष्म अभ्यास करून हे धोरण आखले जात आहे. यासाठी ग्राम कृषी विकास समितीची स्थापना प्रत्येक गावांवर करण्याचे नियोजन आहे. या माध्यमातून राज्यातील सर्व गावांच्या कृषी क्षेत्राचे सूक्ष्म नियोजन होईल. यातून राज्याची कृषी उत्पादकता वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पत्रकार परिषदेला मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार, पशुसंवर्धन दुग्धविकासमंत्री सुनील केदार, पालकमंत्री नितीन राऊत प्रामुख्याने उपस्थित होते.

बियाण्यासाठी शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान

शेतकऱ्यांना ऑनलाइन बियाणे देण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे. यासाठी त्यांच्या खात्यावर अनुदान दिले जाईल. सोयाबीन बियाण्याची कमतरता भासणार नाही. महाबीजच्या मागील वर्षाच्या दरानेच यंदाही हे बियाणे दिले जाईल. गरज भासल्यास मध्य प्रदेशातील बियाणे उपलब्ध करण्याच्या दृष्टीनेदेखील नियोजन करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.

राज्याच्या आर्थिक स्थितीत शेतकऱ्यांचे योगदान

कोरोना संक्रमणाच्या काळातही महाराष्ट्रात आर्थिक स्थिती बरी आहे. यात शेतकऱ्यांचे मोठे योगदान आहे. चांगल्या उत्पन्नामुळेच राज्यात टंचाई नाही. कृषिमाल ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी सरकारचे उत्तम नियोजन सुरू आहे. त्यासाठी पुढाकार घेतला जात असल्याचे भुसे यांनी सांगितले.

‘विकेल ते पिकेल’अंतर्गत नागपूर विभागातील नियोजन

- अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी गावातील गर्द लाल रंगाची व मध्यम तिखट मिरची व देवरी, मोरगाव अर्जुनी या दोन तालुक्यांतील केशोरी मिरचीचे उत्पादन गोंदियासह इतर जिल्ह्यांत वाढवून ते सरासरी ४०० हेक्टरपर्यंत घेण्याचे नियोजन आहे.

- ड्रॅगन फ्रूटसाठी गोंदिया, नागपूर, गडचिरोली या जिल्ह्यांत खरीप हंगामामध्ये सरासरी २०.५ हेक्टरमध्ये लागवडीचे नियोजन आहे. या फळांच्या लागवडीचा प्रति एकरी खर्च ३ लाख १३ हजार रुपये असून सरासरी उत्पादन ७ मे. टन प्रति एकर आहे.

- भाजीपाला पिकामध्ये करटोली व विदेशी भाजीपाला, सुगंधी वनस्पतीमध्ये सिंट्रोनेला तसेच मसाला पिकांमध्ये भिवापुरी मिरची, केशोरी मिरची, हळद व वायगाव हळद या पिकांना प्राधान्य देण्यात आले आहे.

- नागपूर विभागात ४,२३३ हेक्टरमध्ये रब्बी ज्वारी, गडचिरोली व भंडारा जिल्ह्यात १२० हेक्टरमध्ये लाल भात, १६३ हेक्टरमध्ये काळा भात, १,१६० हेक्टर करडई, १,५४७ हेक्टर जवस, २,४०४ हेक्टरमध्ये तीळ तर ३,०९५ हेक्टर भुईमूग या पिकांचे नियोजन आहे.